शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
2
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
3
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
4
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
5
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
6
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
7
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
8
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
9
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
10
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
11
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?
12
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
13
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
14
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
15
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
16
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
17
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
18
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
19
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
20
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;

आता काँग्रेसच जिंकणार, राहुल गांधींनी फुंकले रणशिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 05:54 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेचा आणि देशाचा विश्वासघात केला आहे. मोदी केवळ खोटे बोलत आहेत आणि त्यांच्या बोलण्यात दम राहिलेला नाही, अशा जोरदार शब्दांमध्ये टीका करत

शीलेश शर्मानवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेचा आणि देशाचा विश्वासघात केला आहे. मोदी केवळ खोटे बोलत आहेत आणि त्यांच्या बोलण्यात दम राहिलेला नाही, अशा जोरदार शब्दांमध्ये टीका करत, राहुल गांधी यांनी येत्या सर्व निवडणुकांमध्ये काँग्रेसचाच विजय होईल, असा विश्वास व्यक्त केला. रामलीला मैदानावर झालेल्या काँग्रेसच्या जन आक्रोश सभेत देशभरातून आलेल्या कार्यकर्त्यांसमोर त्यांनी पुढील लोकसभेचे रणशिंग फुंकले आहे.हजारो कार्यकर्त्यांना संबोधित करताना राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या खोट्या आश्वासनांची लक्तरे काढली. चार वर्षांपूर्वी मोदींनी दिलेल्या आश्वासनांपैैकी एकही आश्वासन त्यांना पूर्ण करता आलेले नाही. मोदींच्या काळात शेतकऱ्यांची उपेक्षा होत आहे आणि दुसरीकडे उद्योजकांचे कर्ज माफ केले जात आहे. तरुण अजूनही रोजगाराच्या शोधातच आहेत. ते म्हणाले की, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडसह लोकसभा निवडणुकांमध्येही यश मिळवायचे आहे, त्या दृष्टीने कंबर कसून कामाला लागले पाहिजे.यावर मोदी गप्प का? राहुल यांची टीकाभ्रष्टाचार : मोदी भ्रष्टाचार संपविण्याच्या वल्गना करतात. भ्रष्टाचाराविरोधात लढा देण्याची भाषा मोदी कर्नाटकच्या सभांमध्ये करतात तेव्हा त्यांच्यासोबत येदियुरप्पा व्यासपीठावर असतात. येदियुरप्पा तुरुंगाची हवा खाऊन आले आहेत. पीयूष गोयल ४७ कोटी रुपये कमावतात, पण या प्रकरणांबद्दल मोदी एका शब्दाने काही बोलत नाहीत. नीरव मोदी हजारो कोटींचा भ्रष्टाचार करून देशाबाहेर पळाला. बँकांचा पैसा लुटला जातोय, तरीही मोदी गप्प बसतात.बेरोजगारी : दोन कोटी युवकांना रोजगार देण्याच्या आश्वासनाचे काय झाले, या व अशा गोष्टींबद्दल मोदी मौन बाळगून आहेत.दलित-महिलांवर अत्याचार - देशात दलित व महिलांवरील अत्याचारांत वाढ झाली आहे. भाजपाच्या आमदारानेच बलात्कार केल्याची घटना घडली. यावरून परदेशात आपल्या पंतप्रधानांना निषेधाचा सामना करावा लागतो, हे लाजिरवाणे आहे. मोदी म्हणतात, ‘बेटी बचाओ’, पण जेव्हा अत्याचार होतात, तेव्हा ते गप्प बसतात, असा टोलाही राहुल यांनी लगावला.सरकारकडून विरोधकांची गळचेपी - सोनिया गांधीसरकारी यंत्रणांचा वापर करून विरोधकांची गळचेपी करण्याचे प्रयत्न मोदी सरकारकडून होत आहेत, अशी टीका काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी जन आक्रोश सभेमध्ये बोलताना केली.लोकशाही धोक्यात! - मनमोहन सिंगगेल्या चार वर्षांमध्ये देशातील लोकशाही धोक्यात आली आहे, असा हल्ला डॉ. मनमोहन सिंग यांनी केला.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस