शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

"मोदी सरकारने दुसऱ्या लाटेदरम्यान केलेल्या अक्षम्य बेजबाबदारपणामुळे लोकांना गमवावा लागला जीव"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2021 15:53 IST

Congress Sonia Gandhi And PM Narendra Modi : सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

नवी दिल्ली - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांची संख्या तीन कोटींच्या वर गेली असून साडे चार लाखांहून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे. देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. याच दरम्यान काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Congress Sonia Gandhi) यांनी मोदी सरकारवर (Modi Government) टीकास्त्र सोडलं आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये केंद्र सरकारने गंभीर चुका केल्याचा फटका देशाला सहन करावा लागल्याचं म्हटलं आहे. एका हिंदी दैनिकात त्यांनी लिहिलेल्या "हम कैसे भूल जाएंगे वो दौर" या लेखामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. 

सोनिया गांधी यांनी 100 कोटी लसीकरण झाल्यानंतर संशोधक, डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं आहे. मात्र त्याचसोबत त्यांनी मोदी सरकारवर देखील जोरदार टीका केली. "मोदी सरकारने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान दाखवलेल्या अक्षम्य बेजबाबदारपणामुळे लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी मोदी सरकारने अवलंबलेलं धोरण दु:खद आणि दुर्दैवी आहे. देशात जेव्हा कोरोनाची दुसरी लाट सर्वोच्च बिंदूवर होती, तेव्हा मोदी सरकारच्या बेजबाबदारपणामुळे सातत्याने लोकांचे जीव जात होते."

"कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान नरेंद्र मोदी-अमित शहा झाले होते गायब"

"इतक्या वेळा इशारा देऊन देखील एखादं सरकार इतकं निष्क्रिय कसं राहू शकतं हे समजण्याच्या पलीकडचं आहे" असं सोनिया गांधी य़ांनी आपल्या लेखात म्हटलं आहे. "आज आपण 100 कोटी लसीचे डोस देण्यात यशस्वी ठरलो आहोत, तर त्याचं श्रेय डॉक्टर, नर्स आणि लसीकरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं आहे. लसीची व्यवस्था आणि वितरण करण्यात अयशस्वी ठरलेल्या सरकारमधील लोकांना त्याचं श्रेय जात नाही" असं देखील सोनिया यांनी नमूद केलं आहे. मोदी आणि शाहंवर देखील त्यांनी हल्लाबोल केला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गायब झाले होते असं म्हटलं आहे. 

"पंतप्रधानांच्या वाढदिवशी 2 कोटींहून जास्त लसीकरण झालं, पण हे रोज का नाही होऊ शकत?"

"त्या भीषण काळात पंतप्रधान आणि गृहमंत्री गायब झाले होते, पण जशी कोरोनाची परिस्थिती सुधारली, ते पुन्हा समोर आले. पहिल्या लाटेदरम्यान अचानक लॉकडाऊनची घोषणा करून मजुरांना वाईट अवस्थेवर सोडून देण्यात आल्यासारखाच हा प्रकार आहे" अशा शब्दांत निशाणा साधला. "मोदी सरकार अजूनही कोरोनाविरोधातल्या लढ्याला इव्हेंट मॅनेजमेंटची संधी समजत आहे. पंतप्रधानांच्या वाढदिवशी 2 कोटींहून जास्त लसीकरण झालं, पण हे रोज का होऊ शकत नाही? कारण वाढदिवसाच्या आधी लसींची साठेबाजी केली गेली" असं देखील सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसcorona virusकोरोना वायरस बातम्या