शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

Congress President Election: काँग्रेस अध्यक्षपदासाठी KN Tripathi यांचा अर्ज बाद, 'हे' आहे कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2022 18:11 IST

आता मल्लिगार्जुन खर्गे आणि शशी थरूर यांच्यात थेट लढत

Congress President Election: काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक सध्या चर्चेत आहे. पक्षाच्या दिग्गज नेत्यांनी अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरले आहेत. पण त्याचवेळी या निवडणुकीशी संबंधित काही मोठ्या बातम्या समोर येत आहेत. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राहुल गांधी यांनी अर्ज भरला नाही. पण झारखंडचे माजी मंत्री केएन त्रिपाठी (KN Tripathi) यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. पण त्यांचा अर्ज शनिवारी फेटाळण्यात आल्याने पक्षाचे दोन दिग्गज मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर यांच्यात आता सामना रंगणार आहे.

केएन त्रिपाठी यांचा अर्ज का नाकारला?

तिन्ही नेत्यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर होती. दिल्लीच्या काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषदेला संबोधित करताना काँग्रेसचे केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे प्रमुख मधुसूदन मिस्त्री म्हणाले की, उमेदवारी प्रक्रियेदरम्यान एकूण २० फॉर्म प्राप्त झाले होते आणि त्यापैकी चार नाकारण्यात आले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, खर्गे यांनी १४ अर्ज भरले होते, तर थरूर यांनी पाच आणि त्रिपाठी यांनी एक फॉर्म भरला होता. मिस्त्री म्हणाले की, त्रिपाठी यांचा फॉर्म नाकारण्यात आला कारण त्यांच्या एका प्रस्तावकाची स्वाक्षरी जुळली नाही आणि दुसर्‍या प्रस्तावकाची स्वाक्षरी म्हणजे डुप्लिकेशन होते.

कोण आहेत KN त्रिपाठी?

केएन त्रिपाठी यांचे पूर्ण नाव कृष्णानंद त्रिपाठी आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत डाल्टनगंज विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेस उमेदवार म्हणून फॉर्म भरताना त्यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, ते ४१ कोटींच्या जंगम आणि स्थावर मालमत्तेचे मालक आहेत. झारखंडमधील काँग्रेसच्या बोलक्या नेत्यांमध्ये त्यांची गणना होते. ५० वर्षीय त्रिपाठी यांनी सुमारे नऊ वर्षे हवाई दलात सेवा केल्यानंतर २००० सालापासून झारखंडमधील पलामू परिसरात सक्रिय राजकारणात प्रवेश केला होता. २००९ मध्ये ते डाल्टनगंजमधून आमदार म्हणून निवडून आले आणि त्यांनी राज्य सरकारमध्ये ग्रामीण विकास मंत्री म्हणून काम केले. यानंतर ते कधीही विधानसभा निवडणुकीत जिंकू शकले नाहीत, मात्र त्यांच्या वक्तव्यांमुळे आणि पक्षाबाहेरील त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे ते चर्चेत राहिले.

टॅग्स :congressकाँग्रेसShashi Tharoorशशी थरूरRahul Gandhiराहुल गांधी