शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Acharya : "मला घाणेरड्या शिव्या दिल्या, मारायला चप्पल उचलली, आई-वडिलांना..."; रोहिणी यांची भावुक पोस्ट
2
जैश टेरर मॉड्यूलवर मोठी कारवाई: अनंतनागमध्ये छाप्यानंतर हरियाणाची महिला डॉक्टर ताब्यात
3
“डॉक्टर नसलो, तरी मोठी ऑपरेशन करतो!”; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जोरदार फटकेबाजी
4
१८ व्या वर्षी तुमचं मुल होईल कोट्यधीश! SSY, NPS आणि PPF सह 'या' ६ योजनांमध्ये आजच करा गुंतवणूक
5
Delhi Blast : जैशने २० लाख पाठवले तरी डॉक्टर एकमेकांशी भिडले? दिल्ली स्फोटाबाबत धक्कादायक खुलासा
6
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: कसे कराल व्रत? शिवशंकर देतील शुभाशिर्वाद, कल्याण-मंगलच होणार!
7
Bihar: बिहारमध्ये एनडीएचा अनोखा विक्रम; २५ पैकी २४ मंत्री विजयी!
8
Tips: कामाच्या ठिकाणी होणारे मतभेद मिटवण्यासाठी ६ सोप्या टिप्स!
9
अमेरिकेची धमकी निष्फळ! २.५ अब्ज डॉलर्सची खरेदी करून भारत रशियन तेलाचा दुसरा मोठा ग्राहक
10
Delhi Blast : भयावह! दिल्ली कार स्फोटाचा नवीन Video आला समोर; तब्बल ४० फूट खाली हादरली जमीन
11
DSP Siraj Broke Stumps : मियाँ मॅजिक! स्टंप तोड बॉलिंगसह दाखवला 'सायमन गो बॅक'चा खास नजारा (VIDEO)
12
शाळांच्या सहलीसाठी मिळणार 'एसटी'च्या नव्या बसेस; विद्यार्थ्यांना घेता येणार संस्मरणीय अनुभव
13
भीषण अपघात! ग्वाल्हेरमध्ये फॉर्च्युनरची ट्रॅक्टर-ट्रॉलीला जोरदार धडक, ५ तरुणांचा जागीच मृत्यू
14
Farming: ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवसाचे सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याला मिळणार ५० हजार
15
आरबीआयने दर घटवले तरी पोस्ट ऑफिस देतंय मोठा फायदा; ५ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याजदर कायम
16
IND vs SA : द.आफ्रिकेचा कर्णधार बावुमाचं नाबाद अर्धशतक! टीम इंडियासमोर १२४ धावांचे टार्गेट
17
Bigg Boss 19: शिव ठाकरेचा 'महाराष्ट्रीयन भाऊ'ला फूल सपोर्ट! प्रणित मोरेसाठी केली पोस्ट, म्हणाला- "भाऊ..."
18
बिहार: उत्तर तरी काय देणार.. प्रशांत किशोर यांनी बोलवलेली पत्रकार परिषद शेवटच्या क्षणी रद्द
19
Shubman Gill Hospitalised : शुभमन गिलला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ; BCCI नं दिली मोठी अपडेट
20
कोचीन शिपयार्डपासून ते एचयूडीसीओपर्यंत; पुढच्या आठवड्यात कोणती कंपनी किती लाभांश देणार?
Daily Top 2Weekly Top 5

"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 18:53 IST

पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ म्हणाले होते, "जर आपण आमचे पाणी रोखण्याची धमकी द्याल, तर पाकिस्तानचे एक थेंबही पाणी हिरावून घेऊ शकणार नाही. जर भारताने असे काही करण्याचा प्रयत्नही केला, तर त्याला धडा शिकवला जाईल."

पाकिस्तानकडून सातत्याने केल्या जाणाऱ्या भारतविरोधी वक्तव्यांवर आता भारताने चोख प्रत्युत्तर दिले आहे. चुकीच्या पावलाचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा थेट इशारा भारताने पाकिस्तानला दिला आहे.

भारताचा इशारा - परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायस्वाल यांनी गुरुवारी (१४ ऑगस्ट २०२५) पत्रकार परिषदेत पाकिस्तानला थेट इशारा दिला. ते म्हणाले "पाकिस्तानकडून सातत्याने भारतविरोधी विधाने केली जात आहेत. युद्ध भडकवणारी विधाने केली जात आहेत. आपले अपयश लपवण्यासाठी वारंवार भारतविरोधी विधाने करणे पाकिस्तानी नेतृत्वाची पद्धत आहे. पाकिस्तानला सल्ला आहे की, त्यांनी आपल्या विधानांवर सय्यम ठेवावा. कोणत्याती चुकीच्या धाडसाचा परिणाम वेदनादायक असेल."

शहबाज शरीफ यांनी दिली होती धमकी - भारतीय परराष्ट्र मंत्रालयाची ही गंभीर प्रतिक्रिया पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या विधानानंतर आली आहे. इस्लामाबादमध्ये मंगळवारी (12 ऑगस्ट, 2025) एका कार्यक्रमादरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ म्हणाले होते, "जर आपण आमचे पाणी रोखण्याची धमकी द्याल, तर पाकिस्तानचे एक थेंबही पाणी हिरावून घेऊ शकणार नाही. जर भारताने असे काही करण्याचा प्रयत्नही केला, तर त्याला धडा शिकवला जाईल." याशिवाय, पाकिस्तानमध्ये वाहणारे पाणी रोखणे, ही युद्ध कारवाई मानली जाईल, असेही पाकिस्तानने वारंवार म्हटले आहे.

बिलावल भुट्टोपासून ते झरदारींपर्यंत, भारतविरोधी विधाने... -पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या विधानापूर्वी पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी ते माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनीही भारतविरोधी विधाने केली आहेत. त्यांनी सिंधू पाणी कराराच्या निलंबनाची तुलना, सिंधू संस्कृतीवरील हल्ल्याशी केली. एवढेच नाही, तर आपल्याला युद्धासाठी भाग पाडले गेले, तर पाकिस्तान मागे हटणार नाही, असेही ते म्हणाले होते. 

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान