शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

‘इंडिया’चे नेतृत्व सोडण्याची काँग्रेसने तयारी ठेवावी; ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 07:48 IST

इंडिया आघाडीचे नेतृत्व कुणाकडे असावे याची चिंता करण्याची गरज नाही.

नवी दिल्ली : विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीच्या नेतृत्वावरून वेगवेगळे कयास लावले जात असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी काँग्रेसने इंडिया आघाडीचे नेतृत्व सोडण्यास तयार राहावे, असा सल्ला दिला आहे. ज्या कुणाला याचे नेतृत्व करायचे आहे त्यांना करू द्यावे, असे सांगून ममता बॅनर्जींसह इतर पक्षांतील अनेक नेत्यांत ही पात्रता असल्याचेही अय्यर यांनी नमूद केले.

एका माध्यम समूहाला दिलेल्या मुलाखतीत अय्यर यांनी म्हटले आहे की, इंडिया आघाडीचे नेतृत्व कुणाकडे असावे याची चिंता करण्याची गरज नाही. कारण काँग्रेस आणि या पक्षाच्या नेत्यांची भूमिका हा पक्ष एकटा असला काय किंवा आघाडीत असला काय, नेहमीच महत्त्वाची राहील. राहुल गांधी यांना इंडिया आघाडीचे अध्यक्ष म्हणून जी प्रतिष्ठा मिळेल त्यापेक्षा काँग्रेस नेते म्हणून कितीतरी अधिक प्रतिष्ठा मिळेल, असा दावाही त्यांनी केला.

लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीने चांगले यश मिळवले. सत्ताधारी भाजपला बहुमतापासून दूर ठेवण्यात आघाडीला यश आले. मात्र, नंतर झालेल्या राज्य विधानसभा निवडणुकीत हे यश टिकले नाही. विशेषत: महाराष्ट्रात आघाडीला मोठा पराभव स्वीकारावा लागला होता. शिवाय, तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करून संधी मिळाली तर आघाडीचे नेतृत्व करण्याची तयारी दर्शवली होती. या पार्श्वभूमीवर मणिशंकर अय्यर यांचे हे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी