शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
3
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
4
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
5
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
6
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
7
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
8
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
9
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
10
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
11
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
12
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
13
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
14
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
15
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
16
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
17
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
18
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
19
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
20
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
Daily Top 2Weekly Top 5

राज्यसभेच्या १0 जागा काँग्रेस लढणार, सात जागी विजय निश्चित, तीन जागांसाठी पाठिंबा मिळवण्याचे प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 05:38 IST

वेगवेगळ््या राज्यांत काँग्रेसच्या असलेल्या सदस्यांच्या संख्येनुसार केवळ सात जागांवरील उमेदवार राज्यसभेत निवडून येऊ शकतात. परंतु, काँग्रेस पक्षाने मात्र दहा जागांवर आमचे उमेदवार निवडून येऊ शकतात असा दावा केला आहे.

- शीलेश शर्मानवी दिल्ली - वेगवेगळ््या राज्यांत काँग्रेसच्या असलेल्या सदस्यांच्या संख्येनुसार केवळ सात जागांवरील उमेदवार राज्यसभेत निवडून येऊ शकतात. परंतु, काँग्रेस पक्षाने मात्र दहा जागांवर आमचे उमेदवार निवडून येऊ शकतात असा दावा केला आहे.पक्षाकडील एकूण आमदारांच्या संख्येचा विचार करता कर्नाटकातून तीन, महाराष्ट्रातून एक, गुजरातेतून दोन व मध्य प्रदेशातून एक उमेदवार निवडून येणे निश्चित आहे. याशिवाय काँग्रेस झारखंड, पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये आपला एकेक उमेदवार मैदानात उतरवणार आहे. पक्ष सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसाZ झारखंडमधून अभिषेक मनु सिंघवी उमेदवार असू शकतात. कारण, झारखंड मुक्ती मोर्चाचा त्यांना नि़श्चितपणे ला पाठिंबा मिळणार आहे. बिहारमध्ये लालू प्रसाद यादव यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय जनता दलाच्या पाठिंब्याने काँग्रेस एक उमेदवार रिंगणात उतरवणार आहे. शक्यता अशी आहे की बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना झटका देण्यासाठी काँग्रेस राज्यात शरद यादव यांना पाठिंबा देऊ शकते. त्याचे कारण असे की, यादव यांचे राज्यसभेचे सदस्यत्व नितीश कुमार यांच्या सांगण्यावरून भाजपशी हातमिळवणी करीत रद्द केले गेले आहे. सध्या हे प्रकरण न्यायालयात आहे.पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस मार्क्सवादी पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांना पाठिंबा द्यायला तयार आहे. परंतु, माकपच्या पॉलिट ब्युरोची इच्छा काँग्रेसने माकपच्या पाठिंब्याने रिंगणात उतरणाºया अराजकीय अशा बुद्धीजीवी नेत्याला पाठिंबा द्यावा, अशी आहे.माकपची ही इच्छा काँग्रेसला अजिबात मान्य नसल्यामुळे ती नाकारण्यात आल्याचे पक्ष सूत्रांनी सांगितले. आमचा पाठिंबा फक्त येचुरी यांना असेल अन्यथा आम्ही आमचा उमेदवार उभा करू, असे काँग्रेसने म्हटले आहे.काँग्रेस आपल्या उमेदवाराला पश्चिम बंगालमधून निवडून आणण्यासाठी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसशी मैत्री करून अतिरिक्त मते मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. अशाच रितीने कर्नाटकातून तीन, महाराष्ट्रातून एक, गुजरातेतून दोन, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार व झारखंडमधून प्रत्येकी एका उमेदवाराला राज्यसभेत काँग्रेसच्या तिकिटावर पाठवण्याचे गणित पक्षाने तयार केले आहे.पुढील महिन्यात राज्यसभेच्या ५५ सदस्यांची मुदत पूर्ण होत आहे, काही जण पुन्हा राज्यसभेवर निवडले जाऊ शकतात. उमेदवार कोण असतील हे पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी लवकरच निश्चित करणार आहेत.

टॅग्स :congressकाँग्रेस