शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
3
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
4
"पाय खूप सुजतात, नीट जेवणही नशिबात नसतं"; केदारनाथच्या पिठ्ठूची डोळे पाणावणारी गोष्ट
5
Gold Price 6 May: लग्नसराईच्या हंगामापूर्वी सोन्याच्या दरात मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा लेटेस्ट दर
6
'या' ५८ देशांत भारतीयांना व्हिसा फ्री प्रवेश! विमान पकडा आणि थेट परदेशात उतरा, यादीत अनेक सुंदर देश
7
जम्मू-काश्मीरमध्ये भीषण अपघात; पूंछ जिल्ह्यात बस उलटली, दोघांचा मृत्यू तर 35 जखमी
8
हार्दिक पांड्या IPL मध्ये खेळतोय, दुसरीकडे त्याची Ex पत्नी नताशा काय करतेय? Photo Viral
9
तृतीयपंथीवर चौघांकडून लैंगिक अत्याचार; मोबाईलवर काढला व्हिडिओ, १ लाख मागितले
10
१०० वर्षांनी अद्भूत योग: ८ राशींना लॉटरी, सुख-सोयींचा काळ; पद-पैसा वृद्धी, शेअर बाजारात नफा!
11
पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मृतीस्थळ विकासासाठी ६८१ कोटींचा आराखडा; CM फडणवीसांची चौंडीत घोषणा
12
Soniya Bansal : "मला वास्तवासोबत..."; बिग बॉस फेम अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री, निवडला अध्यात्माचा मार्ग
13
CID Recruitment: परीक्षा न देता सरकारी नोकरी, सीआयडीमध्ये 'या' पदासाठी भरती, 'इतका' पगार मिळणार!
14
धाराशिव: 'बाहेर जाऊन येतो' म्हणून कार घेऊन गेले, नंतर पुलाखाली पाण्यात मिळाला मृतदेह
15
पुन्हा सुरु होणार जीवघेणा खेळ! 'Squid Game 3' चा टीझर आऊट; रिलीज डेटही समोर
16
भारताने दहशतवादाविरोधात लढा द्यावा, आम्ही सोबत आहोत; अमेरिकेचा भारताला पाठिंबा...
17
दरमहा ५००० रुपयांची SIP केली तर किती वर्षात १ कोटी रुपये जमा होतील? गणित समजून घ्या
18
Noida Dog Attack: वॉक करणाऱ्या महिलेवर पाळीव कुत्र्याचा हल्ला; जीव वाचवायला गेली आणि अन्...
19
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
20
७ मे रोजी देशभरात वॉर मॉक ड्रिल; सामान्य नागरिक म्हणून आपण करायच्या 'या' १० गोष्टी 

लष्कराच्या ‘चलो दिल्ली’चा काँग्रेसकडून इन्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2016 03:16 IST

संपुआ सरकारच्या काळात २०१२मध्ये तत्कालीन लष्करप्रमुख व्ही.के. सिंग यांनी निवृत्तीच्या वयावरून सरकारशी संघर्ष पुकारला होता.

नवी दिल्ली : संपुआ सरकारच्या काळात २०१२मध्ये तत्कालीन लष्करप्रमुख व्ही.के. सिंग यांनी निवृत्तीच्या वयावरून सरकारशी संघर्ष पुकारला होता. त्यानंतर लष्कराच्या तुकड्यांनी दिल्लीकडे आगेकूच करीत बंडाच्या हालचाली चालविल्या होता, असा दावा माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी यांनी केला आहे. त्यावरून रविवारी दिल्लीतील राजकारण तापले. तिवारी यांनी हा मुद्दा उपस्थित करीत जणू त्या काळी सत्तेवर असलेल्या संपुआ सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. पण काँग्रेसनेच हा दावा खोडून काढल्याने तिवारी एकाकी पडल्याचे चित्र निर्माण झाले. तरीही जदयूने व्ही.के. सिंग यांच्या राजीनाम्याची मागणी केली, तर भाजपाने संपुआ सरकारचे नेतृत्व केलेल्या डॉ. मनमोहन सिंग यांच्या निवेदनाची मागणी केली. स्वत: व्ही.के. सिंग यांनी ‘बकवास’ या एका विशेषणाने तिवारींच्या आरोपाची संभावना केली. त्या वेळी सैन्याने आगेकूच केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते ते दुर्दैवी असले तरी सत्य होते, असे तिवारींनी म्हटले आहे. काँग्रेसने तिवारींच्या या दाव्याशी संबंध नसल्याचे स्पष्ट केले; शिवाय तिवारींचा दावा खोटा असल्याचे सांगताना तत्कालीन लष्करप्रमुख विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री व्ही.के. सिंग यांनी म्हटले, तिवारी यांच्याकडे सध्या कोणतेही काम नाही, त्यामुळे त्यांनी हे तद्दन ‘बकवास’ विधान केले आहे.तिवारींनी हे विधान करण्यासाठी हीच वेळ का निवडली, असा प्रश्न उपस्थित करीत भाजपाने माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निवेदनाची मागणी केली आहे. तिवारी हे आॅक्टोबर २०१२ ते मे २०१४ या काळात माहिती आणि प्रसारण मंत्री राहिले होते.मी त्या वेळी संरक्षणासंबंधी स्थायी समितीचा सदस्य होतो. लष्कराने आगेकूच केल्याचे वृत्त दुर्दैवी मात्र सत्य होते. मला या वादात पडायचे नाही, मात्र ते वृत्त खरे होते, असे तिवारी यांनी शनिवारी एका पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी म्हटले. एका इंग्रजी दैनिकाने ४ एप्रिल २०१२ रोजी हे वृत्त प्रसिद्ध केले होते. सरकारला कोणतीही माहिती न देता लष्कराच्या दोन तुकड्यांनी दिल्लीकडे आगेकूच केल्याचे त्यात म्हटले होते. तिवारी यांनी या मुद्द्यावर पुस्तकात लिहिले असून, ते वाचले जावे अशी त्यांची इच्छा असल्यामुळे त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे, स्वत:चे पुस्तक सर्वांनी वाचावे, असे त्यांना सुचवायचे असावे, असे व्ही.के. सिंग यांनी म्हटले. (लोकमत न्यूज नेटवर्क)वृत्तात काय म्हटले होते....१६ जानेवारी २०१२ रोजी हरियाणातील हिस्सार येथून लष्कराच्या इन्फन्ट्रीमधील एका तुकडीने सरकारला कोणतीही माहिती न देता अनपेक्षितपणे दिल्लीकडे कूच केले होते.त्याच रात्री आग्रा येथील ५०व्या निमलष्करी दलाच्या एका तुकडीनेही दिल्लीकडे प्रस्थान केले होते, असे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने केंद्रीय गुप्तचर संस्थांच्या हवाल्याने दिले होते.