शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

चित्ता इव्हेंट केवळ 'तमाशा', 'भारत जोडो' यात्रेवर निघालाय आमचा खरा वाघ!; काँग्रेसनं करुन दिली 'ती' आठवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2022 17:01 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशात कुनो राष्ट्रीय उद्यानात नामिबियाहून आणलेल्या चित्त्यांना सोडण्यात आलं.

नवी दिल्ली-

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशात कुनो राष्ट्रीय उद्यानात नामिबियाहून आणलेल्या चित्त्यांना सोडण्यात आलं. तब्बल ७० वर्षांनंतर भारतात चित्त्यांनी पाऊल ठेवलं. काँग्रेसनं मोदी सरकारच्या या योजनेवर टीका करत 'भारत जोडो' यात्रेवरुन लक्ष विचलीत करण्यासाठीचा इव्हेंट असल्याचं म्हटलं आहे. काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी आपल्या ट्विटमध्ये प्रोजेक्ट चित्तासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला नाही याबाबत खंत व्यक्त केली आहे. पंतप्रधान मोदी कधीच प्रशासन ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया असल्याचं स्वीकारत नाहीत, असा आरोप त्यांनी केला आहे. 

जयराम रमेश यांनी यावेळी पंतप्रधान मोदींना काँग्रेस सरकारच्या काळात त्यांनी चित्ता भारतात आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची आठवण करुन दिली. यावेळी त्यांनी केपटाउनमध्ये चित्त्यासोबत टिपलेला एक फोटो देखील ट्विट केला आहे. "पंतप्रधान मोदी क्वचितच प्रशासन एक निरंतर चालणारी प्रक्रिया असल्याचं स्वीकारतात. चित्ता प्रोजेक्टसाठी २४-०४-२०१० रोजी केपटाऊनमधील माझ्या दौऱ्याचा साधा उल्लेखही न करणं हे याचं ताजं उदाहरण आहे. आज पंतप्रधान मोदींनी विनाकारण तमाशा केला. राष्ट्रीय प्रश्न आणि राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेपासून लक्ष विचलीत करण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत", असं जयराम रमेश यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

२००९-११ साली जेव्हा पहिल्यांदा वाघांना पन्ना आणि सरिस्का येथे स्थलांतरित करण्यात आलं होतं. तेव्हा अनेकांनी शंका उपस्थित केली होती. शंका उपस्थित करणारे सर्व चुकीचे ठरले होते. चित्ता प्रोजेक्टच्या बाबतीत देखील तशीच भविष्यवाणी केली जात आहे. यात सहभागी झालेले प्रोफेशनल्स खूप निपूण आहेत. या प्रोजेक्टसाठी माझ्या शुभेच्छा आहेत, असंही जयराम रमेश यांनी म्हटलं आहे. 

या संपूर्ण घटनेवर काँग्रेस नेते पवन खेरा यांनीही टीका केली आहे. आपल्या ट्विटर हँडलवर जयराम रमेश यांचे ट्विट रिट्विट करत त्यांनी आपला वाघ यावेळी देशाला जोडण्यासाठी बाहेर पडला आहे, त्यामुळे देश तोडणारे परदेशातून चित्ते आणत आहेत, असं म्हटलं आहे. 

७० वर्षांनंतर भारतात परतले चित्तेपंतप्रधान मोदींनी शनिवारी मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्क (KNP) येथे नामिबियातून आणलेल्या चित्त्यांना विशेष बंदोबस्तात सोडले. यावेळी मोदींनी आपल्या प्रोफेशनल कॅमेऱ्यानं चित्त्यांची काही फोटोही टिपले. मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमधील या चित्त्यांवर भारतातील नामशेष होणाऱ्या प्रजातींची संख्या पुन्हा वाढवण्याची जबाबदारी असेल. हे चित्ते नोव्हेंबर 2021 मध्येच भारतात पोहोचणार होते, परंतु कोरोना महामारीमुळे प्रक्रिया मंदावली. सुरुवातीला 8 चित्ते कुनो येथे पोहोचले आहेत. येत्या पाच वर्षात चित्यांची संख्या 50 पर्यंत वाढवण्याची तयारी आहे, म्हणजेच या प्रक्रियेतून आणखी बरेच चित्ते येण्याच्या तयारीत आहेत.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस