शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
5
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
6
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
7
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
8
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
9
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
10
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
11
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
12
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
13
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
14
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
15
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
16
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
17
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
19
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
20
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर

“BJP-RSS ने देशात हिंसा अन् द्वेषच पसरवला”; भारत जोडो न्याय यात्रेत राहुल गांधींची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2024 13:50 IST

Bharat Jodo Nyay Yatra: झारखंडमधून आता भारत जोडो न्याय यात्रा ओडिसामध्ये प्रवेश करणार आहे.

Bharat Jodo Nyay Yatra: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सुरू आहे. मणिपूरपासून सुरू झालेली ही यात्रा मुंबईपर्यंत येणार आहे. आताच्या घडीला भारत जोडो न्याय यात्रा झारखंडमध्ये आहे. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना राहुल गांधी यांनी भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सडकून टीका केली. भाजपा आणि आरएसएसने देशात हिंसा आणि द्वेषच पसरवला, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. 

झारखंडनंतर राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा ओडिशा राज्यात प्रवेश करेल. स्थानिकांमध्ये या यात्रेबाबत प्रचंड उत्सुकता आणि उत्साह असल्याचे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. राहुल गांधींनी सायकलवरून कोळसा घेऊन जाणाऱ्या तरुणांची भेट घेतली. यावेळी त्यांनी २०० किलो कोळसा भरलेली सायकल चालवली. त्यांनी त्या मजुरांना पीकअप व्हॅन देण्याचे आश्वासन दिले.

एकत्र येऊन तुमचे प्रश्न सोडवायचे, हाच या यात्रेचा उद्देश

भाजप आणि आरएसएसने देशात द्वेष आणि हिंसाचार पसरवला आहे, हे आमच्या लक्षात आले. त्यामुळे तुम्हा सर्वांसोबत एकत्र येण्याचा विचार केला, एकत्र येऊन तुमचे प्रश्न सोडवायचे. हा भारत जोडो न्याय यात्रेचा उद्देश आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. तत्पूर्वी, झारखंडमध्ये काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेला रामगढ येथील महात्मा गांधी चौकातून सुरुवात केल्यानंतर ते बोलत होते.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात ‘इंडिया’ आघाडीचे सरकार स्थापन झाल्यास देशव्यापी जात-आधारित जनगणना करण्याचे आणि आरक्षणावरील ५० टक्के मर्यादा काढून टाकण्याचे आश्वासन दिले. दुसरीकडे, काँग्रेसने बेरोजगारीच्या मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधत आरोप केला की, देशात नोकऱ्यांची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, तिने गेल्या दहा वर्षांतील कळस गाठला गेला आहे.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राcongressकाँग्रेस