शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
2
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
3
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
4
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
5
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
6
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
7
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
8
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
9
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
10
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
11
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
12
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
13
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
14
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
15
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
16
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
17
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
18
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
19
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
20
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...

"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 18:53 IST

पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ म्हणाले होते, "जर आपण आमचे पाणी रोखण्याची धमकी द्याल, तर पाकिस्तानचे एक थेंबही पाणी हिरावून घेऊ शकणार नाही. जर भारताने असे काही करण्याचा प्रयत्नही केला, तर त्याला धडा शिकवला जाईल."

पाकिस्तानकडून सातत्याने केल्या जाणाऱ्या भारतविरोधी वक्तव्यांवर आता भारताने चोख प्रत्युत्तर दिले आहे. चुकीच्या पावलाचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा थेट इशारा भारताने पाकिस्तानला दिला आहे.

भारताचा इशारा - परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायस्वाल यांनी गुरुवारी (१४ ऑगस्ट २०२५) पत्रकार परिषदेत पाकिस्तानला थेट इशारा दिला. ते म्हणाले "पाकिस्तानकडून सातत्याने भारतविरोधी विधाने केली जात आहेत. युद्ध भडकवणारी विधाने केली जात आहेत. आपले अपयश लपवण्यासाठी वारंवार भारतविरोधी विधाने करणे पाकिस्तानी नेतृत्वाची पद्धत आहे. पाकिस्तानला सल्ला आहे की, त्यांनी आपल्या विधानांवर सय्यम ठेवावा. कोणत्याती चुकीच्या धाडसाचा परिणाम वेदनादायक असेल."

शहबाज शरीफ यांनी दिली होती धमकी - भारतीय परराष्ट्र मंत्रालयाची ही गंभीर प्रतिक्रिया पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या विधानानंतर आली आहे. इस्लामाबादमध्ये मंगळवारी (12 ऑगस्ट, 2025) एका कार्यक्रमादरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ म्हणाले होते, "जर आपण आमचे पाणी रोखण्याची धमकी द्याल, तर पाकिस्तानचे एक थेंबही पाणी हिरावून घेऊ शकणार नाही. जर भारताने असे काही करण्याचा प्रयत्नही केला, तर त्याला धडा शिकवला जाईल." याशिवाय, पाकिस्तानमध्ये वाहणारे पाणी रोखणे, ही युद्ध कारवाई मानली जाईल, असेही पाकिस्तानने वारंवार म्हटले आहे.

बिलावल भुट्टोपासून ते झरदारींपर्यंत, भारतविरोधी विधाने... -पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या विधानापूर्वी पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी ते माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनीही भारतविरोधी विधाने केली आहेत. त्यांनी सिंधू पाणी कराराच्या निलंबनाची तुलना, सिंधू संस्कृतीवरील हल्ल्याशी केली. एवढेच नाही, तर आपल्याला युद्धासाठी भाग पाडले गेले, तर पाकिस्तान मागे हटणार नाही, असेही ते म्हणाले होते. 

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान