शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

Rahul Gandhi : राम मंदिर बांधले तरी अयोध्येत भाजपाचा पराभव का झाला?; राहुल गांधींनी सांगितलं मोठं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2024 10:27 IST

Rahul Gandhi And Narendra Modi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अयोध्येतील भाजपाच्या पराभवाचाही उल्लेख केला.

रायबरेली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयानंतर राहुल गांधी आभार सभेला संबोधित करण्यासाठी मंगळवारी रायबरेली येथे पोहोचले. यावेळी राहुल यांनी अयोध्येतील भाजपाच्या पराभवाचाही उल्लेख केला. राहुल गांधी म्हणाले की, अयोध्येत पराभव झाला. अयोध्येत राम मंदिर बांधलं. त्याच्या उद्घाटनाच्या वेळी तुम्हाला गरीब माणूस दिसला नाही. त्यामुळे अयोध्येतील जनतेने त्यांना उत्तर दिलं आहे.

"अयोध्येत राम मंदिर बांधलं. एकाही गरीब व्यक्तिला निमंत्रित केलं नाही. उद्घाटनाला एकही शेतकरी, एक मजूर, एक मागासलेला व्यक्ती, एक दलित व्यक्ती दिसला नाही. आदिवासी राष्ट्रपतींना सांगण्यात आलं की तुम्ही यासाठी येऊ शकत नाही. तुम्ही पाहिलं असेल या सोहळ्यासाठी अदानी, अंबानी उभे होते, उद्योगपती उभे होते, संपूर्ण बॉलिवूड उभं होतं, क्रिकेटची टीम उभी होती, पण एकही गरीब नव्हता, याचंच उत्तर आता अयोध्येतील जनतेने दिलं आहे" असं म्हणत राहुल गांधींनी निशाणा साधला आहे. 

"प्रियंका गांधी वाराणसीतून लढल्या असत्या तर मोदी हरले असते"

प्रियंका गांधींनी वाराणसीतून निवडणूक लढवली असती तर पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन-तीन लाख मतांनी पराभूत झाले असते, असा दावा राहुल यांनी केला. "या निवडणुकीत भारताने संदेश दिला आहे की नरेंद्र मोदीजींचे 'व्हिजन' आम्हाला आवडत नाही. आम्हाला द्वेष नको आहे, हिंसा नको आहे. आम्हाला प्रेमाचं दुकान (मोहब्बत की दुकान) हवं आहे."

"देशासाठी नव्या 'व्हिजन'ची गरज आहे. देशाला नवी 'व्हिजन' द्यायची असेल, तर ती उत्तर प्रदेशातूनच द्यावी लागेल आणि राज्यात आणि देशात आम्हाला इंडिया आघाडी, समाजवादी पक्ष आणि काँग्रेस हवी आहे असा संदेश उत्तर प्रदेशने दिला आहे" असं देखील राहुल गांधींनी म्हटलं आहे. 

"अयोध्येतील जनतेने उत्तर दिलं आहे"

अयोध्येतील भाजपाच्या पराभवाचा संदर्भ देत राहुल म्हणाले की, "अयोध्येतील जनतेने उत्तर दिलं आहे. केवळ अयोध्येतच नाही तर वाराणसीतही असंच आहे. मी माझ्या बहिणीला (प्रियंका गांधी) सांगतोय की, तिने वाराणसीतून निवडणूक लढवली असती तर आज पंतप्रधान दोन-तीन लाख मतांनी वाराणसीची निवडणूक हरले असते."

"देशात दहा वर्षे बेरोजगारी, द्वेष आणि हिंसा पसरवली"

"मी हे उद्दामपणाने बोलत नाही, तर जनतेने पंतप्रधान मोदींना संदेश दिला आहे की आम्हाला त्यांचं राजकारण आता आवडत नाही. आम्हाला प्रगती हवी आहे. तुम्ही या देशात दहा वर्षे बेरोजगारी, द्वेष आणि हिंसा पसरवली. जनतेने पंतप्रधानांना चांगलंच उत्तर दिलं आहे." 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीAyodhyaअयोध्याlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालBJPभाजपा