शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
4
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
5
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
6
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
7
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
8
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
9
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
10
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
11
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
12
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
13
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
14
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
15
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
16
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
17
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
18
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
19
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
20
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 

दिल्लीतील पराभवानंतर काँग्रेसमध्ये फेरबदलाचे वारे, २०२९ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 17:18 IST

Congress Party : २०२९ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नवीन टीम बनवण्यासाठी प्रयत्न करत आहे.

गेल्या काही निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाला अपयश मिळाले आहे. त्यामुळे आता काँग्रेसने पक्षाच्या संघटनेत फेरबदल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. २०२९ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नवीन टीम बनवण्यासाठी प्रयत्न करत आहे. या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या बिहार आणि पुढील वर्षात होणाऱ्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीची समीकरणे लक्षात घेता काँग्रेसकडून संघटनेत फेरबदल करण्यात येत आहेत. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाचे संघटन सरचिटणीस केसी वेणुगोपाल हे आपल्या पदावर कायम राहतील. तर बिहार, राजस्थान, पंजाब, हरियाणा, तेलंगणा आणि आसाममध्ये प्रभारी बदलले जाऊ शकतात. याचबरोबर, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, तामिळनाडू, बिहार आणि उत्तराखंड या राज्यांचे प्रदेशाध्यक्षही बदलले जाऊ शकतात. 

दुसरीकडे, पक्षाचे प्रभारी मोहन प्रकाश यांना संघटनेतून बाहेर केले जाऊ शकते. तसेच, गुलाम अहमद मीर हे काश्मीरमधील काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते असल्याने त्यांच्याकडील झारखंडमधील जबाबदारी काढून घेतली जाऊ शकते. याशिवाय, भूपेश बघेल यांना सरचिटणीस बनवून संघटनेत आणले जाऊ शकते. तर मीनाक्षी नटराजन, सचिन राव, अजय कुमार लल्लू,वामशी रेड्डी, कृष्णा अलावुरु यांसारख्या नेत्यांना संघटनेत नवीन जबाबदाऱ्या दिल्या जाऊ शकतात. 

दरम्यान, नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा पराभवाचा सामना करावा लागला. याआधीही हरयाणा, महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा काँग्रेसला अपयश मिळाले. तसेच, यापूर्वी लोकसभा निवडणुकीत सुद्धा काँग्रेसचा पराभव झाला. त्यामुळे आता काँग्रेसने पक्षाच्या संघटनेत फेरबदल करण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे.

टॅग्स :congressकाँग्रेस