शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 15:32 IST

Priyanka Gandhi And Pahalgam Terror Attack : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरून काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरून काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. प्रियंका यांनी हा हल्ला सुरक्षेतील गंभीर चूक असल्याचं म्हणत या हल्ल्याला कोण जबाबदार आहे असा सवाल देखील उपस्थित केला आहे. "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले होते, परंतु सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं. तेथे कोणतीही सुरक्षाव्यवस्था नव्हती." 

"नागरिकांची सुरक्षा ही संरक्षणमंत्र्यांची जबाबदारी नाही? ती गृहमंत्र्यांची जबाबदारी नाही का?" असं म्हणत निशाणा साधला आहे. टीआरएफच्या स्थापनेचा, त्यांच्या कारवायांचा आणि दहशतवादी संघटनांचा उल्लेख करून प्रियंका गांधी यांनी प्रश्न उपस्थित केले आणि म्हटलं की, सरकारची अशी कोणतीही एजन्सी नाही जिला असा भयानक हल्ला नियोजित असल्याची माहिती मिळेल. हे एजन्सींचं अपयश आहे की नाही? हे मोठं अपयश आहे.

"बैसरन खोऱ्यातील या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी टीआरएफ या दहशतवादी संघटनेने (जी पाकिस्तान समर्थित लष्कर-ए-तोयबाचा भाग आहे) घेतली आहे. दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांच्या धर्माच्या आधारावर लक्ष्य केलं आणि अंदाधुंद गोळीबार केला, ज्यामध्ये २६ लोकांचा मृत्यू झाला. २०१९ च्या पुलवामा हल्ल्यानंतर हा हल्ला काश्मीरमधील नागरिकांवर झालेला सर्वात घातक हल्ला मानला जातो" असंही प्रियंका यांनी म्हटलं. 

पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या कानपूरच्या शुभम द्विवेदीचा प्रियंका गांधींनी उल्लेख केला. "शुभम त्याच्या कुटुंबासह पहलगामच्या सुंदर दऱ्यांचा आनंद घेण्यासाठी गेला होता, परंतु दहशतवाद्यांनी शुभमला त्याच्या पत्नीसमोर गोळ्या घातल्या. शुभमसारखे अनेक लोक शांत काश्मीरच्या सरकारच्या दाव्यांवर विश्वास ठेवून तिथे गेले होते, परंतु त्यांना सुरक्षा मिळाली नाही" असं देखील प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाterroristदहशतवादीJammu Kashmirजम्मू-काश्मीर