शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
Silver Returns: २५ वर्षांत २६ पट; २००० साली चांदीत ₹१०,००० गुंतवले असते तर आज किती मालामाल असता?
3
मूळच्या गुजराती कुटुंबाने खरेदी केली 'पाकिस्तान एअरलाईन्स'; कोण आहेत कराचीतील उद्योगपती आरिफ हबीब?
4
कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
5
PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित
6
पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
7
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
8
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
9
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
11
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
12
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
13
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
14
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
15
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
16
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
17
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
18
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
19
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
20
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

गर्भपाताचे प्रमाण नियंत्रणात

By admin | Updated: March 4, 2016 02:44 IST

देशात गर्भपाताचे प्रमाण वाढले असल्याच्या वृत्ताचे केंद्र सरकारने खंडन केले असून, हे प्रमाण नियंत्रणात असल्याचा दावा केला.

प्रमोद गवळी,  नवी दिल्लीदेशात गर्भपाताचे प्रमाण वाढले असल्याच्या वृत्ताचे केंद्र सरकारने खंडन केले असून, हे प्रमाण नियंत्रणात असल्याचा दावा केला. सोबतच प्रसूतीदरम्यान मातेच्या मृत्यूचे प्रमाणही दरवर्षी कमी होत असल्याचे स्पष्ट केले.आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी राज्यसभेत खासदार विजय दर्डा यांनी विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘इ.स. २००७-२००८ साली केलेल्या जिल्हास्तरीय कुटुंब आणि सुविधा सर्वेक्षण - ३नुसार १५ ते ४९ वर्षे वयोगटातील एकूण विवाहित गरोदर महिलांमध्ये गर्भपाताचे प्रमाण ४.७ टक्के आहे.’उचलण्यात आलेली पावलेनड्डा यांनी सांगितले की, ‘१२ आठवड्यांपर्यंत वाढ झालेल्या गर्भाच्या वारंवार पडण्यामागे हायपोथायरोडिझम हे मुख्य कारण आहे. या आजाराचा धोका असलेल्या महिलांच्या विशेष तपासणीसाठी सर्व राज्यांना निर्देश दिलेले आहेत. याशिवाय माता आणि नवजात बालकांचे मृत्यू रोखण्याकरिता एप्रिल २००५पासून ‘जननी सुरक्षा योजना’नामक सशर्त रोख हस्तांतरण व्यवस्था सुरू केली. त्यानंतर, जून २०११पासून ‘जननी शिशू सुरक्षा कार्यक्रम’ अंमलात आला. यामुळे गरोदर महिला आणि आजारी नवजात बालकांसाठी होणारा खर्चाचा बोजा कमी झाला. या योजनेंतर्गत शासकीय इस्पितळांमध्ये प्रसूती करणाऱ्या सर्व गर्भवती महिलांना सिझेरियन सेक्शनसह सर्व उपचार पूर्णपणे नि:शुल्क करण्याचा अधिकार मिळाला आहे. याशिवाय इतरही काही योजना राबविण्यात येत असून, याअंतर्गत गरोदर महिलांची नियमित तपासणी करणे, जीवनसत्त्वाची कमतरता दूर करणे आणि योग्य औषधांचा पुरवठा आदींचा समावेश आहे. महानिबंधक आणि नमुना नोंदणीकरण प्रणालीच्या अलीकडील अहवालानुसार, देशात २०११-१३ या कालावधीत प्रति १ लाख शिशूंच्या जन्मामागे मातामृत्यूचे प्रमाण १६७ एवढे होते. यापूर्वीच्या वर्षांमध्ये ते २१२ आणि १७८ राहिले. हेच प्रमाण बांगलादेशात १७६, पाकिस्तानात १७८, नेपाळमध्ये २५८ आणि अफगाणिस्तानात ३९६ आहे. या देशांच्या तुलनेत आपल्या येथे मातामृत्यूचे प्रमाण कमी आहे. अर्थात, श्रीलंका (३०), मालदीव (६८) आणि भूतानची (१४८) परिस्थिती आपल्यापेक्षा चांगली आहे.