शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

आता काँग्रेसच जिंकणार, राहुल गांधींनी फुंकले रणशिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 05:54 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेचा आणि देशाचा विश्वासघात केला आहे. मोदी केवळ खोटे बोलत आहेत आणि त्यांच्या बोलण्यात दम राहिलेला नाही, अशा जोरदार शब्दांमध्ये टीका करत

शीलेश शर्मानवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेचा आणि देशाचा विश्वासघात केला आहे. मोदी केवळ खोटे बोलत आहेत आणि त्यांच्या बोलण्यात दम राहिलेला नाही, अशा जोरदार शब्दांमध्ये टीका करत, राहुल गांधी यांनी येत्या सर्व निवडणुकांमध्ये काँग्रेसचाच विजय होईल, असा विश्वास व्यक्त केला. रामलीला मैदानावर झालेल्या काँग्रेसच्या जन आक्रोश सभेत देशभरातून आलेल्या कार्यकर्त्यांसमोर त्यांनी पुढील लोकसभेचे रणशिंग फुंकले आहे.हजारो कार्यकर्त्यांना संबोधित करताना राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या खोट्या आश्वासनांची लक्तरे काढली. चार वर्षांपूर्वी मोदींनी दिलेल्या आश्वासनांपैैकी एकही आश्वासन त्यांना पूर्ण करता आलेले नाही. मोदींच्या काळात शेतकऱ्यांची उपेक्षा होत आहे आणि दुसरीकडे उद्योजकांचे कर्ज माफ केले जात आहे. तरुण अजूनही रोजगाराच्या शोधातच आहेत. ते म्हणाले की, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडसह लोकसभा निवडणुकांमध्येही यश मिळवायचे आहे, त्या दृष्टीने कंबर कसून कामाला लागले पाहिजे.यावर मोदी गप्प का? राहुल यांची टीकाभ्रष्टाचार : मोदी भ्रष्टाचार संपविण्याच्या वल्गना करतात. भ्रष्टाचाराविरोधात लढा देण्याची भाषा मोदी कर्नाटकच्या सभांमध्ये करतात तेव्हा त्यांच्यासोबत येदियुरप्पा व्यासपीठावर असतात. येदियुरप्पा तुरुंगाची हवा खाऊन आले आहेत. पीयूष गोयल ४७ कोटी रुपये कमावतात, पण या प्रकरणांबद्दल मोदी एका शब्दाने काही बोलत नाहीत. नीरव मोदी हजारो कोटींचा भ्रष्टाचार करून देशाबाहेर पळाला. बँकांचा पैसा लुटला जातोय, तरीही मोदी गप्प बसतात.बेरोजगारी : दोन कोटी युवकांना रोजगार देण्याच्या आश्वासनाचे काय झाले, या व अशा गोष्टींबद्दल मोदी मौन बाळगून आहेत.दलित-महिलांवर अत्याचार - देशात दलित व महिलांवरील अत्याचारांत वाढ झाली आहे. भाजपाच्या आमदारानेच बलात्कार केल्याची घटना घडली. यावरून परदेशात आपल्या पंतप्रधानांना निषेधाचा सामना करावा लागतो, हे लाजिरवाणे आहे. मोदी म्हणतात, ‘बेटी बचाओ’, पण जेव्हा अत्याचार होतात, तेव्हा ते गप्प बसतात, असा टोलाही राहुल यांनी लगावला.सरकारकडून विरोधकांची गळचेपी - सोनिया गांधीसरकारी यंत्रणांचा वापर करून विरोधकांची गळचेपी करण्याचे प्रयत्न मोदी सरकारकडून होत आहेत, अशी टीका काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी जन आक्रोश सभेमध्ये बोलताना केली.लोकशाही धोक्यात! - मनमोहन सिंगगेल्या चार वर्षांमध्ये देशातील लोकशाही धोक्यात आली आहे, असा हल्ला डॉ. मनमोहन सिंग यांनी केला.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस