शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

मोदींच्या कौरवसेनेला निर्भीड काँग्रेसच रोखेल, राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 06:15 IST

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर ‘न भूतो’ अशी तोफ डागून, पक्षाच्या ८४व्या महाअधिवेशनाचा रविवारी घणाघाती समारोप केला.

- शीलेश शर्मानवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर ‘न भूतो’ अशी तोफ डागून, पक्षाच्या ८४व्या महाअधिवेशनाचा रविवारी घणाघाती समारोप केला. मोदी हे आडनाव आता भ्रष्टाचाराचे प्रतीक बनले आहे, असा थेट आरोप करून, आक्रमक राहुल गांधी यांनी मोदींच्या कौरवसेनेला निर्भीड काँग्रेस नक्कीच रोखेल, असा विश्वास व्यक्त केला.हजारो वर्षांनी महाभारताच्या युद्धासारखी परिस्थिती देशात निर्माण झाली आहे. एकीकडे संघ व भाजपाची कुटिल कौरवसेना आणि दुसरीकडे पांडवांच्या रूपाने काँग्रेस उभी आहे. कौरव असत्याची कास धरून सत्तेसाठी लढत आहेत, तर काँग्रेस पांडवांप्रमाणे सत्याच्या बाजूने उभी आहे. त्यामुळे भीती न बाळगता, या कौरवसेनेच्या विरोधात निर्धाराने उभे राहावे, अशी आश्वासक हाक त्यांनी काँग्रेसजनांना दिली. अलीकडच्या लोकसभा पोटनिवडणुकांमध्ये भाजपाच्या पराभवाने दुणावलेला विश्वास राहुल गांधींच्या तासाभराच्या भाषणात ठासून भरलेला होता.जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयश आल्याने काँग्रेसला सत्ता गमवावी लागली, याची कबुली देऊन राहुल म्हणाले की, आम्ही माणूस आहोत. आमच्याकडून चुका होतात. त्या आम्ही कबूलही करतो, परंतु पंतप्रधान मोदी स्वत:ला देव समजत असल्याने, ते चुका करूनही काही झाले तरी त्या कबूल करत नाहीत.>भाजपा सत्ताधुंद पक्ष - राहुल गांधीमोदींनी तोंडभरूनआश्वासने दिली, पणती पूर्ण केली नाहीत.मोदी ‘मेक इन इंडिया’च्या घोषणा करतात, पण बाजारपेठा चीनी उत्पादनांनी भरलेल्या आहेत.भाजपा व संघ कौरवांप्रमाणे केवळ सत्तेसाठी लढतात.भाजपावाले मुसलमानांना म्हणतात की, तुम्ही या देशातले नाही, तामिळींना म्हणतात की, तुमची भाषा बदला, ईशान्य भारतातील राज्यांतले लोक जे खातात, ते यांना पसंत नसते.भाजपा हा एका संघटनेचा आवाज, तर काँग्रेस हा या देशातील जनतेचा आवाजकाँग्रेस पक्ष जनतेचा सेवक आहे. बँकांत कोट्यवधींचे आर्थिक घोटाळे करून विदेशात पळून जाणाऱ्यांना भाजपा वाचवित आहे.देशातील युवकांनी मोदींवर विश्वास ठेवला. मोदींनी त्या विश्वासाला तडा दिला.काँग्रेस हा सत्यासाठी संघर्ष करणारा पक्ष आहे, कोणीही बळजबरीने आम्हाला गप्प बसवू शकणार नाही.इतर कोणत्याही पक्षापेक्षा काँग्रेसच देशाची अधिक प्रगती करू शकतो, हा जनतेला विश्वास आहे.राजकारणात चुका या होतातच, पण त्यातून शिकायलाही मिळते.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा