शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’ला मणिपूरमधून सुरुवात, राहुल गांधी ६७ दिवसांत देश पिंजून काढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2024 17:59 IST

Bharat Jodo Nyaya Yatra: राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेला आज मणिपूरमधून सुरुवात झाली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मणिपूरमधील थौबल जिल्ह्यातून हिवरा झेंडा दाखवून या यात्रेला औपचारिक सुरुवात केली आहे.

राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेला आज मणिपूरमधून सुरुवात झाली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मणिपूरमधील थौबल जिल्ह्यातून हिवरा झेंडा दाखवून या यात्रेला औपचारिक सुरुवात केली आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सलमान खुर्शिद, राजीव शुक्ला, आनंद शर्मा, रणदीप सिंह सुरजेवाला, अशोक गहलोत, अभिषेक मनू सिंघवी, भूपेंद्र सिंह हुड्डा, सचिन पायलट, दिग्विजय सिंह, प्रमोद तिवारी यांच्यासह काँग्रेसचे सुमारे ७० हून अधिक नेते इंफाळ येथे दाखल झाले आहेत.

भारत जोडो न्याय यात्रा मणिपूरपासून ६ हजार ७१३ किलोमीटर अंतर पार करून २० मार्च रोजी मुंबईमध्ये समाप्त होणार आहे. यादरम्यान, राहुल गांधी हे ६०-७० काँग्रेस नेत्यांसह बसच्या माध्यमातून हे अंतर पार करणार आहेत. तसेच ही यात्रा काही प्रमुख ठिकामी पायी प्रवास करणार आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा हा दुसरा टप्पा आहे. पहिल्या टप्प्यामध्ये राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत प्रवार केला आहे. ३५०० किमी चाललेली ही भारत जोडो यात्रा १२ राज्यांमधून गेली होती. तर भारत जोडो न्याय यात्रा १५ राज्यांमधून प्रवास करणार आहेत. 

राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेमुळे आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या यशावर सकारात्मक परिणाम होईल, अशी काँग्रेसला अपेक्षा आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा ही ६७ दिवसांमध्ये ११० जिल्ह्यामधून जाणार आहे. या यात्रेत राहुल गांधी हे तब्बल ३५५ लोकसभा मतदारसंघांना कव्हर करणार आहेत. हा आकडा देशातील एकूण लोकसभा मतदारसंघांपैकी ६५ टक्के एवढा आहे. २०१९ मध्ये भाजपाने या ३५५ मतदारसंघांपैकी २३६ मतदारसंघात विजय मिळवला होता. तर काँग्रेसला केवळ १४ जागा मिळाल्या होत्या. ही यात्रा मध्य प्रदेश छत्तीसगड या राज्यांतूनही जाणार आहे. या राज्यांत काँग्रेसचा नुकताच पराभव झाला होता.

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी या यात्रेबाबत सांगितले की, ही यात्रा गेल्या दहा वर्षांमध्ये झालेल्या राजकीय, सामाजिक, आर्थिक अन्यायाला विचारात घेऊन काढण्यात येत आहे. काँग्रेस पक्ष सुरुवातीला ही यात्रा मणिपूरची राजधानी असलेल्या इंफाळ येथून सुरू होणार होती. मात्र राज्यातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांनी त्याला परवानगी दिली नाही. त्यामुळे नंतर येथून २५ किमी अंतरावर असलेल्या थौबल जिल्ह्यातून या यात्रेला सुरुवात करण्यात आली आहे.  

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस