शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

“BJP-RSS ने देशात हिंसा अन् द्वेषच पसरवला”; भारत जोडो न्याय यात्रेत राहुल गांधींची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2024 13:50 IST

Bharat Jodo Nyay Yatra: झारखंडमधून आता भारत जोडो न्याय यात्रा ओडिसामध्ये प्रवेश करणार आहे.

Bharat Jodo Nyay Yatra: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सुरू आहे. मणिपूरपासून सुरू झालेली ही यात्रा मुंबईपर्यंत येणार आहे. आताच्या घडीला भारत जोडो न्याय यात्रा झारखंडमध्ये आहे. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना राहुल गांधी यांनी भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सडकून टीका केली. भाजपा आणि आरएसएसने देशात हिंसा आणि द्वेषच पसरवला, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. 

झारखंडनंतर राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा ओडिशा राज्यात प्रवेश करेल. स्थानिकांमध्ये या यात्रेबाबत प्रचंड उत्सुकता आणि उत्साह असल्याचे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. राहुल गांधींनी सायकलवरून कोळसा घेऊन जाणाऱ्या तरुणांची भेट घेतली. यावेळी त्यांनी २०० किलो कोळसा भरलेली सायकल चालवली. त्यांनी त्या मजुरांना पीकअप व्हॅन देण्याचे आश्वासन दिले.

एकत्र येऊन तुमचे प्रश्न सोडवायचे, हाच या यात्रेचा उद्देश

भाजप आणि आरएसएसने देशात द्वेष आणि हिंसाचार पसरवला आहे, हे आमच्या लक्षात आले. त्यामुळे तुम्हा सर्वांसोबत एकत्र येण्याचा विचार केला, एकत्र येऊन तुमचे प्रश्न सोडवायचे. हा भारत जोडो न्याय यात्रेचा उद्देश आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. तत्पूर्वी, झारखंडमध्ये काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेला रामगढ येथील महात्मा गांधी चौकातून सुरुवात केल्यानंतर ते बोलत होते.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात ‘इंडिया’ आघाडीचे सरकार स्थापन झाल्यास देशव्यापी जात-आधारित जनगणना करण्याचे आणि आरक्षणावरील ५० टक्के मर्यादा काढून टाकण्याचे आश्वासन दिले. दुसरीकडे, काँग्रेसने बेरोजगारीच्या मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधत आरोप केला की, देशात नोकऱ्यांची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, तिने गेल्या दहा वर्षांतील कळस गाठला गेला आहे.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राcongressकाँग्रेस