शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

गुजरातनंतर बिहारमध्येही काँग्रेसला लागणार गळती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2017 11:01 IST

गुजरातनंतर आता बिहारमध्येही काँग्रेस पार्टीला जोर का झटका लागणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गुजरातमध्ये काँग्रेस आपले आमदार फुटू नये, यासाठी तारेवरची कसरत करत आहे तर दुसरीकडे बिहारमध्येही पार्टीतील काही आमदार फुटणार असल्याची माहिती समोर आली आहे.

पाटणा, दि. 3 - गुजरातनंतर आता बिहारमध्येही काँग्रेस पार्टीला जोर का झटका लागणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गुजरातमध्ये काँग्रेस आपले आमदार फुटू नये, यासाठी तारेवरची कसरत करत आहे तर दुसरीकडे बिहारमध्येही पार्टीतील काही आमदार फुटणार असल्याची माहिती समोर आली आहे.

 बिहारमध्ये सध्याच्या  घडीला काँग्रेसचे 27 आमदार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,  आता काँग्रेसचे 9 आमदार जेडीयू-भाजपाच्या संपर्कात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे काही नेते बिहारमधील भाजपातील बड्या नेत्यांच्या संपर्कात आहेत. काही असे आमदार असे आहेत की जे बिहारमधील जेडीयू -भाजपाचं सरकार स्थापन झाल्यापासूनच जेडीयूच्या संपर्कात आहेत. 

दरम्यान, गुजरातमधील राज्यसभेच्या निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला जबरजस्त दणका बसला आहे. पार्टीतील वरिष्ठ नेते शंकर सिंह वाघेला यांनी पक्षाची साथ सोडली आहे.  याशिवाय, काँग्रेसच्या 6 आमदारांनाही पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजपाच्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे गुजरातमधील काँग्रेसच्या 44 आमदारांना बंगळुरूच्या रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले आहे.  यातील कर्नाटकचे ऊर्जामंत्री डी. के. शिवकुमार यांच्या निवासस्थानी प्राप्तिकर विभागाने बुधवारी ( 2 ऑगस्ट ) छापे घातले. या छाप्यामुळे राजकीय खळबळ माजली असून, आमच्या आमदारांवर दबाव आणण्यासाठीच छापे घालण्यात आले, असा आरोप काँग्रेसने केला आहे. 44 आमदारांना बंगळुरूला हलवलंगुजरातमध्ये ८ ऑगस्ट रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आपल्या ४४ आमदारांना भाजपाच्या ‘शिकारी’पासून वाचविण्यासाठी बंगळुरूत हलविलं. काँग्रेसच्या सहा आमदारांनी राजीनामा दिला असून, त्यातील तीन भाजपात दाखल झाले आहेत.काँग्रेसचे नेते अहमद पटेल गुजरातमधून राज्यसभा निवडणूक लढवीत आहेत. पक्षाच्या ५७ पैकी ६ आमदारांनी राजीनामा दिल्याने संकट उभे ठाकले आहे. काँग्रेसचे महासचिव निशित व्यास म्हणाले की, ४४ आमदारांना बंगळुुरूला हलविले आहे. व्यास या आमदारांसोबत आहेत. सुरक्षेसाठी हे पाऊल उचलले आहे. या आमदारांना धमक्या दिल्या जात आहेत, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी काँग्रेसचा हा आरोप खोडून काढताना हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. आमचा याच्याशी संबंध नाही, असा दावा केला.

दरम्यान यासंदर्भात भाजपातील एका वरिष्ठ नेत्यानं सांगितले की, ''राष्ट्रीय राजकारणात काँग्रेसचा दिवसेंदिवस स्तर खालावत आहे. यामुळे बिहारमधील काँग्रेसच्या आमदारांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे. नितीश कुमार यांनी काँग्रेसच्या आमदारांसोबत चांगले संबंध निर्माण केले आहेत. बिहारमधील काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चौधरी यांच्यासोबतही नितीश यांचे चांगले संबंध आहेत. यामुळे यामुळे काही आमदार जेडीयूच्या संपर्कात आहेत आणि काहींनी आमच्यासोबत संपर्क साधला आहे''.