शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

हायकोर्टाचा अवमान; जिल्हाधिकाऱ्यांना कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2021 05:50 IST

जमीन अधिग्रहणात स्टे असताना कारवाई

खुशालचंद बाहेती

चेन्नई : जमीन अधिग्रहणाच्या प्रकरणात उच्च न्यायालयाने स्थगिती दिली असतानाही ती ताब्यात घेऊन त्यावर काम केले आणि न्यायालयीन आदेशाचा अवमान केला म्हणून दोषी धरत मद्रास उच्च न्यायालयानेजिल्हाधिकारी, सहजिल्हाधिकारी आणि जमीन अधिग्रहण अधिकाऱ्यांना तीन महिने कैदेची शिक्षा सुनावली.

सन २०१८ मध्ये राजन्ना सिरसिल्ला (पूर्वीच्या करीमनगर जिल्ह्याच्या भाग) जिल्ह्यात अनंतागिरी साठवण तलावासाठी जमीन अधिग्रहणाची अधिसूचना काढण्यात आली होती. ती काढताना ग्रामसभेचे आयोजन, महसुली अभिलेख अद्ययावतीकरण आक्षेप घेणाऱ्यांची वैयक्तिक सुनावणी घेणे या अनिवार्य प्रक्रिया पार पाडल्या नाहीत म्हणून अनेक शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. जिल्हाधिकाऱ्यांनी नुकसान भरपाई व पुनर्वसनाचा अधिकार कायद्याप्रमाणे जमिनीचे दर निश्चित केले नाहीत, असाही आक्षेप होता. उच्च न्यायालयाने यास अंतरिम स्थगिती देत अधिग्रहणाची कारवाई थांबवली. मात्र, यानंतरही काम न थांबवता शेतकऱ्यांना पोलिसांकडून धमकावण्यात आले आणि ऑक्टोबर २०१९ मध्ये गोदावरी प्रकल्पातून पाणी सोडल्यामुळे जमिनी पाण्यात गेल्या. हा उच्च न्यायालयाचा अवमान असल्याची याचिका शेतकऱ्यांनी दाखल केली.या प्रकरणात उच्च न्यायालयाने जिल्हाधिकारी यांच्यासह सहजिल्हाधिकारी, जमीन अधिग्रहण अधिकारी या ३ अधिकाऱ्यांना दोषी ठरवत ३ महिने साधी कैद व प्रत्येक २ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. याशिवाय प्रत्येक अर्जदार शेतकऱ्यास १० हजार रुपये दाव्याचा खर्च देण्याचे आदेश दिले.

जिल्हाधिकाऱ्यांची बाजू  nस्थगिती दिली तेव्हा २०१८ मध्ये ते कार्यरत नव्हते. त्यांनी नंतर पदभार घेतला. स्थगितीतील जमीन अधिग्रहण केलेली नाही. 

उच्च न्यायालयाचे निरीक्षण

nजमिनी पाण्याखाली गेल्या तेव्हा जिल्हाधिकारी पदावर होते. नंतर पदभार घेतला असला तरीही न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी त्यांचे कर्तव्य आहे.

nपाण्याखाली गेलेल्या जमिनीचे फोटो पाहता, जमीन अधिग्रहण केली नाही, हे म्हणणे खोटे आहे.   

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयcollectorजिल्हाधिकारी