शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

Rahul Gandhi : राम मंदिर बांधले तरी अयोध्येत भाजपाचा पराभव का झाला?; राहुल गांधींनी सांगितलं मोठं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2024 10:27 IST

Rahul Gandhi And Narendra Modi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अयोध्येतील भाजपाच्या पराभवाचाही उल्लेख केला.

रायबरेली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयानंतर राहुल गांधी आभार सभेला संबोधित करण्यासाठी मंगळवारी रायबरेली येथे पोहोचले. यावेळी राहुल यांनी अयोध्येतील भाजपाच्या पराभवाचाही उल्लेख केला. राहुल गांधी म्हणाले की, अयोध्येत पराभव झाला. अयोध्येत राम मंदिर बांधलं. त्याच्या उद्घाटनाच्या वेळी तुम्हाला गरीब माणूस दिसला नाही. त्यामुळे अयोध्येतील जनतेने त्यांना उत्तर दिलं आहे.

"अयोध्येत राम मंदिर बांधलं. एकाही गरीब व्यक्तिला निमंत्रित केलं नाही. उद्घाटनाला एकही शेतकरी, एक मजूर, एक मागासलेला व्यक्ती, एक दलित व्यक्ती दिसला नाही. आदिवासी राष्ट्रपतींना सांगण्यात आलं की तुम्ही यासाठी येऊ शकत नाही. तुम्ही पाहिलं असेल या सोहळ्यासाठी अदानी, अंबानी उभे होते, उद्योगपती उभे होते, संपूर्ण बॉलिवूड उभं होतं, क्रिकेटची टीम उभी होती, पण एकही गरीब नव्हता, याचंच उत्तर आता अयोध्येतील जनतेने दिलं आहे" असं म्हणत राहुल गांधींनी निशाणा साधला आहे. 

"प्रियंका गांधी वाराणसीतून लढल्या असत्या तर मोदी हरले असते"

प्रियंका गांधींनी वाराणसीतून निवडणूक लढवली असती तर पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन-तीन लाख मतांनी पराभूत झाले असते, असा दावा राहुल यांनी केला. "या निवडणुकीत भारताने संदेश दिला आहे की नरेंद्र मोदीजींचे 'व्हिजन' आम्हाला आवडत नाही. आम्हाला द्वेष नको आहे, हिंसा नको आहे. आम्हाला प्रेमाचं दुकान (मोहब्बत की दुकान) हवं आहे."

"देशासाठी नव्या 'व्हिजन'ची गरज आहे. देशाला नवी 'व्हिजन' द्यायची असेल, तर ती उत्तर प्रदेशातूनच द्यावी लागेल आणि राज्यात आणि देशात आम्हाला इंडिया आघाडी, समाजवादी पक्ष आणि काँग्रेस हवी आहे असा संदेश उत्तर प्रदेशने दिला आहे" असं देखील राहुल गांधींनी म्हटलं आहे. 

"अयोध्येतील जनतेने उत्तर दिलं आहे"

अयोध्येतील भाजपाच्या पराभवाचा संदर्भ देत राहुल म्हणाले की, "अयोध्येतील जनतेने उत्तर दिलं आहे. केवळ अयोध्येतच नाही तर वाराणसीतही असंच आहे. मी माझ्या बहिणीला (प्रियंका गांधी) सांगतोय की, तिने वाराणसीतून निवडणूक लढवली असती तर आज पंतप्रधान दोन-तीन लाख मतांनी वाराणसीची निवडणूक हरले असते."

"देशात दहा वर्षे बेरोजगारी, द्वेष आणि हिंसा पसरवली"

"मी हे उद्दामपणाने बोलत नाही, तर जनतेने पंतप्रधान मोदींना संदेश दिला आहे की आम्हाला त्यांचं राजकारण आता आवडत नाही. आम्हाला प्रगती हवी आहे. तुम्ही या देशात दहा वर्षे बेरोजगारी, द्वेष आणि हिंसा पसरवली. जनतेने पंतप्रधानांना चांगलंच उत्तर दिलं आहे." 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीAyodhyaअयोध्याlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालBJPभाजपा