शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

Congress: राहुल गांधींचा नकार, आता या दोन दिग्गज नेत्यांमध्ये काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक रंगणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2022 08:24 IST

Congress President Election: बहुप्रतीक्षित काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिल्याने आता काँग्रेसच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होणार याबाबतची उत्सुकता राजकीय वर्तुळात निर्माण झाली आहे.

नवी दिल्ली - बहुप्रतीक्षित काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिल्याने आता काँग्रेसच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होणार याबाबतची उत्सुकता राजकीय वर्तुळात निर्माण झाली आहे. दरम्यान, आता काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि केरळमधील खासदार डॉ. शशी थरूर यांच्याल लढत रंगण्याची शक्यता आहे. दोन्ही नेत्यांनी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे २२ वर्षांनंतर काँग्रेसचा अध्यक्ष हा निवडणुकीच्या माध्यमातून निवडला जाण्याची शक्यता वाढली आहे. 

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी आपण पक्षाचा आदेश मानणार असल्याचे सांगितले. मात्र त्याआधी राहुल गांधींना अध्यक्ष बनण्यासाठी त्यांची मनधरणी करण्याचा शेवटचा प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दुसरीकडे काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचे आधीपासूनच संकेत देणाऱ्या शशी थरूर यांनी काँग्रेसच्या मुख्यालयात येऊन निवडणूक प्रक्रियेबाबत माहिती घेतली आहे. दरम्यान, या निवडणुकीत काँग्रेसचे इतरही काही नेते उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दरम्यान, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी काँग्रेसचे अध्यक्षपद मिळाल्यास हे पद आणि राजस्थानचे मुख्यमंत्रिपद अशी दोन्ही पदे एकत्रितपणे सांभाळण्याचे संकेत दिले आहेत. मात्र अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताना मुख्यमंत्रिपद सोडावे लागल्यास या पदाची जबाबदारी ते कुणाकडे सोपवतील, याबाबतची स्पष्टता होऊ शकलेली नाही.

दरम्यान, अशोक गहलोत आज केरळमध्ये पोहोचणार आहेत. तिथे ते राहुल गांधी यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत. ते काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी राहुल गांधी यांना विनंती करणार आहेत. दरम्यान, पक्षाचा जो निर्णय असेल तो मी मान्य करेन, असे सांगत त्यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

दरम्यान, शशी थरूर यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याच्या दिलेल्या संकेताबाबत विचारले असता अशोक गहलोत यांनी सांगितले की, लढत झाली पाहिजे. त्यामुळे पक्षात अंतर्गत लोकशाही आहे हे लोकांना कळेल. ही बाब अंतर्गत लोकशाहीसाठी चांगली गोष्ट आहे. भाजपामध्ये राजनाथ सिंह आणि जेपी नड्डा हे कसे अध्यक्ष बनले हे कळते का? असा टोलाही त्यांनी लगावला. 

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीAshok Gahlotअशोक गहलोतShashi Tharoorशशी थरूर