शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 15:32 IST

Priyanka Gandhi And Pahalgam Terror Attack : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरून काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरून काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. प्रियंका यांनी हा हल्ला सुरक्षेतील गंभीर चूक असल्याचं म्हणत या हल्ल्याला कोण जबाबदार आहे असा सवाल देखील उपस्थित केला आहे. "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले होते, परंतु सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं. तेथे कोणतीही सुरक्षाव्यवस्था नव्हती." 

"नागरिकांची सुरक्षा ही संरक्षणमंत्र्यांची जबाबदारी नाही? ती गृहमंत्र्यांची जबाबदारी नाही का?" असं म्हणत निशाणा साधला आहे. टीआरएफच्या स्थापनेचा, त्यांच्या कारवायांचा आणि दहशतवादी संघटनांचा उल्लेख करून प्रियंका गांधी यांनी प्रश्न उपस्थित केले आणि म्हटलं की, सरकारची अशी कोणतीही एजन्सी नाही जिला असा भयानक हल्ला नियोजित असल्याची माहिती मिळेल. हे एजन्सींचं अपयश आहे की नाही? हे मोठं अपयश आहे.

"बैसरन खोऱ्यातील या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी टीआरएफ या दहशतवादी संघटनेने (जी पाकिस्तान समर्थित लष्कर-ए-तोयबाचा भाग आहे) घेतली आहे. दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांच्या धर्माच्या आधारावर लक्ष्य केलं आणि अंदाधुंद गोळीबार केला, ज्यामध्ये २६ लोकांचा मृत्यू झाला. २०१९ च्या पुलवामा हल्ल्यानंतर हा हल्ला काश्मीरमधील नागरिकांवर झालेला सर्वात घातक हल्ला मानला जातो" असंही प्रियंका यांनी म्हटलं. 

पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या कानपूरच्या शुभम द्विवेदीचा प्रियंका गांधींनी उल्लेख केला. "शुभम त्याच्या कुटुंबासह पहलगामच्या सुंदर दऱ्यांचा आनंद घेण्यासाठी गेला होता, परंतु दहशतवाद्यांनी शुभमला त्याच्या पत्नीसमोर गोळ्या घातल्या. शुभमसारखे अनेक लोक शांत काश्मीरच्या सरकारच्या दाव्यांवर विश्वास ठेवून तिथे गेले होते, परंतु त्यांना सुरक्षा मिळाली नाही" असं देखील प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाterroristदहशतवादीJammu Kashmirजम्मू-काश्मीर