शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

लोकसभा, विधानसभा मतदारसंघात आता काँग्रेस पक्ष नेमणार प्रभारी; शेवटच्या स्तरापर्यंत उतरणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2022 05:46 IST

काँग्रेसच्या नेत्यांनी राहुल गांधी यांना सांगितले होते की, इलेक्शन मॅनेजमेंट भाजपासमोर खूपच कमजोर आहे. त्यामुळे आम्ही निवडणुका हरतो.

आदेश रावल, लोकमत न्यूज नेटवर्क 

नवी दिल्ली : उदयपूरमध्ये झालेल्या चिंतन शिबिरात काँग्रेसने अनेक नवे विभाग बनविण्याची घोषणा केली होती. यात सर्वात महत्त्वाचा विभाग आहे इलेक्शन मॅनेजमेंट डिपार्टमेंट. दीर्घ काळापासून याची मागणी पक्षातून होत होती. अद्याप हा विभाग स्थापनही झाला नाही तोच काँग्रेसने शेवटच्या स्तरापर्यंत उतरण्याचा कार्यक्रम आखला आहे. 

त्यानुसार, हा विभाग ६५०० काँग्रेस नेत्यांना देशाच्या प्रत्येक विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघात पाठविणार आहे. तालुका स्तरापासून ते जिल्हा स्तरापर्यंत एक कार्यपद्धती पक्ष तयार करीत आहे. अगोदर ग्रामीण, तालुका, जिल्हा स्तरापर्यंत समिती स्थापन करण्यात येईल. त्यानंतर अखिल भारतीय काँग्रेस समिती आपल्या या विशेष लोकांच्या माध्यमातून सर्वच बाबींची पडताळणी करणारी कार्यपद्धती तयार करेल. जो व्यक्ती विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघाचा प्रभारी असेल तो याची माहिती देईल. मात्र, तिकीट कोणाला द्यायचे याचा निर्णय पक्ष घेईल.

नवा प्रस्ताव का आला समोर?

- आसाम, पश्चिम बंगाल, केरळ विधानसभा निवडणुका हरल्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी राहुल गांधी यांना हे सांगितले होते की, आमचे इलेक्शन मॅनेजमेंट भाजपासमोर खूपच कमजोर आहे. त्यामुळे आम्ही निवडणुका हरतो.

- अलीकडेच काँग्रेसचा पाच राज्यात पराभव झाला तेव्हा रणनीतीकार प्रशांत किशोर यांनीही हेच सांगितले होते की, इलेक्शन मॅनेजमेंट डिपार्टमेंट असायला हवे.

- प्रशांत किशोर हे या विभागाचे सरचिटणीस होऊ इच्छित होते. तसेच, त्यांची अशीही अट होती की, ते काँग्रेस अध्यक्षांशिवाय कोणालाही रिपोर्ट करणार नाहीत. प्रशांत किशोर यांच्या काँग्रेस प्रवेशावर आता पूर्णविराम लागला आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधी