शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

Farmers Protest: शेती आणि देशाच्या रक्षणासाठी शेतकरी मरतायत; ५०० जणांच्या मृत्यूवरून राहुल गांधींची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2021 17:31 IST

Farmers Protest: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवत एक ट्विट करत टीका केली आहे.

नवी दिल्ली: केंद्राच्या वादग्रस्त कृषी कायद्याच्या विरोधात गेल्या सहा महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. भारतीय किसान युनियनचे नेते आणि प्रवक्ते राकेश टिकैत या आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत. या गेल्या सहा महिन्यांच्या काळात शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणी ५०० जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवत एक ट्विट करत टीका केली आहे. (congress rahul gandhi tweet for farmers protest against farm laws) 

नव्या वादग्रस्त कृषी कायद्यांविरोधात गेल्या सहा महिन्यांपासून हजारोंच्या संख्येने शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. केंद्र सरकारसोबत चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या असल्या तरीही यावर अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. मात्र, तरीही शेतकरी मागे हटण्यास तयार नाही. या कालावधीत तब्बल ५०० शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. यासंदर्भात किसान एकता मोर्चाच्या वतीने ट्विट करण्यात आले असून, मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त करत ट्विट केले आहे. 

बाबा रामदेव यांना धक्का! भूताननंतर नेपाळमध्ये कोरोनिलवर बंदी; नेमकं कारण काय?

शेती आणि देशाच्या रक्षणासाठी शेतकरी मरतायत

शेतकरी आपली शेती व देशाच्या रक्षणासाठी शेतकरी मरत आहेत. पण ते घाबरलेले नाहीत नाहीत आणि आपल्या भूमिकेवर ठाम आहेत, असे राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच यासोबत #500DeathsAtFarmersProtest हा हॅशटॅगही दिला आहे. जोपर्यंत विजय होत नाही तोवर आम्ही आंदोलन करणार असल्याचे किसान एकता मोर्चाने स्पष्ट केले आहे. 

दरम्यान, २६ नोव्हेंबर २०२० रोजी शेतकऱ्यांनी कृषी कायद्यांविरोधात आवाज उठवत आंदोनालास सुरुवात केली. कोरोनासह अन्य कोणत्याही गोष्टीची पर्वा न करता आंदोलन सुरूच ठेवले. यात काही शेतकऱ्यांना आपला जीवही गमवावा लागला आहे. दुसरीकडे हे आंदोलन नेमके कधीपर्यंत चालणार हेदेखील अस्पष्ट आहे. कोरोनाच्या संकटामुळे शेतकरी आंदोलन प्रभावित झाले होते. मात्र, कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत असून, आता पुन्हा एकदा शेतकरी आंदोलन तीव्र करण्यासाठी राकेश टिकैत यांनी कंबर कसल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राकेश टिकैत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेणार आहेत. यापूर्वीच ममता बॅनर्जी यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता.  

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसrakesh tikaitराकेश टिकैतPoliticsराजकारण