शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

गुजरातनंतर बिहारमध्येही काँग्रेसला लागणार गळती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2017 11:01 IST

गुजरातनंतर आता बिहारमध्येही काँग्रेस पार्टीला जोर का झटका लागणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गुजरातमध्ये काँग्रेस आपले आमदार फुटू नये, यासाठी तारेवरची कसरत करत आहे तर दुसरीकडे बिहारमध्येही पार्टीतील काही आमदार फुटणार असल्याची माहिती समोर आली आहे.

पाटणा, दि. 3 - गुजरातनंतर आता बिहारमध्येही काँग्रेस पार्टीला जोर का झटका लागणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गुजरातमध्ये काँग्रेस आपले आमदार फुटू नये, यासाठी तारेवरची कसरत करत आहे तर दुसरीकडे बिहारमध्येही पार्टीतील काही आमदार फुटणार असल्याची माहिती समोर आली आहे.

 बिहारमध्ये सध्याच्या  घडीला काँग्रेसचे 27 आमदार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,  आता काँग्रेसचे 9 आमदार जेडीयू-भाजपाच्या संपर्कात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे काही नेते बिहारमधील भाजपातील बड्या नेत्यांच्या संपर्कात आहेत. काही असे आमदार असे आहेत की जे बिहारमधील जेडीयू -भाजपाचं सरकार स्थापन झाल्यापासूनच जेडीयूच्या संपर्कात आहेत. 

दरम्यान, गुजरातमधील राज्यसभेच्या निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला जबरजस्त दणका बसला आहे. पार्टीतील वरिष्ठ नेते शंकर सिंह वाघेला यांनी पक्षाची साथ सोडली आहे.  याशिवाय, काँग्रेसच्या 6 आमदारांनाही पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजपाच्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे गुजरातमधील काँग्रेसच्या 44 आमदारांना बंगळुरूच्या रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले आहे.  यातील कर्नाटकचे ऊर्जामंत्री डी. के. शिवकुमार यांच्या निवासस्थानी प्राप्तिकर विभागाने बुधवारी ( 2 ऑगस्ट ) छापे घातले. या छाप्यामुळे राजकीय खळबळ माजली असून, आमच्या आमदारांवर दबाव आणण्यासाठीच छापे घालण्यात आले, असा आरोप काँग्रेसने केला आहे. 44 आमदारांना बंगळुरूला हलवलंगुजरातमध्ये ८ ऑगस्ट रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आपल्या ४४ आमदारांना भाजपाच्या ‘शिकारी’पासून वाचविण्यासाठी बंगळुरूत हलविलं. काँग्रेसच्या सहा आमदारांनी राजीनामा दिला असून, त्यातील तीन भाजपात दाखल झाले आहेत.काँग्रेसचे नेते अहमद पटेल गुजरातमधून राज्यसभा निवडणूक लढवीत आहेत. पक्षाच्या ५७ पैकी ६ आमदारांनी राजीनामा दिल्याने संकट उभे ठाकले आहे. काँग्रेसचे महासचिव निशित व्यास म्हणाले की, ४४ आमदारांना बंगळुुरूला हलविले आहे. व्यास या आमदारांसोबत आहेत. सुरक्षेसाठी हे पाऊल उचलले आहे. या आमदारांना धमक्या दिल्या जात आहेत, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी काँग्रेसचा हा आरोप खोडून काढताना हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. आमचा याच्याशी संबंध नाही, असा दावा केला.

दरम्यान यासंदर्भात भाजपातील एका वरिष्ठ नेत्यानं सांगितले की, ''राष्ट्रीय राजकारणात काँग्रेसचा दिवसेंदिवस स्तर खालावत आहे. यामुळे बिहारमधील काँग्रेसच्या आमदारांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे. नितीश कुमार यांनी काँग्रेसच्या आमदारांसोबत चांगले संबंध निर्माण केले आहेत. बिहारमधील काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चौधरी यांच्यासोबतही नितीश यांचे चांगले संबंध आहेत. यामुळे यामुळे काही आमदार जेडीयूच्या संपर्कात आहेत आणि काहींनी आमच्यासोबत संपर्क साधला आहे''.