शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
2
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
3
Aadhaar App :'आधार कार्ड'मध्ये बदल करणे होणार सोपे, नवीन अ‍ॅप लाँचच्या तयारीत;मिळणार खास फीचर
4
हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप जीवघेणा; युरोपमध्ये ६२,७०० जणांचा मृत्यू, वाढत्या तापमानाचा जगाला धोका
5
९४ मिनिटांचा थरार! विमानांच्या चाकांमध्ये लपून दिल्लीत आलेल्या अफगाणी मुलासोबत पुढे काय घडलं?
6
'चॅटजीपीटी'कडून बनावट नोटा तयार करण्याचे धडे; ५०० रुपयांच्या नोटा बनवल्या आणि बाजारातही वापरल्या
7
महिंद्रा, PNB आणि L&T... दिवाळीपूर्वी मोठी कमाईची संधी! बाजारातील 'हे' ५ शेअर्स ठरू शकतात गेमचेंजर
8
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
9
International: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
10
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
11
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
12
घराशेजारच्या किराणा दुकानांमध्ये ‘GST बचत उत्सवा’चा लाभ नाहीच; ग्राहकांचा झाला अपेक्षाभंग
13
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या’ काँग्रेसची मागणी  
14
Ghaziabad Encounter: गाझियाबाद एन्काउंटरची इतिहासात नोंद, असं वेगळं काय घडलं? 
15
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
16
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
17
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान
18
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
19
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
20
वयाच्या २९व्या वर्षी वेगवान गोलंदाज निवृत्त; वकील बनण्यासाठी क्रिकेटशी तोडलं नातं!

'अब की बार... राहुल गांधी नेत्यांना भेटणार'; अध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर 'रागा 2.0' सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 15:11 IST

बुधवारपासून तीन राज्यांच्या नेत्यांची बैठक राहुल गांधी घेणार आहेत. महाराष्ट्रातील नेत्यांची बैठक 26 जून, हरयाणामधील 27 जून तर दिल्लीतील नेत्यांची बैठक 28 जून रोजी घेण्यात येणार आहे

नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्षपदाच्या  राजीनाम्याच्या एक महिन्यानंतर राहुल गांधी पुन्हा पक्षात सक्रीय होताना दिसत आहे. लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव जिव्हारी लागल्याने राहुल गांधी यांनी काँग्रस अध्यक्षपदाचा राजीनामा पक्षाच्या बैठकीत ठेवला होता. मात्र हा राजीनामा मागे घ्यावा यासाठी काँग्रेसचे अनेक नेतेमंडळी प्रयत्न करत होती. राजीनामा दिल्यानंतर पक्षाच्या सक्रीय राजकारणापासून राहुल गांधी लांब राहण्याचा प्रयत्न करत होते. 

मात्र बुधवारपासून तीन राज्यांच्या नेत्यांची बैठक राहुल गांधी घेणार आहेत. महाराष्ट्रातील नेत्यांची बैठक 26 जून, हरयाणामधील 27 जून तर दिल्लीतील नेत्यांची बैठक 28 जून रोजी घेण्यात येणार आहे. या तीन राज्यांमध्ये आगामी काळात विधानसभा निवडणुका पार पडणार आहे. त्यासाठी पक्षातंर्गत गटबाजी बाजूला सारत विधानसभा निवडणुकीची रणनीतीवर चर्चा करण्यासाठी राहुल गांधींनी नेत्यांची बैठक बोलविली आहे. या बैठकीनंतर प्रदेश नेतृत्वात बदल होणार की नाही हे स्पष्ट होणार आहे. संबंधित राज्यातील प्रभारी महासचिवही या बैठकीला उपस्थित राहतील. 

काँग्रेसने सोमवारी उत्तर प्रदेशमधील सर्व जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकारणी बरखास्त केली आहे. याठिकाणी नव्याने पदाधिकारी नेमण्याबाबत हालचाली सुरु आहेत. पक्षातील विधिमंडळ नेते अजय कुमार यांना पक्षातील संघटनात्मक फेरबदल करण्यासाठी प्रभारी म्हणून नियुक्त केलं आहे. त्याचसोबत पक्षांतर्गत तक्रारीचं निरसन करण्यासाठी तीन सदस्यीय शिस्तभंग कमिटीची स्थापना करत पोटनिवडणुकीच्या देखरेखीसाठी दोन सदस्यांची नियुक्ती केली आहे. 

राहुल गांधी यांच्या राजीनाम्यावर अद्यापही सस्पेन्स आहे. राजीनामा परत घ्यावा यासाठी काँग्रेस कार्यकारणीचा आग्रह राहुल गांधींनी मंजूर केला की नाही हे स्पष्ट नाही. मागील आठवड्यात नवीन अध्यक्षपद निवडणूक प्रक्रियेत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.  काही दिवसांपासून राहुल गांधी यांची समजूत काढण्यासाठी अनेक नेते प्रयत्नशील आहेत. मात्र राहुल गांधी हे अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या निर्णयावर ठाम असून, त्यांनी अंतिम निर्णय घेण्यासाठी पक्षाला एक महिन्याची मुदत दिल्याची चर्चा आहे. 

तुम्हाला पक्षात योग्य वाटतील तसे फेरबदल करा, तसेच पक्ष हवा तसा चालवा, असे सांगण्यात आल्यानंतर राहुल गांधी यांनी काही प्रमाणात मवाळ भूमिका स्वीकारल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. कार्यपद्धतीमधील काही अटींसह राहुल गांधी हे काँग्रेसच्या अध्यक्षपदी कायम राहण्यास तयार आहेत, असा दावा सूत्रांनी केला आहे. अहमद पटेल आणि प्रियंका गांधी यांच्यासोबत झालेला काही टप्प्यांमधील बैठकीनंतर राहुल गांधी या निर्णयाप्रत पोहोचले आहेत, असा दावा सूत्रांनी केला आहे.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस