शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

केंद्र सरकारला घेरण्याची काँग्रेस पक्षाची तयारी, विरोधी पक्षांशी बोलून रणनीती ठरवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2021 06:56 IST

काँग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे होते की, चॅटसमधून खुलासा झाला की, ‘सीसीएस’ च्या सदस्यांकडून देशाचे सर्वोच्च संरक्षण भेद लीक झाले. असे होणे देशाची सुरक्षा व अखंडतेसाठी घातक आहे.

शीलेश शर्मा नवी दिल्ली : काँग्रेस देशाच्या सुरक्षेवरून मोदी सरकारला संसदेच्या आगामी अधिवेशनात घेरण्याची तयारी करीत आहेत. याचे संकेत बुधवारी पक्षाचे वरिष्ठ नेते ए. के. अँटोनी, सुशीलकुमार शिंदे, सलमान खुर्शीद हे पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या व्हॉटसॲपवरून झालेल्या खुलाशावरून बोलत असताना राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलामनबी आझाद यांनी दिले.आझाद आणि शिंदे म्हणाले की, अधिवेशन सुरू झाल्यावर विरोधी नेत्यांशी चर्चा करून काँग्रेस रणनीती ठरवेल. लष्कराशी संबंधित गोपनीय माहिती गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि पंतप्रधान मोदी यांना होती. बालाकोटमधील हवाई हल्ल्याच्या तीन दिवस आधी गोपनीय माहिती अर्णब गोस्वामी यांना कोणीतरी एकाने दिली. गोपनीय कायद्यानुसार ही गंभीर बाब आहे. राजद्रोहासारखाच हा गुन्हा आहे, असा युक्तिवाद करून संबंधित मंत्र्यांना काढून टाकण्याची मागणी त्यांनी केली. काँग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे होते की, चॅटसमधून खुलासा झाला की, ‘सीसीएस’ च्या सदस्यांकडून देशाचे सर्वोच्च संरक्षण भेद लीक झाले. असे होणे देशाची सुरक्षा व अखंडतेसाठी घातक आहे. ओएसए आणि गोपनीयतेच्या संवैधानिक शपथेचे उल्लंघन करणारे मंत्री तथा अधिकाऱ्यांची चौकशी होऊन त्यांना तत्काळ बरखास्त केले जावे. गोस्वामी-व्हाॅट्सॲप्प चॅट प्रकरणाने पंतप्रधान, गृहमंत्री आणि उच्च पदांवर बसलेल्या लोकांनी देशाच्या सुरक्षेबाबत केलेला अक्षम्य अपराध व संविधानच्या शपथेशी तडजोड करून भेसूर चेहरा दाखविला आहे. 

शेतकरी आंदोलन मध्यमवर्गावरही परिणाम करणारे असेल- राहुल गांधी -

- आंदोलन हे फक्त शेतकऱ्यांचे आहे, असे समजणे चूक आहे. नव्या तीन कृषी कायद्यांचा परिणाम किमान आधारभूत भाव (एमएसपी) नष्ट होऊन धान्याचे भाव भडकतील, तेव्हा मध्यमवर्गावरही होईल, असे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी म्हटले.- राहुल गांधी यांनी ट्वीटरवर याच मुद्यावर सरकारला घेरले. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त आपले पत्रकार आणि भांडवलदार मित्रांसाठी काम करीत आहेत. आज वस्तुस्थिती सगळ्यांच्या समाेर आहे.

- पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या व्हॉटस‌्-ॲप चॅटिंगवरून काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनीही मोदी सरकारवर तिखट हल्ला केला. त्या म्हणाल्या, ‘देशाच्या सुरक्षेशी संबंधित अतिगोपनीय माहिती एका पत्रकाराला दिली गेली. आमच्या देशाचे वीर जवान शहीद झाले. पत्रकार म्हणतो की, ‘आमचा फायदा होईल.’ राष्ट्रवादाचा दावा करणारे राष्ट्रद्रोही कारवाया करताना पकडले गेले. ही खूप गंभीर बाब आहे. याची तटस्थ चौकशी झाली पाहिजे.” सरकार शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकत नाही, तर दुसरीकडे जवानांच्या जीविताशी खेळत आहे, असेही गांधी म्हणाल्या.

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाParliamentसंसदCentral Governmentकेंद्र सरकार