शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

"काँग्रेस सत्तेत आल्यावर मोदी सरकारचे तिन्ही कृषी कायदे रद्द करेल"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2021 09:04 IST

उत्तर प्रदेशात शेतकरी पंचायतीला उपस्थिती

लखनौ : काँग्रेस सत्तेत आल्यावर मोदी सरकारने केलेले तिन्ही कृषी कायदे रद्द केले जातील, असे प्रतिपादन काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी बुधवारी सहारणपूर येथील शेतकऱ्यांच्या मेळाव्यात केले. ही शेतकरी पंचायत काँग्रेसने आयोजित केली होती. या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचा मोदी सरकार अपमान करीत आहे.   शेतकऱ्यांच्या विरोधात मोदी सरकार काम करीत आहे, असा आरोपही प्रियांका गांधी यांनी केला. हे तिन्ही कायदे राक्षसी असून, ते ताबडतोब रद्द होणे आवश्यक आहे, असे सांगून त्या म्हणाल्या की, या कायद्यांविरोधात काँग्रेस पक्ष सतत लढत राहील. काँग्रेस सातत्याने शेतकऱ्यांच्या बाजूने लढत राहिला आहे.   कृषी कायद्यांच्या विरोधात आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेसने उत्तर प्रदेशात मेळावे आयोजित करण्याचे ठरविले आहे. त्यातील हा पहिला मेळावा होता. उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागावर जोर देण्याचे ठरविले आहे. उत्तर प्रदेशात पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार असून, त्याची ही तयारी आहे. प्रियांका गांधी यांच्यावर उत्तर प्रदेशच्या पश्चिम विभागाची जबाबदारी आहे.सहारणपूर जिल्ह्यातील चिलकाना येथे बुधवारी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी किसान महापंचायतला उपस्थित होत्या. (इन्सेटमध्ये) राजस्थानमधील काँग्रेसच्या विधानसभा सदस्य इंदिरा मीना या बुधवारी जयपूरमध्ये विधानसभेत लक्षवेधीरीत्या पोहोचल्या. मीना या आंदोलक शेतकऱ्यांना पाठिंबा म्हणून अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी ट्रॅक्टरवर आल्या होत्या.शेतकऱ्यांचे आंदोलन जमीन, देश आणि मुलांसाठी...प्रियांका गांधी म्हणाल्या, ‘शेतकरी आंदोलन करीत आहेत, ते स्वत:चे जीवन, जमीन, देश आणि मुलांसाठी. जी व्यक्ती त्यांची थट्टा करते, त्यांना दहशतवादी व देशद्रोही ठरवले. ती कधीही देशभक्त असत नाही की, असणारही नाही. सत्ताधारी भाजपने शेतकऱ्यांना आश्वासन देऊनही साखर कारखान्यांकडून त्यांना पैसे मिळालेले नाहीत.’

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीFarmers Protestशेतकरी आंदोलन