शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

Priyanka Gandhi : 'माझ्या मुलांचं इन्स्टाग्राम हॅक करताहेत; सरकारकडे कोणतंच काम नाहीय का?'; प्रियंका गांधी संतापल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2021 16:34 IST

Congress Priyanka Gandhi : सध्या उत्तर प्रदेशमध्ये फोन टॅपिंग हे प्रकरण गाजत आहे. याच दरम्यान प्रियंका गांधी यांनी टीकास्त्र सोडलं आहे. 

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीआधी राजकारण तापलं आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. याच दरम्यान काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी (Congress Priyanka Gandhi) यांनी पुन्हा एकदा उत्तर प्रदेशमधील सरकारवर जोरदार हल्लाबोल करत गंभीर आरोप केला आहे. आपल्या मुलांचं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक केल्याचा दावा केला आहे. तसेच सरकारकडे आता कोणतंच काम नाही आहे का? असं म्हणत निशाणा साधला आहे. सध्या उत्तर प्रदेशमध्ये फोन टॅपिंग हे प्रकरण गाजत आहे. याच दरम्यान प्रियंका गांधी यांनी टीकास्त्र सोडलं आहे. 

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी यूपी सरकार त्यांचा फोन टॅप करतं आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे त्याचं बोलणं ऐकतात असा दावा केला आहे. तसेच त्यांनी सपा कार्यालयाचे सर्व फोन कॉल्स ऐकले जातात. जरी पत्रकारांनी संपर्क साधला तरी ते बोलणं देखील ऐकलं जातं असं म्हटलं आहे. यावरूनच प्रियंका यांनी सरकारचं काम काय आहे? तर विकास करणं, लोकांच्या समस्या सोडवणं, अत्याचार रोखणं असं आहे. पण येथे सरकार हे विरोधी पक्षाचे फोन टॅप करण्यात व्यस्त आहे असं म्हटलं आहे. प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्या कार्यक्रमावर देखील टीका केली आहे. 

'हे अक्षम्य! असं कोणी बोलूच कसं शकतं'

कर्नाटक विधानसभेचे माजी अध्यक्ष के. आर. रमेश कुमार यांनी बलात्काराबाबत बादग्रस्त विधान केलं आहे. सर्वच स्तरातून त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला जात आहे. याच दरम्यान प्रियंका गाधी यांनी देखील यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. त्या चांगल्याच संतापल्या आहेत. "हे अक्षम्य! असं कोणी बोलूच कसं शकतं" असं म्हटलं आहे. के. आर. रमेश कुमार यांनी विधानसभेत महिलांबाबत आक्षेपार्ह विधान केलं आहे. 'बलात्कार रोखता येत नसेल तर झोपून राहा आणि त्याचा आनंद घ्या' असं म्हटलं आहे. गंभीर बाब म्हणजे रमेश कुमार यांच्या या विधानावर आक्षेप न घेता विधानसभा अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे यांनी हसून त्यांना प्रतिसाद दिला. 

रमेश कुमार यांच्यावर कारवाई करत त्यांचा राजीनामा घेण्याची मागणीही करण्यात येत आहे. प्रियंका गांधी यांनी आमदाराला चांगलेच फटकारले आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं. "रमेश कुमार यांनी जे विधान केले आहे त्याचा मी तीव्र शब्दांत निषेध करत आहे. बलात्कार हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे आणि त्याबाबत असं कोणी बोलूच कसं शकतं? हे अक्षम्य आहे" असं म्हटलं आहे. विधानसभेतील कामकाजादरम्यान घडलेल्या धक्कादायक प्रकाराचा जोरदार व्हायरल झाला आहे. देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसyogi adityanathयोगी आदित्यनाथ