शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

चीन मुद्यावरून काँग्रेस जाब विचारणार, सीमांचे रक्षण करण्यात अपयश आल्याचा ठपका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 03:00 IST

चीनच्या मुद्यावरून सरकार आणि काँग्रेस यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आम्ही विरोधी पक्षांना सोबत घेऊन देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित सगळ्या प्रश्नांना उपस्थित करू

शीलेश शर्मानवी दिल्ली : चीनच्या मुद्यावरून सरकार आणि काँग्रेस यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आम्ही विरोधी पक्षांना सोबत घेऊन देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित सगळ्या प्रश्नांना उपस्थित करू. त्यात चीनचाही मुद्दा असेल, असे संकेत काँग्रेसने दिले आहेत.

पक्षाचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी आरोप केला, की मोदी सरकार देशाच्या सीमांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरले आहे. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी या आरोपाला उत्तर देताना काँग्रेस पक्ष लष्कराच्या मुद्यावर जे राजकारण करीत आहे त्यात देशहित नाही, असे म्हटले. काँग्रेसचा आरोप होता, की चीनने डोकलाम पठारावर कब्जा केला आहे व त्यामुळे उत्तरपूर्वेसाठी धोका निर्माण झाला आहे. उपग्रहाने जी छायाचित्रे पाठवली आहेत त्यातून हे स्पष्ट दिसते, की देशाच्या सीमांवर संकट उभे ठाकले आहे; परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी व परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज वस्तुस्थितीला तोंड न देता देशाची दिशाभूल करीत आहेत.

उपग्रहाने जी छायाचित्रे पाठवली व प्रसारमाध्यमातून जे येत आहे त्यातून चीनने डोकलाम पठारावर कब्जा केल्याचे दिसते. चीनने त्या पठारावर हेलिपॅडही तयार केले आहे व त्याच्या कारवाया (बंकर बनवणे, वाहनांची ये-जा) वेगाने सुरू आहेत, असे काँग्रेसने म्हटले.भारतीय लष्करापासून काहीच मीटर अंतरावर चीनने बनवलेला निरीक्षण मनोरा हेच सांगतो, की चीनचे सैन्य आमच्या सैन्यावर लक्ष ठेवून आहे. अशा अनेक गोष्टी आहेत व त्याची सगळी माहिती सरकारकडे आहे; परंतु सरकार ती लपवत आहे. देशाच्या सुरक्षिततेला धोका आहे, असे काँग्रेसला वाटते. सामरिक हितासाठी चर्चेची प्रक्रिया सुरू ठेवली जावी व मुत्सद्देगिरीतून प्रश्न सोडवले जावेत; परंतु सरकार अशी काहीही उपाययोजना करीत नाही, असे सुरजेवाला म्हणाले.

टॅग्स :congressकाँग्रेस