शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी, मोठं अनुदान देण्याचा निर्णय
5
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
6
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
7
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
8
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
9
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
10
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
11
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
12
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
13
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
14
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
15
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
16
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
17
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
18
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
19
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
20
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!

काँग्रेसच्या ज्येष्ठांनी पक्षहितापेक्षा मुलांना दिले महत्त्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 04:59 IST

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला आलेल्या अपयशाचे पडसाद पक्षात उमटत आहेत.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला आलेल्या अपयशाचे पडसाद पक्षात उमटत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ आणि चिदंबरम यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी पक्षहितापेक्षा मुलांना अधिक महत्त्व दिले. त्यामुळे दुसऱ्या मतदारसंघात त्यांनी लक्ष दिले नाही, अशा शब्दांत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी या नेत्यांना रविवारी सुनावले, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध लढण्यासाठी ज्येष्ठ नेत्यांनी राहुल गांधी यांना एकट्यांना सोडून दिले, अशा शब्दांत राहुल गांधी यांच्या बहीण प्रियांका गांधी यांनी आपली नाराजी व्यक्त केली.निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकारिणी समितीची बैठक (सीडब्ल्यूसी) येथे पार पडली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्ष सोडण्याचा यावेळी पुनरुच्चार केला. त्यांनी हे स्पष्ट केले की, या पदावर गांधी परिवारातील व्यक्ती नकोय. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला ५२ जागा मिळाल्या असून, १८ राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशात पक्षाला एकही जागा मिळालेली नाही. राहुल गांधी हे उत्तर प्रदेशातील अमेठीतून पराभूत झाले आहेत, तर केरळातील वायनाडमधून विजयी झाले आहेत.या बैठकीस उपस्थित असलेल्या एका नेत्याने सांगितले की, चार तास चाललेल्या या बैठकीत विविध विषयांवर विचारविमर्श करण्यात आला. राहुल गांधी यांनी राजीनामा देण्याचा विषय काढला तेव्हा अनेक ज्येष्ठ नेत्यांनी राहुल गांधी यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी प्रियांका गांधी यांनी हस्तक्षेप करीत या नेत्यांना सवाल केला की, माझे भाऊ जेव्हा एकटे लढत होते तेव्हा आपण कुठे होतात? प्रियांका यांच्या बोलण्यातून त्यांची व्यथा स्पष्टपणे दिसत होती. प्रियांका म्हणाल्या की, राफेल आणि ‘चौकीदार चोर है’ हे मुद्दे उचलूून धरण्यासाठी राहुल गांधी यांना कोणत्याही नेत्याने समर्थन दिले नाही.>चिदंबरम यांनी दिली होती राजीनाम्याची धमकीज्योतिरादित्य शिंदे यांनी राज्यातील नेतृत्व मजबूत करण्याचा आग्रह केला तेव्हा राहुल गांधी यांनी चिदंबरम यांच्याकडे पाहत म्हटले की, मुलाला तिकीट मिळाले नाही, तर राजीनामा देण्याची धमकी चिदंबरम यांनी दिली होती. बैठकीस अनुपस्थित असलेल्या कमलनाथ यांच्याबाबत राहुल म्हणाले की, कमलनाथ यांनीही मुलाच्या उमेदवारीसाठी खूप आग्रह केला होता, तर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत मुलाच्या प्रचारासाठी सात दिवस जोधपूरमध्ये होते. तथापि, प्रियांका यांनी राहुल गांधी यांच्या राजीनाम्याला विरोध करीत स्पष्ट केले की, असे केले, तर ते भाजपच्या जाळ्यात फसल्यासारखे होईल.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९