शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

काँग्रेसचं ठरलं! मोदी सरकारला असं घेरणार, ३१ मार्चपासून 'महागाईमुक्त भारत अभियान'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2022 17:00 IST

देशातील वाढती महागाई आणि इंधनाच्या वाढत्या किमतीच्या मुद्द्यावरून काँग्रेस ३१ मार्च ते ७ एप्रिल दरम्यान 'महागाई मुक्त भारत अभियान' सुरू करणार आहे.

देशातील वाढती महागाई आणि इंधनाच्या वाढत्या किमतीच्या मुद्द्यावरून काँग्रेस ३१ मार्च ते ७ एप्रिल दरम्यान 'महागाई मुक्त भारत अभियान' सुरू करणार आहे. या मोहिमेची सुरुवात तीन टप्प्यात धरणे आंदोलनानं केली जाणार आहे. काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी ही माहिती दिली आहे. पत्रकार परिषदेला संबोधित करताना त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, मोदी सरकारने लोकांना महत्व न देता आपली तिजोरी भरण्याचा उद्योग सुरू केला आहे. 

महागाई आणि इंधनाच्या वाढत्या किमतींविरोधातील आंदोलनात राहुल गांधी आणि प्रियंका गांधीही सहभागी होणार असल्याचे सुरजेवाला यांनी सांगितले. सुरजेवाला म्हणाले की, इंधनाच्या सततच्या लूटमुळे सर्वसामान्यांच्या खिसे रिकामे होत आहेत. पण सरकारला त्याची पर्वा नाही. पाच दिवसांत आज चौथ्यांदा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाल्यावरून भाजप सरकारवर काँग्रेसनं हल्लाबोल केला. 

'राजा करे महल की तैयारी, प्रजा गरीबी महागाई की मारी' असे म्हणत राहुल गांधींनीही इंधनाच्या वाढत्या दरांवरून सरकारवर टीकास्त्र सोडलं. कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्याचा बोजा तेल कंपन्या ग्राहकांवर टाकत असून, त्यामुळे गेल्या पाच दिवसांत चौथ्यांदा दरात वाढ करण्यात आली आहे. नोव्हेंबर २०२१ नंतर पहिल्यांदाच २२ मार्च रोजी इंधनाच्या दरात वाढ करण्यात आली आणि तेव्हापासून सातत्यानं दर वाढत आहेत. 

सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम मार्केटिंग कंपन्यांनी जारी केलेल्या किमतीच्या अधिसूचनेनुसार, राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर आता ९७.८१ रुपये प्रति लिटरवरून ९८.६१ रुपये आणि डिझेलचा दर ८९.०६ रुपयांवरून ८९.८७ रुपये प्रति लिटर झाला आहे. . साडेचार महिने दर स्थिर राहिल्यानंतर २२ मार्च रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ८० पैशांनी वाढ करण्यात आली होती. तेव्हापासून दरात प्रतिलिटर ८०-८० पैशांनी तीन वेळा वाढ करण्यात आली आहे. एकूण चार वेळा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर एकूण ३.२० रुपयांनी वाढ झाली आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी