शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

मोदींच्या कौरवसेनेला निर्भीड काँग्रेसच रोखेल, राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 06:15 IST

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर ‘न भूतो’ अशी तोफ डागून, पक्षाच्या ८४व्या महाअधिवेशनाचा रविवारी घणाघाती समारोप केला.

- शीलेश शर्मानवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर ‘न भूतो’ अशी तोफ डागून, पक्षाच्या ८४व्या महाअधिवेशनाचा रविवारी घणाघाती समारोप केला. मोदी हे आडनाव आता भ्रष्टाचाराचे प्रतीक बनले आहे, असा थेट आरोप करून, आक्रमक राहुल गांधी यांनी मोदींच्या कौरवसेनेला निर्भीड काँग्रेस नक्कीच रोखेल, असा विश्वास व्यक्त केला.हजारो वर्षांनी महाभारताच्या युद्धासारखी परिस्थिती देशात निर्माण झाली आहे. एकीकडे संघ व भाजपाची कुटिल कौरवसेना आणि दुसरीकडे पांडवांच्या रूपाने काँग्रेस उभी आहे. कौरव असत्याची कास धरून सत्तेसाठी लढत आहेत, तर काँग्रेस पांडवांप्रमाणे सत्याच्या बाजूने उभी आहे. त्यामुळे भीती न बाळगता, या कौरवसेनेच्या विरोधात निर्धाराने उभे राहावे, अशी आश्वासक हाक त्यांनी काँग्रेसजनांना दिली. अलीकडच्या लोकसभा पोटनिवडणुकांमध्ये भाजपाच्या पराभवाने दुणावलेला विश्वास राहुल गांधींच्या तासाभराच्या भाषणात ठासून भरलेला होता.जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयश आल्याने काँग्रेसला सत्ता गमवावी लागली, याची कबुली देऊन राहुल म्हणाले की, आम्ही माणूस आहोत. आमच्याकडून चुका होतात. त्या आम्ही कबूलही करतो, परंतु पंतप्रधान मोदी स्वत:ला देव समजत असल्याने, ते चुका करूनही काही झाले तरी त्या कबूल करत नाहीत.>भाजपा सत्ताधुंद पक्ष - राहुल गांधीमोदींनी तोंडभरूनआश्वासने दिली, पणती पूर्ण केली नाहीत.मोदी ‘मेक इन इंडिया’च्या घोषणा करतात, पण बाजारपेठा चीनी उत्पादनांनी भरलेल्या आहेत.भाजपा व संघ कौरवांप्रमाणे केवळ सत्तेसाठी लढतात.भाजपावाले मुसलमानांना म्हणतात की, तुम्ही या देशातले नाही, तामिळींना म्हणतात की, तुमची भाषा बदला, ईशान्य भारतातील राज्यांतले लोक जे खातात, ते यांना पसंत नसते.भाजपा हा एका संघटनेचा आवाज, तर काँग्रेस हा या देशातील जनतेचा आवाजकाँग्रेस पक्ष जनतेचा सेवक आहे. बँकांत कोट्यवधींचे आर्थिक घोटाळे करून विदेशात पळून जाणाऱ्यांना भाजपा वाचवित आहे.देशातील युवकांनी मोदींवर विश्वास ठेवला. मोदींनी त्या विश्वासाला तडा दिला.काँग्रेस हा सत्यासाठी संघर्ष करणारा पक्ष आहे, कोणीही बळजबरीने आम्हाला गप्प बसवू शकणार नाही.इतर कोणत्याही पक्षापेक्षा काँग्रेसच देशाची अधिक प्रगती करू शकतो, हा जनतेला विश्वास आहे.राजकारणात चुका या होतातच, पण त्यातून शिकायलाही मिळते.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा