शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
2
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
3
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
4
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
5
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
6
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या
7
France Gen-Z Protest: फ्रान्समध्ये Gen- Z चा संताप! लिमामध्ये DINA विरोधात बंड, दगडफेक आणि पोलिसांशी झटापट
8
...तर पतीच्या प्रेयसीकडून पत्नीला मिळेल भरपाई; हायकोर्टानं नोंदवली निरीक्षणे
9
आजचे राशीभविष्य- २२ सप्टेंबर २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास! आर्थिक लाभ होणार
10
ट्रम्प हे मित्र की शत्रू..अमेरिकेच्या २ निर्णयांनी भारताला बसला मोठा फटका; पुढे काय करायला हवं?
11
घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी
12
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
13
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
14
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
15
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
16
पाकिस्तानी ‘खेळाडूंना’ जपानमध्ये अटक; परदेशात जाण्यासाठी वापरला वेगळाच अन् अफलातून फंडा
17
राज्य सहकारी बँकेत पती-पत्नीला एकत्र नोकरीला असेल बंदी; विवाहानंतर ६० दिवसांत राजीनामा बंधनकारक
18
जनाब, आपल्या पायाखाली काय जळते ते पाहा...अमेरिकेची चाल, भारताभोवती तयार होतोय धोकादायक त्रिकोण
19
विशिष्ट समुदायासाठी उभारली जाते इमारत; गृहनिर्माण संस्थांना सदस्य निवडीचा अधिकार आहे का?
20
धगधगत्या ज्वालेतून आली जगन्माता, भक्ती दाटते नाव घेता...; कुलस्वामिनीच्या उत्सवाचे विविध रंग

भाजपाविरोधात काँग्रेसचे प्रियंकाअस्त्र; मायावती-अखिलेश यांनाही बसणार फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2019 01:13 IST

मोदी सरकारने लोकप्रिय घोषणा करून २०१९ च्या निवडणुका जिंकण्याचे डावपेच आखल्यानेच काँग्रेसनेदेखील प्रियंका गांधी यांना पक्षाचे सरचिटणीस करून राजकारणात उतरवले आहे.

- धनाजी कांबळे

मोदी सरकारने लोकप्रिय घोषणा करून २०१९ च्या निवडणुका जिंकण्याचे डावपेच आखल्यानेच काँग्रेसनेदेखील प्रियंका गांधी यांना पक्षाचे सरचिटणीस करून राजकारणात उतरवले आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश व देशातील इतर राज्यांतही राहुल व प्रियंका गांधी भाजपाला रोखण्यासाठी रान उठवतील, अशी शक्यता आहे. ज्या उत्तर प्रदेशातून दिल्लीच्या सत्तेचा मार्ग जातो, त्याच राज्याच्या पूर्व भागांत प्रियंका गांधी अधिक लक्ष देणार असल्याने आगामी निवडणुकीत सत्तेची गणिते बदलण्याची शक्यता आहे.बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव हे दोघेही उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री होते. उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकांत मायावती व अखिलेश यादव यांनी भाजपालापार पराभूत केले. भाजपाला आव्हान देण्यासाठी समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाने आघाडी केल्याने काँग्रेस एकटेपडण्याची शक्यता होती. त्यात मतांचीविभागणी झाल्याने भाजपालाच त्याचा फायदा होईल, या भीतीने काँग्रेसने प्रियंका गांधी यांना मैदानात उतरवले आहे. विशेषत: भाजपाविरोधात देशात एक व्यापक आघाडी उभी केली जाईल, अशी घोषणा काही महिन्यांपूर्वी करण्यात आली होती. यावेळी मायावती व अखिलेश यादव हेही काँग्रेससोबत होते. मात्र, आता निवडणुका तोंडावर आल्या असताना काँग्रेस व भाजपाला वगळून मायावती आणि अखिलेश यांनी आघाडी केली आहे. त्याचा निश्चित परिणाम दलित, आदिवासी आणि यादव समाजाच्या मतांवर होईल. त्यामुळेच काँग्रेसने भाजपाला रोखण्यासाठी प्रियंका गांधी यांना राजकारणात उतरवले आहे. तसेच त्यांना पक्षाचे सरचिटणीसपद देऊन त्यांच्याकडे उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाची जबाबदारी सोपविली आहे.माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची छबी प्रियंका गांधी यांच्यामध्ये दिसत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आलेला आहे. त्याचप्रमाणे मतदारांवरदेखील प्रियंका यांचा प्रभाव आहे. त्याचा फायदा काँग्रेसला होण्याची शक्यता बळावली आहे. प्रियंका यांच्या प्रभावी वक्तृत्वाचेही मतदारांना आकर्षण आहे.‘प्रियंका फॅक्टर’ काँग्रेससाठी किती लाभदायी ठरतो, याबाबतची उत्सुकता असताना एका सर्वेक्षणात प्रियंकामुळे उत्तर प्रदेशात काँग्रेसचा मतांचा टक्का नक्कीच वाढेल, असा अंदाज वर्तविला आहे. प्रत्यक्षात प्रियंका गांधी यांची जादू किती चालते हे पाहणे औैत्सुक्याचे ठरणार आहे. भाजपाने मात्र अपेक्षेप्रमाणेच नेहरू-गांधी घराणेशाहीचे हे आणखी एक उदाहरण आहे, अशी टीका केली आहे. प्रियंका गांधी कदाचित अमेठी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे, तर राहुल गांधी रायबरेलीमधून निवडणूक लढवतील, असे जवळपास नक्की आहे. मायावती आणि अखिलेश यांच्याविषयी आदर असून, आमची लढाई भाजपाविरोधात असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. त्यामुळे मायावती आणि अखिलेश यांच्या आघाडीच्या उमेदवाराच्या विरोधात काँग्रेस आपले उमेदवार उभे करणार का, हे पाहणेदेखील महत्त्वाचे ठरणार आहे.एकगठ्ठा मते वळविण्याचे कसबउत्तर प्रदेशात लोकसभेच्या ८0 जागा आहेत. त्यातील ५0 जागांची जबाबदारी प्रियंका गांधी यांच्यावर आहे. उत्तर प्रदेशात ब्राह्मण मतदार १५ टक्के व मुस्लिम मते २३ टक्के असून, त्यांच्यावर प्रियंका प्रभाव पाडू शकतील, असे काँग्रेसला वाटते.उत्तर प्रदेशच्या पूर्व भागातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसी मतदारसंघ येतो आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची राजकीय ताकदही उत्तर प्रदेशच्या पूर्व भागातच आहे. त्यामुळे त्या दोघांची डोकेदुखी यामुळे वाढली आहे.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९