शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Congress: राहुल गांधींचा नकार, आता या दोन दिग्गज नेत्यांमध्ये काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक रंगणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2022 08:24 IST

Congress President Election: बहुप्रतीक्षित काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिल्याने आता काँग्रेसच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होणार याबाबतची उत्सुकता राजकीय वर्तुळात निर्माण झाली आहे.

नवी दिल्ली - बहुप्रतीक्षित काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिल्याने आता काँग्रेसच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होणार याबाबतची उत्सुकता राजकीय वर्तुळात निर्माण झाली आहे. दरम्यान, आता काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि केरळमधील खासदार डॉ. शशी थरूर यांच्याल लढत रंगण्याची शक्यता आहे. दोन्ही नेत्यांनी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे २२ वर्षांनंतर काँग्रेसचा अध्यक्ष हा निवडणुकीच्या माध्यमातून निवडला जाण्याची शक्यता वाढली आहे. 

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी आपण पक्षाचा आदेश मानणार असल्याचे सांगितले. मात्र त्याआधी राहुल गांधींना अध्यक्ष बनण्यासाठी त्यांची मनधरणी करण्याचा शेवटचा प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दुसरीकडे काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचे आधीपासूनच संकेत देणाऱ्या शशी थरूर यांनी काँग्रेसच्या मुख्यालयात येऊन निवडणूक प्रक्रियेबाबत माहिती घेतली आहे. दरम्यान, या निवडणुकीत काँग्रेसचे इतरही काही नेते उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दरम्यान, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी काँग्रेसचे अध्यक्षपद मिळाल्यास हे पद आणि राजस्थानचे मुख्यमंत्रिपद अशी दोन्ही पदे एकत्रितपणे सांभाळण्याचे संकेत दिले आहेत. मात्र अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताना मुख्यमंत्रिपद सोडावे लागल्यास या पदाची जबाबदारी ते कुणाकडे सोपवतील, याबाबतची स्पष्टता होऊ शकलेली नाही.

दरम्यान, अशोक गहलोत आज केरळमध्ये पोहोचणार आहेत. तिथे ते राहुल गांधी यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत. ते काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी राहुल गांधी यांना विनंती करणार आहेत. दरम्यान, पक्षाचा जो निर्णय असेल तो मी मान्य करेन, असे सांगत त्यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

दरम्यान, शशी थरूर यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याच्या दिलेल्या संकेताबाबत विचारले असता अशोक गहलोत यांनी सांगितले की, लढत झाली पाहिजे. त्यामुळे पक्षात अंतर्गत लोकशाही आहे हे लोकांना कळेल. ही बाब अंतर्गत लोकशाहीसाठी चांगली गोष्ट आहे. भाजपामध्ये राजनाथ सिंह आणि जेपी नड्डा हे कसे अध्यक्ष बनले हे कळते का? असा टोलाही त्यांनी लगावला. 

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीAshok Gahlotअशोक गहलोतShashi Tharoorशशी थरूर