शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आउट होऊनही काँग्रेसला सतत हवी असते बॅटिंग- पंतप्रधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 06:01 IST

भारताचे तुकडे काँग्रेसनेच केले. तुमच्या पापाची किंमत देशाला मोजावी लागत आहे. सरदार पटेल पंतप्रधान असते, तर काश्मीर भारताच्या ताब्यात असता, अशी आरोपवजा टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी संसदेत केली.

सुरेश भटेवरा नवी दिल्ली : भारताचे तुकडे काँग्रेसनेच केले. तुमच्या पापाची किंमत देशाला मोजावी लागत आहे. सरदार पटेल पंतप्रधान असते, तर काश्मीर भारताच्या ताब्यात असता, अशी आरोपवजा टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी संसदेत केली. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार प्रस्तावावर बोलताना, मोदींनी दोन्ही सभागृहांत दीड तासांची भाषणे केली. त्या वेळी सभागृहांत काँग्रेस, तेलगू देसमसह अन्य विरोधकांची घोषणाबाजी व गदारोळ सुरू होता.त्यानंतर, काँग्रेसचे नेते आनंद शर्मा म्हणाले की, मोदींच्या भाषणांचा बाज निवडणूक प्रचाराचा होता. गांधी-नेहरू परिवार व काँग्रेसच्या ५५ राजवटीवर, टीका करताना, आपली कारकिर्द संपत आल्याचे ते विसरून गेले. ज्या मुद्द्यांवर त्यांनी काँग्रेसवर हल्ला चढविला, त्यापैकी एकाही विषयाचे उत्तर मोदींना ४ वर्षांत शोधता आले नाही.मोदी म्हणाले, यूपीए सरकार असताना सरकारी बँकांचा १८ लाख कोटींचा एनपीए ५२ लाख कोटींवर गेला. बँकांची ही लूट कोणी घडविली? हे पाप आमच्या सरकारचे नाही. आमच्या काळात बँकांनी एकही असे कर्ज दिले नाही की, ज्यामुळे बँकांच्या एनपीएमध्ये भर पडली.>सभागृहांमध्ये रणकंदनपंतप्रधानांचे भाषण सुरू असताना दोन्ही सभागृहांत सत्ताधारी विरुद्ध विरोधक असे रणकंदनच सुरू होते.मोदींच्या प्रत्येक मुद्द्यावर सत्ताधारी सदस्य बाके वाजवून विरोधकांना खिजवायचे, तर काँग्रेससह अन्य विरोधक या वेळी ‘पंतप्रधान मोदी जुमलेबाजी बंद करो’, ‘झूठा भाषण बंद करो, मॅच फिक्सिंग बंद करो’, ‘आंध्र प्रदेशके मुद्देपर ड्रामेबाजी बंद करो’, ‘धमकी देना बंद करो, झांसा देना बंद करो’, ‘राफेल डिल मे क्या हुवा?; अशा घोषणा देत होते. या गोंधळातच पंतप्रधानांचे भाषण पार पडले.> राक्षसी हास्यबोलण्याच्या ओघात मोदींनी आधार कार्ड संकल्पनेचे श्रेय लालकृष्ण अडवाणींना दिले, तेव्हा काँग्रेसच्या रेणुका चौधरी जोरात हसू लागल्या.सभापती नायडू त्यांच्या हास्यावर नाराजी व्यक्त करीत असतानाच त्यांना थांबवून मोदी यांनी ‘रामायण’ या मालिकेनंतर बºयाच वर्षांनी असे हास्य ऐकायला मिळाले,’ असा कडवट शेरा मारून, चौधरी यांच्या हसण्याची तुलना राक्षसी हास्याशी केली.>मलाही हवा गांधीजींचाच भारतराज्यसभेत पंतप्रधान म्हणाले की, ‘आउट झाल्यावरही काँग्रेसला सतत बॅटिंग हवी असते. ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंत अनेक वर्षे सत्ता काँग्रेसकडे होती. मात्र, त्याचे सारे श्रेय एका कुटुंबालाच दिल्याने तो पक्ष आज विरोधी बाकांवर आहे. यंग इंडियाचे स्वप्न स्वामी विवेकानंदांनीही पाहिले होते. विरोधकांना न्यू इंडिया नको असेल, तर ठीक आहे, मलाही गांधींचा भारत हवा आहे, पण काँग्रेसमुक्त भारत ही काही माझी कल्पना नव्हती. स्वातंत्र्य मिळाल्यावर गांधींनीच तशी इच्छा व्यक्त केली होती. आता देशाने ठरवावे की, त्यांना कोणता भारत हवाय.’>बेनामी संपत्ती पकडलीआपल्या प्रदीर्घ भाषणात केंद्र सरकारने रेल्वेचे बजेट रद्द का केले, ३,५00 कोटींची बेनामी संपत्ती प्रथमत: कशी पकडली, शेतीसाठी राबविलेल्या विविध योजना, शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा संकल्प, बांबूच्या शेतीला प्रोत्साहन, उज्ज्वला योजना, तीन तलाक विधेयक, स्वच्छ भारत अभियान इत्यादी योजनांच्या यशाचा पंतप्रधानांनी आवर्जून उल्लेख केला.>दलाल व मध्यस्थ संपविलेचुकीच्या धोरणांमुळे देशाचे किती नुकसान झाले, याची उदाहरणे सांगताना काँग्रेसवर हल्ला चढविण्याची एकही संधी मोदींनी सोडली नाही. ते म्हणाले, आधार कार्डाचा उपयोग आम्ही वैज्ञानिक रितीने केला. काँग्रेस राजवटीत विधवा, दिव्यांग, ज्येष्ठांची पेन्शन दलालांच्या खिशात जात होती. आम्ही दलाल व मध्यस्थ संपविले. भाजपाची सत्ता नसलेल्या राज्यांतही १ कोटीहून अधिक लोकांना रोजगार मिळाला. विरोधक त्यालाही खोटे ठरविणार काय?

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस