शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

‘इंडिया’चे नेतृत्व सोडण्याची काँग्रेसने तयारी ठेवावी; ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 07:48 IST

इंडिया आघाडीचे नेतृत्व कुणाकडे असावे याची चिंता करण्याची गरज नाही.

नवी दिल्ली : विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीच्या नेतृत्वावरून वेगवेगळे कयास लावले जात असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी काँग्रेसने इंडिया आघाडीचे नेतृत्व सोडण्यास तयार राहावे, असा सल्ला दिला आहे. ज्या कुणाला याचे नेतृत्व करायचे आहे त्यांना करू द्यावे, असे सांगून ममता बॅनर्जींसह इतर पक्षांतील अनेक नेत्यांत ही पात्रता असल्याचेही अय्यर यांनी नमूद केले.

एका माध्यम समूहाला दिलेल्या मुलाखतीत अय्यर यांनी म्हटले आहे की, इंडिया आघाडीचे नेतृत्व कुणाकडे असावे याची चिंता करण्याची गरज नाही. कारण काँग्रेस आणि या पक्षाच्या नेत्यांची भूमिका हा पक्ष एकटा असला काय किंवा आघाडीत असला काय, नेहमीच महत्त्वाची राहील. राहुल गांधी यांना इंडिया आघाडीचे अध्यक्ष म्हणून जी प्रतिष्ठा मिळेल त्यापेक्षा काँग्रेस नेते म्हणून कितीतरी अधिक प्रतिष्ठा मिळेल, असा दावाही त्यांनी केला.

लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीने चांगले यश मिळवले. सत्ताधारी भाजपला बहुमतापासून दूर ठेवण्यात आघाडीला यश आले. मात्र, नंतर झालेल्या राज्य विधानसभा निवडणुकीत हे यश टिकले नाही. विशेषत: महाराष्ट्रात आघाडीला मोठा पराभव स्वीकारावा लागला होता. शिवाय, तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करून संधी मिळाली तर आघाडीचे नेतृत्व करण्याची तयारी दर्शवली होती. या पार्श्वभूमीवर मणिशंकर अय्यर यांचे हे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी