शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
3
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
4
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
5
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
6
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
7
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
8
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
9
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
10
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
11
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
12
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
13
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
14
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
15
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
16
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
17
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
18
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
19
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
20
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर

आउट होऊनही काँग्रेसला सतत हवी असते बॅटिंग- पंतप्रधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 06:01 IST

भारताचे तुकडे काँग्रेसनेच केले. तुमच्या पापाची किंमत देशाला मोजावी लागत आहे. सरदार पटेल पंतप्रधान असते, तर काश्मीर भारताच्या ताब्यात असता, अशी आरोपवजा टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी संसदेत केली.

सुरेश भटेवरा नवी दिल्ली : भारताचे तुकडे काँग्रेसनेच केले. तुमच्या पापाची किंमत देशाला मोजावी लागत आहे. सरदार पटेल पंतप्रधान असते, तर काश्मीर भारताच्या ताब्यात असता, अशी आरोपवजा टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी संसदेत केली. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार प्रस्तावावर बोलताना, मोदींनी दोन्ही सभागृहांत दीड तासांची भाषणे केली. त्या वेळी सभागृहांत काँग्रेस, तेलगू देसमसह अन्य विरोधकांची घोषणाबाजी व गदारोळ सुरू होता.त्यानंतर, काँग्रेसचे नेते आनंद शर्मा म्हणाले की, मोदींच्या भाषणांचा बाज निवडणूक प्रचाराचा होता. गांधी-नेहरू परिवार व काँग्रेसच्या ५५ राजवटीवर, टीका करताना, आपली कारकिर्द संपत आल्याचे ते विसरून गेले. ज्या मुद्द्यांवर त्यांनी काँग्रेसवर हल्ला चढविला, त्यापैकी एकाही विषयाचे उत्तर मोदींना ४ वर्षांत शोधता आले नाही.मोदी म्हणाले, यूपीए सरकार असताना सरकारी बँकांचा १८ लाख कोटींचा एनपीए ५२ लाख कोटींवर गेला. बँकांची ही लूट कोणी घडविली? हे पाप आमच्या सरकारचे नाही. आमच्या काळात बँकांनी एकही असे कर्ज दिले नाही की, ज्यामुळे बँकांच्या एनपीएमध्ये भर पडली.>सभागृहांमध्ये रणकंदनपंतप्रधानांचे भाषण सुरू असताना दोन्ही सभागृहांत सत्ताधारी विरुद्ध विरोधक असे रणकंदनच सुरू होते.मोदींच्या प्रत्येक मुद्द्यावर सत्ताधारी सदस्य बाके वाजवून विरोधकांना खिजवायचे, तर काँग्रेससह अन्य विरोधक या वेळी ‘पंतप्रधान मोदी जुमलेबाजी बंद करो’, ‘झूठा भाषण बंद करो, मॅच फिक्सिंग बंद करो’, ‘आंध्र प्रदेशके मुद्देपर ड्रामेबाजी बंद करो’, ‘धमकी देना बंद करो, झांसा देना बंद करो’, ‘राफेल डिल मे क्या हुवा?; अशा घोषणा देत होते. या गोंधळातच पंतप्रधानांचे भाषण पार पडले.> राक्षसी हास्यबोलण्याच्या ओघात मोदींनी आधार कार्ड संकल्पनेचे श्रेय लालकृष्ण अडवाणींना दिले, तेव्हा काँग्रेसच्या रेणुका चौधरी जोरात हसू लागल्या.सभापती नायडू त्यांच्या हास्यावर नाराजी व्यक्त करीत असतानाच त्यांना थांबवून मोदी यांनी ‘रामायण’ या मालिकेनंतर बºयाच वर्षांनी असे हास्य ऐकायला मिळाले,’ असा कडवट शेरा मारून, चौधरी यांच्या हसण्याची तुलना राक्षसी हास्याशी केली.>मलाही हवा गांधीजींचाच भारतराज्यसभेत पंतप्रधान म्हणाले की, ‘आउट झाल्यावरही काँग्रेसला सतत बॅटिंग हवी असते. ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंत अनेक वर्षे सत्ता काँग्रेसकडे होती. मात्र, त्याचे सारे श्रेय एका कुटुंबालाच दिल्याने तो पक्ष आज विरोधी बाकांवर आहे. यंग इंडियाचे स्वप्न स्वामी विवेकानंदांनीही पाहिले होते. विरोधकांना न्यू इंडिया नको असेल, तर ठीक आहे, मलाही गांधींचा भारत हवा आहे, पण काँग्रेसमुक्त भारत ही काही माझी कल्पना नव्हती. स्वातंत्र्य मिळाल्यावर गांधींनीच तशी इच्छा व्यक्त केली होती. आता देशाने ठरवावे की, त्यांना कोणता भारत हवाय.’>बेनामी संपत्ती पकडलीआपल्या प्रदीर्घ भाषणात केंद्र सरकारने रेल्वेचे बजेट रद्द का केले, ३,५00 कोटींची बेनामी संपत्ती प्रथमत: कशी पकडली, शेतीसाठी राबविलेल्या विविध योजना, शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा संकल्प, बांबूच्या शेतीला प्रोत्साहन, उज्ज्वला योजना, तीन तलाक विधेयक, स्वच्छ भारत अभियान इत्यादी योजनांच्या यशाचा पंतप्रधानांनी आवर्जून उल्लेख केला.>दलाल व मध्यस्थ संपविलेचुकीच्या धोरणांमुळे देशाचे किती नुकसान झाले, याची उदाहरणे सांगताना काँग्रेसवर हल्ला चढविण्याची एकही संधी मोदींनी सोडली नाही. ते म्हणाले, आधार कार्डाचा उपयोग आम्ही वैज्ञानिक रितीने केला. काँग्रेस राजवटीत विधवा, दिव्यांग, ज्येष्ठांची पेन्शन दलालांच्या खिशात जात होती. आम्ही दलाल व मध्यस्थ संपविले. भाजपाची सत्ता नसलेल्या राज्यांतही १ कोटीहून अधिक लोकांना रोजगार मिळाला. विरोधक त्यालाही खोटे ठरविणार काय?

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस