शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
3
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
4
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
5
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
6
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
7
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
8
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
9
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
10
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
11
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
12
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
13
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
14
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
15
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
16
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
17
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
18
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
19
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार

चित्ता इव्हेंट केवळ 'तमाशा', 'भारत जोडो' यात्रेवर निघालाय आमचा खरा वाघ!; काँग्रेसनं करुन दिली 'ती' आठवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2022 17:01 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशात कुनो राष्ट्रीय उद्यानात नामिबियाहून आणलेल्या चित्त्यांना सोडण्यात आलं.

नवी दिल्ली-

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशात कुनो राष्ट्रीय उद्यानात नामिबियाहून आणलेल्या चित्त्यांना सोडण्यात आलं. तब्बल ७० वर्षांनंतर भारतात चित्त्यांनी पाऊल ठेवलं. काँग्रेसनं मोदी सरकारच्या या योजनेवर टीका करत 'भारत जोडो' यात्रेवरुन लक्ष विचलीत करण्यासाठीचा इव्हेंट असल्याचं म्हटलं आहे. काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी आपल्या ट्विटमध्ये प्रोजेक्ट चित्तासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला नाही याबाबत खंत व्यक्त केली आहे. पंतप्रधान मोदी कधीच प्रशासन ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया असल्याचं स्वीकारत नाहीत, असा आरोप त्यांनी केला आहे. 

जयराम रमेश यांनी यावेळी पंतप्रधान मोदींना काँग्रेस सरकारच्या काळात त्यांनी चित्ता भारतात आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची आठवण करुन दिली. यावेळी त्यांनी केपटाउनमध्ये चित्त्यासोबत टिपलेला एक फोटो देखील ट्विट केला आहे. "पंतप्रधान मोदी क्वचितच प्रशासन एक निरंतर चालणारी प्रक्रिया असल्याचं स्वीकारतात. चित्ता प्रोजेक्टसाठी २४-०४-२०१० रोजी केपटाऊनमधील माझ्या दौऱ्याचा साधा उल्लेखही न करणं हे याचं ताजं उदाहरण आहे. आज पंतप्रधान मोदींनी विनाकारण तमाशा केला. राष्ट्रीय प्रश्न आणि राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेपासून लक्ष विचलीत करण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत", असं जयराम रमेश यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

२००९-११ साली जेव्हा पहिल्यांदा वाघांना पन्ना आणि सरिस्का येथे स्थलांतरित करण्यात आलं होतं. तेव्हा अनेकांनी शंका उपस्थित केली होती. शंका उपस्थित करणारे सर्व चुकीचे ठरले होते. चित्ता प्रोजेक्टच्या बाबतीत देखील तशीच भविष्यवाणी केली जात आहे. यात सहभागी झालेले प्रोफेशनल्स खूप निपूण आहेत. या प्रोजेक्टसाठी माझ्या शुभेच्छा आहेत, असंही जयराम रमेश यांनी म्हटलं आहे. 

या संपूर्ण घटनेवर काँग्रेस नेते पवन खेरा यांनीही टीका केली आहे. आपल्या ट्विटर हँडलवर जयराम रमेश यांचे ट्विट रिट्विट करत त्यांनी आपला वाघ यावेळी देशाला जोडण्यासाठी बाहेर पडला आहे, त्यामुळे देश तोडणारे परदेशातून चित्ते आणत आहेत, असं म्हटलं आहे. 

७० वर्षांनंतर भारतात परतले चित्तेपंतप्रधान मोदींनी शनिवारी मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्क (KNP) येथे नामिबियातून आणलेल्या चित्त्यांना विशेष बंदोबस्तात सोडले. यावेळी मोदींनी आपल्या प्रोफेशनल कॅमेऱ्यानं चित्त्यांची काही फोटोही टिपले. मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमधील या चित्त्यांवर भारतातील नामशेष होणाऱ्या प्रजातींची संख्या पुन्हा वाढवण्याची जबाबदारी असेल. हे चित्ते नोव्हेंबर 2021 मध्येच भारतात पोहोचणार होते, परंतु कोरोना महामारीमुळे प्रक्रिया मंदावली. सुरुवातीला 8 चित्ते कुनो येथे पोहोचले आहेत. येत्या पाच वर्षात चित्यांची संख्या 50 पर्यंत वाढवण्याची तयारी आहे, म्हणजेच या प्रक्रियेतून आणखी बरेच चित्ते येण्याच्या तयारीत आहेत.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस