शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

राहुल गांधींना मागच्या रांगेत बसवलं; काँग्रेसने व्यक्त केला संताप, सरकारने दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2024 16:22 IST

Congress Rahul Gandhi : स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात राहुल गांधी ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूंसोबत चौथ्या रांगेत बसलेले दिसले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (15 ऑगस्ट) स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून सलग अकराव्यांदा देशाला संबोधित केलं. लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही या कार्यक्रमात सहभाग घेतला. स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात राहुल गांधी ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूंसोबत चौथ्या रांगेत बसलेले दिसले. सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा रंगली आहे. काँग्रेसने यावरून संताप व्यक्त केला आहे. 

ऑलिम्पिक पदक विजेते राहुल गांधींच्या पुढे बसलेले दिसतात. ते ज्या रांगेत बसले आहेत, तिथे त्यांच्यासोबत हॉकी टीमचे काही खेळाडूही बसले आहेत. राहुल यांच्या मागे आणखी काही पाहुणे बसले आहेत. दहा वर्षात पहिल्यांदाच विरोधी पक्षाचे नेते लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याला उपस्थित होते. अशा स्थितीत त्यांना पाठीमागे बसवण्यावरून वाद निर्माण झाला आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणावर सरकारने प्रतिक्रिया दिली आहे. 

राहुल गांधींना पाठीमागे बसवल्यामुळे काँग्रेसने यावरून राजकारण केलं जात असल्याचा आरोप केला आहे. काँग्रेसचे राज्यसभा खासदार विवेक तन्खा म्हणाले की, "संरक्षण मंत्रालय इतकं वाईट का वागत आहे? लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना चौथ्या रांगेत बसवलं. विरोधी पक्षनेतेपद मोठं आहे. लोकसभेत ते पंतप्रधानांच्या नंतर येतं. तुम्ही संरक्षण मंत्रालयाला राष्ट्रीय कार्यक्रमाचे राजकारण करण्याची परवानगी कशी देऊ शकता?"

राहुल गांधी यांच्या बसण्यावरून होत असलेल्या राजकारणावरही सरकारकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे की, यावेळी पुढची रांग ऑलिम्पिक पदक विजेत्यांसाठी अलॉट करावी लागली. त्यामुळे राहुल गांधींना मागच्या रांगेत बसावं लागलं. स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रमाचं आयोजन करणं आणि बसण्याची योजना करं  ही संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी असते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी काही केंद्रीय मंत्र्यांनाही मागे बसावं लागलं आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसIndependence Dayस्वातंत्र्य दिन