शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
3
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
4
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
5
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
6
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
7
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
8
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
9
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
10
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
11
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
12
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
13
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
14
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
15
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
16
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
17
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
18
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
19
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
20
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...

चीन मुद्यावरून काँग्रेस जाब विचारणार, सीमांचे रक्षण करण्यात अपयश आल्याचा ठपका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 03:00 IST

चीनच्या मुद्यावरून सरकार आणि काँग्रेस यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आम्ही विरोधी पक्षांना सोबत घेऊन देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित सगळ्या प्रश्नांना उपस्थित करू

शीलेश शर्मानवी दिल्ली : चीनच्या मुद्यावरून सरकार आणि काँग्रेस यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आम्ही विरोधी पक्षांना सोबत घेऊन देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित सगळ्या प्रश्नांना उपस्थित करू. त्यात चीनचाही मुद्दा असेल, असे संकेत काँग्रेसने दिले आहेत.

पक्षाचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी आरोप केला, की मोदी सरकार देशाच्या सीमांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरले आहे. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी या आरोपाला उत्तर देताना काँग्रेस पक्ष लष्कराच्या मुद्यावर जे राजकारण करीत आहे त्यात देशहित नाही, असे म्हटले. काँग्रेसचा आरोप होता, की चीनने डोकलाम पठारावर कब्जा केला आहे व त्यामुळे उत्तरपूर्वेसाठी धोका निर्माण झाला आहे. उपग्रहाने जी छायाचित्रे पाठवली आहेत त्यातून हे स्पष्ट दिसते, की देशाच्या सीमांवर संकट उभे ठाकले आहे; परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी व परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज वस्तुस्थितीला तोंड न देता देशाची दिशाभूल करीत आहेत.

उपग्रहाने जी छायाचित्रे पाठवली व प्रसारमाध्यमातून जे येत आहे त्यातून चीनने डोकलाम पठारावर कब्जा केल्याचे दिसते. चीनने त्या पठारावर हेलिपॅडही तयार केले आहे व त्याच्या कारवाया (बंकर बनवणे, वाहनांची ये-जा) वेगाने सुरू आहेत, असे काँग्रेसने म्हटले.भारतीय लष्करापासून काहीच मीटर अंतरावर चीनने बनवलेला निरीक्षण मनोरा हेच सांगतो, की चीनचे सैन्य आमच्या सैन्यावर लक्ष ठेवून आहे. अशा अनेक गोष्टी आहेत व त्याची सगळी माहिती सरकारकडे आहे; परंतु सरकार ती लपवत आहे. देशाच्या सुरक्षिततेला धोका आहे, असे काँग्रेसला वाटते. सामरिक हितासाठी चर्चेची प्रक्रिया सुरू ठेवली जावी व मुत्सद्देगिरीतून प्रश्न सोडवले जावेत; परंतु सरकार अशी काहीही उपाययोजना करीत नाही, असे सुरजेवाला म्हणाले.

टॅग्स :congressकाँग्रेस