शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

इंदूरमध्ये दूषित पाण्याचा कहर, विषारी पाण्यामुळे आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू, हजारो जण बाधित

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 15:27 IST

Indore News: देशातील सर्वात स्वच्छ शहरांपैकी एक असलेल्या इंदूरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. गेल्या काही दिवसांपासून दूषित पाण्याच्या पुरवठ्यामुळे आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर या दूषित पाण्यामुळे १००० हून अधिक लोकांना पोटदुखी आणि उलट्या-जुलाबांचा त्रास होत आहे.

देशातील सर्वात स्वच्छ शहरांपैकी एक असलेल्या इंदूरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. गेल्या काही दिवसांपासून दूषित पाण्याच्या पुरवठ्यामुळे आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर या दूषित पाण्यामुळे १००० हून अधिक लोकांना पोटदुखी आणि उलट्या-जुलाबांचा त्रास होत आहे. इंदूर शहरामध्ये नर्मदा नदीमधून येणारं पाणी हे आजार आणि मृत्यूचं कारण ठरत असल्याचं समोर आलं आहे. आता खबरदारीचा उपाय म्हणून महानगरपालिकेने प्रभावित भागातील पाणीपुरवठा बंद केला आहे. तसेच जलवाहिनीची दुरुस्ती केली जात असून, टँकरमधून स्वच्छ पाणी पुरवलं जात आहे. तसेच आरोग्य विभागाची पथके घरोघरी जाऊन रुग्णांची तपासणी करत आहे.

दूषित पाणीपुरवठ्यामुळे ही घटना घडल्याचे निदर्शनास आल्यानंतर महानगरपालिकेने त्वरित तपास सुरू केला. त्यानंतर भागिरथपुरा पोलीस चौकीच्या टॉयलेटखालून जाणाऱ्या नर्मदेच्या जलवाहिनीला गळती लागली होती. तसेच या गळतीमुळे दूषित पाणी जलवाहिनीमध्ये मिसळत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे संपूर्ण प्रभागात दूषित पाण्याचा पुरवठा होत होता. तसेच हे दूषित पाणी पिऊन लोक आजारी पडत होते.

दरम्यान, दूषित पाण्याचे प्राशन केल्याने तब्येत बिघडून आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाल्याने इंदूरमधील भागिरथपूरामध्ये खळबळ उडाली आहे. या भागातून सातत्याने नवनवे रुग्ण समोर येत आहेत. तसेच अत्यवस्थ असलेल्या रुग्णांना प्राथमिक उपचार करून पुढील उपचारांसाठी मोठ्या रुग्णालयात पाठवले जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून नर्मदा नदीच्या पाण्याचा वापर करू नका, असं आवाहन करणाऱ्या पोस्ट येथील सोशल मीडियावरून लोक शेअर करत होते. मात्र लोकांच्या तक्रारींकडे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने दुर्लक्ष केले. या दूषित पाण्यामुळे आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र अधिकृत आकडा ३ असल्याचे सांगण्यात येत आहे.  त्यामुळे दूषित पाण्यामुळे नेमका किती जणांचा मृत्यू झाला, याबाबच संशय व्यक्त केला जात आहे. दुषित पाण्यामुळे आतापर्यंत ११०० हून अधिक लोकांना उलट्या-जुलाब, पोटदुखीचा त्रास होत आहे. तर १११ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Indore Water Contamination: 8 Dead, Thousands Ill from Toxic Water

Web Summary : Indore faces a crisis as contaminated water claims eight lives and sickens thousands. Narmada River water is suspected. Water supply halted; tankers provide clean water. Health teams investigate.
टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशwater pollutionजल प्रदूषण