शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

Rahul Gandhi : "... मग भले त्यासाठी 5, 10 किंवा 15 वर्ष लागोत, तुरुंगात जाईपर्यंत आम्ही त्यांना सोडणार नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2021 12:25 IST

Congress Rahul Gandhi And Narendra Modi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे. 

नवी दिल्ली - लखीमपूर खेरीमध्ये (Lakhimpur Kheri Case) शेतकऱ्यांवर गाडी चढवणे, हा पूर्वनियोजित कटाचा भाग होता. विशेष तपास पथकाने (SIT) ही माहिती दिली आहे. या प्रकरणात केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा मुख्य आरोपी आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिस पथकाने आशिष मिश्रा यांच्यावरील आरोपांमध्ये सुधारणा करण्यात यावी, असे पत्र न्यायाधीशांना लिहिले आहे. आशिष मिश्रा आणि इतरांवर यापूर्वीच खून आणि कट रचण्याचे आरोप आहेत. त्यात खुनाचा प्रयत्न आणि इतर आरोपही जोडले जावेत, अशी विशेष तपास पथकाची इच्छा आहे. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) जोरदार निशाणा साधला आहे. 

"जेव्हा मी लखीमपूर खेरीला गेलो, मी संबंधित शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना वचन दिलं होतं की काहीही झालं, तरी आम्ही केंद्र सरकारवर दबाव टाकून त्यांना न्याय देऊ. अर्थात, न्याय हा दबाव आणि संघर्ष केल्याशिवाय मिळत नाही. काँग्रेसने सुरुवातीपासूनच सांगितलं होतं की,  तीन कृषी कायदे मागे घ्यावेच लागतील आणि ते मागे घेतले गेले. त्याचप्रमाणे मी म्हणतोय की केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांना राजीनामा द्यावाच लागेल. ते तुरुंगात जाईपर्यंत आम्ही केंद्र सरकारवर दबाव टाकत राहू. मग भले त्यासाठी 5, 10 किंवा 15 वर्ष लागोत. ते तुरुंगात जाईपर्यंत आम्ही त्यांना सोडणार नाही" असं राहुल गांधी यावेळी म्हणाले आहेत.

"केंद्र सरकार यावर चर्चा करायला तयार नाही"

राहुल गांधी यांनी "हा एक कट होता. एखादा अपघात नव्हता. हा कट कुणी रचला हे अगदी उघड आहे. या प्रकरणावर संसदेत चर्चा व्हावी, अशी काँग्रेसची मागणी होती. काँग्रेसने केंद्रीय मंत्र्यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली. पण केंद्र सरकार यावर चर्चा करायला तयार नाही" असा गंभीर आरोप केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. राहुल यांनी काही दिवसांपूर्वी "पुन्हा एकदा माफी मागण्याची वेळ आली आहे" असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता. तसेच माफी मागण्याआधी शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या आरोपीच्या वडिलांना मंत्रीपदावरून हटवा अशी मागणी देखील केली होता. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं होतं.

"मोदीजी पुन्हा एकदा माफी मागण्याची वेळ आलीय"

"मोदीजी पुन्हा एकदा माफी मागण्याची वेळ आली आहे. पण याआधी आरोपीच्या वडिलांना मंत्री पदावरून हटवा. आता सत्य सर्वांसमोर आलं आहे" असं म्हटलं होतं. तसेच Lakhimpur आणि Murder हे दोन हॅशटॅग देखील राहुल यांनी आपल्या ट्विटमध्ये वापरले होते. सत्ताधारी भाजपा यूपीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तयारीत असताना, केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्यासाठी या घडामोडी मोठी डोकेदुखी ठरू शकतात. या घटनेनंतर विरोधकांकडून अजय मिश्रा यांना हटवण्याची मागणी सातत्याने होत असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना मंत्रिमंडळात कायम ठेवले आहे. लखीमपूर खेरीच्या घटनेबाबत शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप असून, त्याचा परिणाम येत्या निवडणुकीत दिसून येऊ शकतो. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीLakhimpur Kheri Violenceलखीमपूर खीरी हिंसाचारNarendra Modiनरेंद्र मोदीPoliticsराजकारण