शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
2
अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
3
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
4
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
5
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
6
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
7
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
8
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
9
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन
10
धक्कादायक! अखेर ७ सिंहांना मृत्यूदंडाची शिक्षा; 'जंगलाच्या राजा'ला मारण्याची तयारी कोण करतंय?
11
₹१६०० पर्यंत जाणार Paytm चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, आजही शेअरमध्ये मोठी तेजी
12
'एकाच ठिकाणी.. कुठे तरी राहा' राज ठाकरेंनी पिट्याभाईला सुनावले
13
...अन् व्हीलचेअरवर बसलेल्या प्रतीकासाठी PM मोदींनी स्वतः आणून दिला तिच्या आवडीचा पदार्थ (VIDEO)
14
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
15
Video - बापाची धडपड! ट्रॅफिकमध्ये अडकलेली रुग्णवाहिका, आजारी लेकीला उचलून घेऊन...
16
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
17
अमित शाहांनी म्हटलं, 'पिंटू बडा आदमी बनेगा'; काही क्षणांनी भाजपा उमेदवाराचा अश्लील व्हिडिओ व्हायरल
18
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
19
Mahabharat: शुक्राचार्यांना एकच डोळा का? ते शिवपुत्र होते? नावामागेही आहे रोचक कथा!
20
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी

‘इंडिया’चे नेतृत्व सोडण्याची काँग्रेसने तयारी ठेवावी; ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 07:48 IST

इंडिया आघाडीचे नेतृत्व कुणाकडे असावे याची चिंता करण्याची गरज नाही.

नवी दिल्ली : विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीच्या नेतृत्वावरून वेगवेगळे कयास लावले जात असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी काँग्रेसने इंडिया आघाडीचे नेतृत्व सोडण्यास तयार राहावे, असा सल्ला दिला आहे. ज्या कुणाला याचे नेतृत्व करायचे आहे त्यांना करू द्यावे, असे सांगून ममता बॅनर्जींसह इतर पक्षांतील अनेक नेत्यांत ही पात्रता असल्याचेही अय्यर यांनी नमूद केले.

एका माध्यम समूहाला दिलेल्या मुलाखतीत अय्यर यांनी म्हटले आहे की, इंडिया आघाडीचे नेतृत्व कुणाकडे असावे याची चिंता करण्याची गरज नाही. कारण काँग्रेस आणि या पक्षाच्या नेत्यांची भूमिका हा पक्ष एकटा असला काय किंवा आघाडीत असला काय, नेहमीच महत्त्वाची राहील. राहुल गांधी यांना इंडिया आघाडीचे अध्यक्ष म्हणून जी प्रतिष्ठा मिळेल त्यापेक्षा काँग्रेस नेते म्हणून कितीतरी अधिक प्रतिष्ठा मिळेल, असा दावाही त्यांनी केला.

लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीने चांगले यश मिळवले. सत्ताधारी भाजपला बहुमतापासून दूर ठेवण्यात आघाडीला यश आले. मात्र, नंतर झालेल्या राज्य विधानसभा निवडणुकीत हे यश टिकले नाही. विशेषत: महाराष्ट्रात आघाडीला मोठा पराभव स्वीकारावा लागला होता. शिवाय, तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करून संधी मिळाली तर आघाडीचे नेतृत्व करण्याची तयारी दर्शवली होती. या पार्श्वभूमीवर मणिशंकर अय्यर यांचे हे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी