शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

"देशभक्तीची सर्टिफिकेट्स वाटणाऱ्यांचे पितळ उघडे पडलेय"; सोनिया गांधींची बोचरी टीका

By देवेश फडके | Updated: January 22, 2021 13:34 IST

अर्णव गोस्वामी आणि माजी अधिकारी पार्थ दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅट व्हायरल झाल्याप्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

ठळक मुद्देअर्णव गोस्वामी व्हायरल चॅटप्रकरणावरून सोनिया गांधी यांची टीकाकेंद्र सरकारने कृषी कायदे घाईने आणले - सोनिया गांधीआगामी अधिवेशनात जनहिताच्या मुद्द्यांवरही चर्चा व्हावी - सोनिया गांधी

नवी दिल्ली : अर्णव गोस्वामी आणि माजी अधिकारी पार्थ दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅट व्हायरल झाल्याप्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीदरम्यान सोनिया गांधी यांनी या प्रकरणावर भाष्य केले. देशभक्तीचे प्रमाणपत्र वाटणाऱ्यांचे आता पितळ उघडे पडले आहे, अशी टीका सोनिया गांधी यांनी यावेळी केली. 

अर्णव गोस्वामी आणि पार्थ दासगुप्ता यांच्या व्हॉट्सअॅप चॅट व्हायरल प्रकरणी बोलताना सोनिया गांधी म्हणाल्या की, अलीकडेच चिंतेत टाकणाऱ्या बातम्या आम्ही पाहिल्या. देशाच्या सुरक्षेविषयी तडजोड करण्यात आली आहे. जी लोक देशभक्ती आणि राष्ट्रवादाचे प्रमाणपत्र वाटत फिरत होती. त्यांचे पितळ आता उघडे पडले आहे, असे त्या म्हणाल्या. खासगीकरण करण्यासाठी केंद्र सरकार उतावीळ झाले आहे, असेही सोनिया गांधी यांनी सांगितले.

एका आठवड्यानंतर संसदेचे अधिवेशन सुरू होणार आहे. आगामी अधिवेशन अर्थसंकल्पी असले, तरी जनहिताच्या मुद्द्यांवरही चर्चा होणे गरजेचे आहे. केंद्र सरकार यावर काय भूमिका घेते, ते पाहायला हवे, असे त्यांनी नमूद केले. 

केंद्रीय कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. सरकारने चर्चेच्या नावाखाली असंवेदनशीलता आणि अहंकार दाखवला आहे, असा आरोप करत कृषी कायदे आणण्यात केंद्र सरकारने घाई केली. संसदेतील सदस्यांना यावर विचार करायला किंवा याच्या परिणामांचा आढावा घेण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात आला नाही, असा दावा सोनिया गांधी यांनी केला.

टॅग्स :PoliticsराजकारणSonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसFarmerशेतकरीagitationआंदोलन