शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता ट्रम्प आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉनही जाणार यांच्या पक्षात, कारण...!"; राऊतांचा भाजपाला बोचरा टोमणा 
2
महायुतीत खदखद वाढली, इच्छुकांच्या नाराजीचा भूकंप?; काठावर बसलेले मविआच्या संपर्कात
3
Municipal Corporation Election: विदर्भात महायुतीचे ठरले! चार महापालिकांत शिंदेसेना, तर दोन ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत
4
बांगलादेशात क्रूरतेचा कळस! दीपू दास हत्याकांडात ४ आरोपींची गुन्ह्याची कबुली; पोलीस म्हणाले...
5
किडनी विक्रीतून रामकृष्णने घेतली २० एकर जमीन; फेसबुक ग्रुपद्वारे विणले अवयव तस्करीसाठी एजंटांचे जाळे
6
नव्या वर्षापासून UPI साठी लागू होणार नवा नियम; ई-कॉमर्स कंपन्यांच्या चलाखीवर बसणार चाबूक, प्रकरण काय?
7
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये जाणार की उद्धवसेनेत?; उद्धव ठाकरेंचा फोन, पुण्यात राजकीय ट्विस्ट
8
नवीन वर्षात गुंतवणुकीचा श्रीगणेशा! 'या' आहेत श्रीमंत करणाऱ्या टॉप ५ योजना; सुरक्षा आणि दमदार परतावा
9
खोपोलीत शिंदेसेनेच्या नगरसेविकेच्या पतीची हत्या! मुलाला शाळेत सोडून परत येत असताना केला हल्ला
10
Vijay Hazare Trophy : कोण आहे Devendra Bora? ज्याच्यासमोर हिटमॅन रोहित 'गोल्डन डक'सह ठरला फ्लॉप
11
भारतातील युपीआय व्यवहारांत मोठी प्रादेशिक दरी; महाराष्ट्र अग्रस्थानी तर बिहार पिछाडीवर, कारण काय?
12
तुमची इंडिगो फ्लाइट रद्द झाली होती का? आजपासून १०,००० रुपयांचे व्हाउचर मिळणार
13
Video : पंतप्रधान मोदींचा कार्यक्रम उरकला अन् शोभेसाठी लावलेल्या झाडाच्या कुंड्या लोकांनी पळवल्या!
14
२७ महापालिकांत कुणाचे किती नगरसेवक? गेल्यावेळी भाजपचे...; ४३९ जागा जिंकून काँग्रेस होती तिसऱ्या क्रमांकावर
15
Stock Markets Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; Sensex १५० अंकांनी घरसला, BEL टॉप गेनर
16
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
17
विकी-कतरिनाच्या लेकाचा पहिला ख्रिसमस, अभिनेत्रीने शेअर केला फोटो; चाहते म्हणाले...
18
Investment Tips For Working Women: नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ६ विश्वासार्ह गुंतवणूक योजना; तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासू देणार नाहीत
19
‘माझा मुलगा वर्षावर मला भेटायला टॅक्सीने यायचा’; पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळातील किस्सा सांगितला
20
बांगलादेशात खळबळ! १७ वर्षांनंतर तारिक रहमान मायदेशी परतले; येताच मोहम्मद युनूस यांना केला फोन!
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राची कृषी कायद्यांवर माघार, काँग्रेस साजरा करणार 'शेतकरी विजय दिवस'; शनिवारी संपूर्ण देशभरात होणार सेलिब्रेशन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2021 20:42 IST

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या काँग्रेस पक्षानंही आता कृषी कायद्यांवरुन सरकारला एक पाऊल मागे घ्यावं लागल्यानं आता जोरदार सेलिब्रेशन करण्याचं ठरवलं आहे. 

नवी दिल्ली-केंद्र सरकारनं आज वादग्रस्त ठरलेले तीन कृषी कायदे आज मागे घेत असल्याचं जाहीर केलं आणि मोदी सरकार बॅकफूटवर आल्याचं पाहायला मिळालं. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी ९ वाजता जनतेशी संवाद साधत तिन्ही कृषी कायदे मागे घेत असल्याची घोषणा केली. मोदींच्या या घोषणेनंतर आंदोलक शेतकऱ्यांनी लढ्याला यश आल्याची भावना व्यक्त केली आहे. तर विरोधकांनी मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या काँग्रेस पक्षानंही आता कृषी कायद्यांवरुन सरकारला एक पाऊल मागे घ्यावं लागल्यानं आता जोरदार सेलिब्रेशन करण्याचं ठरवलं आहे. 

शेतकऱ्यांवर अन्याय करणारे तीन कृषी कायदे आज रद्द झाल्याबद्दल आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनाला मोठं यश प्राप्त झाल्याचं सेलिब्रेशन संपूर्ण देशभरात करणार असल्याचं काँग्रेस पक्षानं ठरवलं आहे. शनिवारी २० नोव्हेंबर रोजी संपूर्ण देशभरात काँग्रेसच्या वतीनं 'शेतकरी विजय दिवस' (Kisan Vijay Diwas) साजरा करण्यात येणार आहे. काँग्रेसचे महासचिव केसी वेणुगोपाल यांनी सर्व राज्यांच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांना २० नोव्हेंबरला शेतकरी विजय दिवस साजरा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याअंतर्गत ठिकठिकाणी रॅली आणि आंदोलनात प्राणांची आहुती दिलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली म्हणून कँडल मार्च आयोजित करण्याची सूचना देण्यात आली आहे. 

वेणुगोपाल यांनी सर्व राज्यांच्या काँग्रेस प्रभारींना पत्र लिहिलं असून यात शेतकरी आंदोलन आणि त्यांचं बलिदान व काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली एकजूट होऊन केल्या गेल्या आंदोलनानंतर जाचक तीन कृषी कायदे रद्द केले गेले आहेत. आज सर्वांनी एकजुटीनं वाईटावर मात केली आहे आणि हे यश देशाच्या पोशिंद्याला समर्पित आहे, असं म्हटलं आहे. 

मोदींनी आज जनतेसमोर येत मागे घेतले कृषी कायदेपंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला. देशवासीयांना संबोधित करताना मोदींनी हा निर्णय घोषित केला आहे. आंदोलक शेतकऱ्यांनी त्यांच्या घरी जावं, शेतात जाऊन काम सुरू करावं, एक नवी सुरुवात करावी, असं आवाहन मोदींनी केलं. 

शेतकऱ्यांना ताकद देण्यासाठी अतिशय प्रामाणिकपणे देशात तीन कृषी कायदे आणले. शेतकऱ्यांच्या उत्पादनांना चांगला भाव मिळावा, त्यांना शेतमाल विकण्यासाठी अनेक पर्याय मिळावे हा उद्देश त्यामागे होता. कित्येक वर्षांपासून ही अनेकांची मागणी होती. आधीही काही सरकारांनी यावर मंथन केलं होतं. यावेळीही चर्चा करुन हे कायदे आणले. देशातील अनेक शेतकऱ्यांनी याचं स्वागत केलं. मी आज त्या सर्वांचे आभार मानतो. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आम्ही तीन कायदे आणले. मात्र इतक्या प्रयत्नानंतरही काही शेतकऱ्यांना आम्ही ही गोष्ट समजावू शकलो नाही. कदाचित आमच्या प्रयत्नांमध्ये काही उणीव, त्रुटी राहिली असेल. त्यामुळे तीन कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, असं मोदींनी जाहीर केलं.

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपcongressकाँग्रेस