शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नवीन संसद भवनाच्या उभारणीस लवकरच सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2021 02:33 IST

वारसा संवर्धन समितीच्या मंजुरीने मार्ग प्रशस्त

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी सेंट्रल विस्टा पुनर्विकास योजनेनुसार १४ सदस्यांच्या वारसा संवर्धन समितीने नवीन संसद उभारण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत नवीन संसद उभारण्याचे काम सुरू करण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे. काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने या समितीची मंजुरी घेण्याचे निर्देश सरकारला दिले होते. केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी विकासमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हटले आहे की, नवीन संसद भवन उभारण्यामुळे सध्याच्या संरचनेवर कोणताही परिणाम होणार नाही. गृहनिर्माण सचिव दुुर्गा शंकर मिश्रा यांनी पत्रकार परिषदेत सांगितलेकी, १४ सदस्यांच्या समितीने प्रस्तावावर चर्चा करून मंजुरी दिली. केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी विकास मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव वारसा संवर्धन समितीचे अध्यक्ष आहेत.  मंजुरी देण्याआधी जाहीर सुनावणी करणे अनिवार्य होते का? असे विचारले असता त्यांनी नाही, असे सांगितले. विविध संस्थांचे अधिकारी आणि तज्ज्ञ या समितीचे सदस्य आहेत.

प्रजासत्ताक दिनाच्या संचलनानंतर लवकर राजपथ पुनर्विकासाचे काम सुरू केले जाईल. हे काम १० महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित आहे. पुढच्या प्रजासत्ताक दिनाचे संचलन पुनर्विकसित राजपथावर होईल. पाच जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाने सेंट्रल विस्टा प्रकल्पाला मिळालेली पर्यावरण मंजुरी आणि जमिनीच्या वापरात बदल करण्यासंदर्भातील अधिसूचना कायम राखत राष्ट्रपती भवन ते इंडिया गेटपर्यंत तीन किलो मीटरच्या परिसरातील या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा मार्ग मोकळा केला होता. या प्रकल्पाची घोषणा २०१९ मध्ये करण्यात आली होती. नवीन संसद भवनाचे काम ऑगस्ट २०२२ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.

टॅग्स :Parliamentसंसदdelhiदिल्ली