शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

पंजाबमध्ये काँग्रेस, ‘आप’मुळे अकाली दल-भाजपाचा बचावाचा पवित्रा

By admin | Updated: January 7, 2017 04:41 IST

सतलज यमुना लिंक कालव्याचे पाणीवाटप हे दोन मुद्दे सर्वाधिक कळीचे ठरणार आहेत

सुरेश भटेवरा,नवी दिल्ली- पंजाब विधानसभेच्या आगामी निवडणुकीत तरूण पिढीला अमली पदार्थांच्या सेवनाने घातलेला विळखा आणि सतलज यमुना लिंक कालव्याचे पाणीवाटप हे दोन मुद्दे सर्वाधिक कळीचे ठरणार आहेत. नोटबंदीवरची जुगलबंदीही जोडीला आहेच. केजरीवालांचा ‘आप’ मैदानात उतरल्याने सर्व ११७ जागांवर लढणार आहेत. काँग्रेस व भाजपची थेट लढत असल्याने काँग्रेसची स्पेस हस्तगत करणे ही ‘आप’नीती आहे. भाजपसाठी ते सोयीचेच आहे, कारण अगोदरच क्षीण अवस्थेत असलेल्या काँग्रेसचा त्रिकोणी लढतीत अधिकाधिक शक्तिपात होईल, हा भाजपचा आडाखा आहे. पंजाब १९६६ साली स्वतंत्र राज्य झाले, तेव्हापासून २0१२ च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत अकाली दल व काँग्रेसमध्येच सरळ लढती झाल्या. २00७ आणि २0१२ चा अपवाद वगळला तर ५ वर्षांपेक्षा अधिक काळ एक पक्ष या राज्यात सत्तेवर राहू शकलेला नाही. पंजाबमध्ये भाजप-अकाली दलाची आघाडी आहे असली तरी भाजप लहान भावाच्या भूमिकेत आहे. शहरी भागात २३ जागांवर भाजप उमेदवार उभे करतो. भाजपला कमी जागा मिळाल्या, तर त्याचा थेट लाभ काँग्रेसला होतो हा इतिहास आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत पंजाबमधे ‘आप’ ला अचानक ४ जागा मिळाल्या. परंपरागत राजकारणाचे सारेच चित्र त्यामुळे बदलले. काँग्रेसतर्फे कॅप्टन अमरिंदरसिंग मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत. निवडणुकीची सारी सूत्रेही त्यांच्याच हाती आहेत. अकाली दलापेक्षा २0१२ च्या निवडणुकीत काँग्रेसला १0 जागा कमी मिळाल्या आणि शहरी भागात भाजपला थेट १२ जागांचा लाभ झाला. त्यामुळे काँग्रेसला ४६ जागांवर समाधान मानावे लागले. लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसला माफकच यश मिळाले. अमृतसर मतदारसंघात मात्र अर्थमंत्री अरुण जेटलींचा कॅप्टन अमरिंदरसिंगांनी पराभव केला. सर्व अंदाजांना पूर्णविराम देत माजी क्रिकेटपटू खासदार नवज्योतसिंग सिध्दू यंदा काँग्रेसच्या तिकिटावर लढणार आहेत. काँग्रेससाठी ही नक्कीच जमेची बाजू आहे.>‘आप’चे अस्तित्व पणालापंजाबमध्ये काँग्रेस बऱ्यापैकी मजबूत अवस्थेत आहे. मध्यंतरी ‘आप’ मधे जी फूट पडली त्यामुळे सुरूवातीला ‘आप’ च्या दिशेने झुकलेला जनमताच्या प्रतिसादाचा लंबक अचानक काँग्रेसच्या दिशेने वळल्याचे दिसू लागले.तरीही केजरीवाल यांच्या सभांना प्रचंड गर्दी झाली. दिल्ली पॅटर्ननुसार ‘आप’ च्या स्वयंसेवकांनीही घरोघरी जात मतदारांच्या वारंवार भेटी घेतल्या. त्यामुळे स्पर्धेत ‘आप’चे स्थान बऱ्यापैकी मजबूत झाले.विषय सर्जिकल स्ट्राइक्सचा असो की नोटबंदीचा, अकाली दल आणि भाजपच्या नेतृत्वावर सर्वाधिक कडवट हल्ले केजरीवालच चढवत आहेत. पंजाब व गोवाच्या निवडणुकीत ‘आप’ चे अस्तित्वच पणाला लागले आहे.>अकालीचा ‘उडता पंजाब’पंजाबची सत्ता १0 वर्षांपासून अकाली दल भाजप आघाडीच्या हाती आहे. सर्वात ज्येष्ठ व अनुभवी मुख्यमंत्री म्हणून प्रकाशसिंग बादल देशभर ओळखले जातात. त्यांचे सुपुत्र सुखबीरसिंग उपमुख्यमंत्री आहेत. सुखबीर यांच्या पत्नी हरसिमरत कौर केंद्रात मंत्री आहेत. अमली पदार्थांचा विळख्यामुळे ‘उडता पंजाब’ स्थितीत पोहोचलेले राज्य, हा अकाली दल राजवटीला लागलेला सर्वांत मोठा कलंक. पंतप्रधानांच्या नोटबंदीच्या निर्णयामुळे ग्रामीण भागातले वातावरण धुमसते आहे. भाजपच्या केंद्रीय नेत्यांचे फटकून वागणेही अकाली दलाला त्रासदायकच ठरले आहे. १0 वर्षांच्या विविध आरोपांचा सामना करणारा अकाली दल व भाजपा बचावाच्या पवित्र्यात आहेत. दोघांची पीछेहाट झाल्याचे चित्र दिसते आहे. पंतप्रधान मोदींची लोकप्रियता, सर्जिकल स्ट्राइक्स यांसारखे मुद्दे प्रचारात आणून या आघाडीने आपली पत सांभाळण्याचा प्रयत्न चालवला आहे. >117जागांसाठी ४ फेब्रुवारी रोजी मतदान आहे. प्रारंभिक अंदाजानुसार यंदाची लढत काँग्रेस आणि‘आप’मधेच असून, सत्ताधारी आघाडी तिसऱ्या क्रमांकावर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.>विद्यमान मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल(८९) बहुदा आयुष्यातल्या अखेरच्या निवडणुकीला सामोरे जात आहेत. तोच मुद्दा अकाली दल मांडू पाहत आहे.