शहरं
Join us  
Trending Stories
1
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
2
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
3
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
4
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
5
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
6
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
7
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
8
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
9
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
10
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
11
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
12
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
13
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
14
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
15
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
16
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
17
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
18
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
19
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
20
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
Daily Top 2Weekly Top 5

Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 15:32 IST

Priyanka Gandhi And Pahalgam Terror Attack : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरून काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरून काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. प्रियंका यांनी हा हल्ला सुरक्षेतील गंभीर चूक असल्याचं म्हणत या हल्ल्याला कोण जबाबदार आहे असा सवाल देखील उपस्थित केला आहे. "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले होते, परंतु सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं. तेथे कोणतीही सुरक्षाव्यवस्था नव्हती." 

"नागरिकांची सुरक्षा ही संरक्षणमंत्र्यांची जबाबदारी नाही? ती गृहमंत्र्यांची जबाबदारी नाही का?" असं म्हणत निशाणा साधला आहे. टीआरएफच्या स्थापनेचा, त्यांच्या कारवायांचा आणि दहशतवादी संघटनांचा उल्लेख करून प्रियंका गांधी यांनी प्रश्न उपस्थित केले आणि म्हटलं की, सरकारची अशी कोणतीही एजन्सी नाही जिला असा भयानक हल्ला नियोजित असल्याची माहिती मिळेल. हे एजन्सींचं अपयश आहे की नाही? हे मोठं अपयश आहे.

"बैसरन खोऱ्यातील या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी टीआरएफ या दहशतवादी संघटनेने (जी पाकिस्तान समर्थित लष्कर-ए-तोयबाचा भाग आहे) घेतली आहे. दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांच्या धर्माच्या आधारावर लक्ष्य केलं आणि अंदाधुंद गोळीबार केला, ज्यामध्ये २६ लोकांचा मृत्यू झाला. २०१९ च्या पुलवामा हल्ल्यानंतर हा हल्ला काश्मीरमधील नागरिकांवर झालेला सर्वात घातक हल्ला मानला जातो" असंही प्रियंका यांनी म्हटलं. 

पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या कानपूरच्या शुभम द्विवेदीचा प्रियंका गांधींनी उल्लेख केला. "शुभम त्याच्या कुटुंबासह पहलगामच्या सुंदर दऱ्यांचा आनंद घेण्यासाठी गेला होता, परंतु दहशतवाद्यांनी शुभमला त्याच्या पत्नीसमोर गोळ्या घातल्या. शुभमसारखे अनेक लोक शांत काश्मीरच्या सरकारच्या दाव्यांवर विश्वास ठेवून तिथे गेले होते, परंतु त्यांना सुरक्षा मिळाली नाही" असं देखील प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाterroristदहशतवादीJammu Kashmirजम्मू-काश्मीर