शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

काँग्रेस 'भारत जोडो यात्रे'चा दुसरा टप्पा सुरू करणार; 2024 च्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तयार होतोय प्लॅन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2023 21:07 IST

'भारत जोडो यात्रे'च्या पहिल्या टप्प्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांची नवी प्रतिमा देशासमोर उभी राहिली आहे, असे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचे मत आहे.

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या 'भारत जोडो यात्रे'चा पहिला टप्पा कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत पूर्ण केला आहे. नुकत्याच झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर काँग्रेस या 'भारत जोडो यात्रे'च्या परिणामाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहत आहे. त्यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राहुल गांधींच्या 'भारत जोडो यात्रे'च्या दुसऱ्या टप्प्याचा कार्यक्रम तयार करण्यात येत आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या वातावरणाचा पुरेपूर फायदा उठवता यावा यासाठी निवडणुकीपूर्वी ही यात्रा संपवण्याची काँग्रेसची रणनीती आहे.

'भारत जोडो यात्रे'च्या पहिल्या टप्प्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांची नवी प्रतिमा देशासमोर उभी राहिली आहे, असे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचे मत आहे. यामुळे 'भारत जोडो यात्रे'च्या दुसऱ्या टप्प्यात राहुल गांधी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरणार आहेत. 'भारत जोडो यात्रे'च्या दुसऱ्या टप्प्यात राहुल गांधी हे देशात पूर्वेकडून पश्चिमेकडे यात्रा करू शकतात. दुसऱ्या टप्प्यात अरुणाचल प्रदेशातून 'भारत जोडो यात्रा' सुरू होण्याची शक्यता असून गुजरातमधील पोरबंदरला जाऊन संपेल, असे म्हटले जात आहे. याआधी पोरबंदरमधून 'भारत जोडो यात्रे'ची सुरुवात होणार असल्याची बातमी समोर आली होती.

दुसऱ्या टप्प्यातील 'भारत जोडो यात्रे'त जवपास 3100 किलोमीटरचा प्रवास असणार आहे. पहिला टप्पा 3570 किलोमीटरचा होता. अरुणाचल प्रदेशातील परशुराम कुंड येथून प्रवास सुरू होऊ शकतो. दुसऱ्या टप्प्यातील प्रवासासाठी 140 ते 150 दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. याचबरोबर, या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता हायब्रीड ट्रॅव्हल्सचा पर्यायही ठेवण्यात आला आहे. याशिवाय, 2024 च्या निवडणुकीपूर्वी 'भारत जोडो यात्रे'च्या दुसऱ्या टप्प्याचा वेग कायम ठेवण्याची काँग्रेसची रणनीती आहे, जेणेकरून या पाठिंब्याचे मतांमध्ये रूपांतर करता येईल. इंग्लंड आणि अमेरिका दौऱ्यानंतर काँग्रेसला राहुल गांधींची नव्याने ओळख करायची आहे.

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी