शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा, विधानसभा मतदारसंघात आता काँग्रेस पक्ष नेमणार प्रभारी; शेवटच्या स्तरापर्यंत उतरणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2022 05:46 IST

काँग्रेसच्या नेत्यांनी राहुल गांधी यांना सांगितले होते की, इलेक्शन मॅनेजमेंट भाजपासमोर खूपच कमजोर आहे. त्यामुळे आम्ही निवडणुका हरतो.

आदेश रावल, लोकमत न्यूज नेटवर्क 

नवी दिल्ली : उदयपूरमध्ये झालेल्या चिंतन शिबिरात काँग्रेसने अनेक नवे विभाग बनविण्याची घोषणा केली होती. यात सर्वात महत्त्वाचा विभाग आहे इलेक्शन मॅनेजमेंट डिपार्टमेंट. दीर्घ काळापासून याची मागणी पक्षातून होत होती. अद्याप हा विभाग स्थापनही झाला नाही तोच काँग्रेसने शेवटच्या स्तरापर्यंत उतरण्याचा कार्यक्रम आखला आहे. 

त्यानुसार, हा विभाग ६५०० काँग्रेस नेत्यांना देशाच्या प्रत्येक विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघात पाठविणार आहे. तालुका स्तरापासून ते जिल्हा स्तरापर्यंत एक कार्यपद्धती पक्ष तयार करीत आहे. अगोदर ग्रामीण, तालुका, जिल्हा स्तरापर्यंत समिती स्थापन करण्यात येईल. त्यानंतर अखिल भारतीय काँग्रेस समिती आपल्या या विशेष लोकांच्या माध्यमातून सर्वच बाबींची पडताळणी करणारी कार्यपद्धती तयार करेल. जो व्यक्ती विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघाचा प्रभारी असेल तो याची माहिती देईल. मात्र, तिकीट कोणाला द्यायचे याचा निर्णय पक्ष घेईल.

नवा प्रस्ताव का आला समोर?

- आसाम, पश्चिम बंगाल, केरळ विधानसभा निवडणुका हरल्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी राहुल गांधी यांना हे सांगितले होते की, आमचे इलेक्शन मॅनेजमेंट भाजपासमोर खूपच कमजोर आहे. त्यामुळे आम्ही निवडणुका हरतो.

- अलीकडेच काँग्रेसचा पाच राज्यात पराभव झाला तेव्हा रणनीतीकार प्रशांत किशोर यांनीही हेच सांगितले होते की, इलेक्शन मॅनेजमेंट डिपार्टमेंट असायला हवे.

- प्रशांत किशोर हे या विभागाचे सरचिटणीस होऊ इच्छित होते. तसेच, त्यांची अशीही अट होती की, ते काँग्रेस अध्यक्षांशिवाय कोणालाही रिपोर्ट करणार नाहीत. प्रशांत किशोर यांच्या काँग्रेस प्रवेशावर आता पूर्णविराम लागला आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधी