शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
3
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
4
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
5
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
6
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
7
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
9
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
10
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
11
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
12
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
13
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
14
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
15
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
16
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
17
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
18
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
19
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
20
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या

केंद्र सरकारला घेरण्याची काँग्रेस पक्षाची तयारी, विरोधी पक्षांशी बोलून रणनीती ठरवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2021 06:56 IST

काँग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे होते की, चॅटसमधून खुलासा झाला की, ‘सीसीएस’ च्या सदस्यांकडून देशाचे सर्वोच्च संरक्षण भेद लीक झाले. असे होणे देशाची सुरक्षा व अखंडतेसाठी घातक आहे.

शीलेश शर्मा नवी दिल्ली : काँग्रेस देशाच्या सुरक्षेवरून मोदी सरकारला संसदेच्या आगामी अधिवेशनात घेरण्याची तयारी करीत आहेत. याचे संकेत बुधवारी पक्षाचे वरिष्ठ नेते ए. के. अँटोनी, सुशीलकुमार शिंदे, सलमान खुर्शीद हे पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या व्हॉटसॲपवरून झालेल्या खुलाशावरून बोलत असताना राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलामनबी आझाद यांनी दिले.आझाद आणि शिंदे म्हणाले की, अधिवेशन सुरू झाल्यावर विरोधी नेत्यांशी चर्चा करून काँग्रेस रणनीती ठरवेल. लष्कराशी संबंधित गोपनीय माहिती गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि पंतप्रधान मोदी यांना होती. बालाकोटमधील हवाई हल्ल्याच्या तीन दिवस आधी गोपनीय माहिती अर्णब गोस्वामी यांना कोणीतरी एकाने दिली. गोपनीय कायद्यानुसार ही गंभीर बाब आहे. राजद्रोहासारखाच हा गुन्हा आहे, असा युक्तिवाद करून संबंधित मंत्र्यांना काढून टाकण्याची मागणी त्यांनी केली. काँग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे होते की, चॅटसमधून खुलासा झाला की, ‘सीसीएस’ च्या सदस्यांकडून देशाचे सर्वोच्च संरक्षण भेद लीक झाले. असे होणे देशाची सुरक्षा व अखंडतेसाठी घातक आहे. ओएसए आणि गोपनीयतेच्या संवैधानिक शपथेचे उल्लंघन करणारे मंत्री तथा अधिकाऱ्यांची चौकशी होऊन त्यांना तत्काळ बरखास्त केले जावे. गोस्वामी-व्हाॅट्सॲप्प चॅट प्रकरणाने पंतप्रधान, गृहमंत्री आणि उच्च पदांवर बसलेल्या लोकांनी देशाच्या सुरक्षेबाबत केलेला अक्षम्य अपराध व संविधानच्या शपथेशी तडजोड करून भेसूर चेहरा दाखविला आहे. 

शेतकरी आंदोलन मध्यमवर्गावरही परिणाम करणारे असेल- राहुल गांधी -

- आंदोलन हे फक्त शेतकऱ्यांचे आहे, असे समजणे चूक आहे. नव्या तीन कृषी कायद्यांचा परिणाम किमान आधारभूत भाव (एमएसपी) नष्ट होऊन धान्याचे भाव भडकतील, तेव्हा मध्यमवर्गावरही होईल, असे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी म्हटले.- राहुल गांधी यांनी ट्वीटरवर याच मुद्यावर सरकारला घेरले. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त आपले पत्रकार आणि भांडवलदार मित्रांसाठी काम करीत आहेत. आज वस्तुस्थिती सगळ्यांच्या समाेर आहे.

- पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या व्हॉटस‌्-ॲप चॅटिंगवरून काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनीही मोदी सरकारवर तिखट हल्ला केला. त्या म्हणाल्या, ‘देशाच्या सुरक्षेशी संबंधित अतिगोपनीय माहिती एका पत्रकाराला दिली गेली. आमच्या देशाचे वीर जवान शहीद झाले. पत्रकार म्हणतो की, ‘आमचा फायदा होईल.’ राष्ट्रवादाचा दावा करणारे राष्ट्रद्रोही कारवाया करताना पकडले गेले. ही खूप गंभीर बाब आहे. याची तटस्थ चौकशी झाली पाहिजे.” सरकार शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकत नाही, तर दुसरीकडे जवानांच्या जीविताशी खेळत आहे, असेही गांधी म्हणाल्या.

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाParliamentसंसदCentral Governmentकेंद्र सरकार