शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
3
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
4
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
5
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
6
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
7
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
8
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
9
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
10
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
11
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
12
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
13
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
14
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
15
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
16
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
17
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
18
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
19
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
20
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती

दिल्लीतील पराभवानंतर काँग्रेसमध्ये फेरबदलाचे वारे, २०२९ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 17:18 IST

Congress Party : २०२९ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नवीन टीम बनवण्यासाठी प्रयत्न करत आहे.

गेल्या काही निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाला अपयश मिळाले आहे. त्यामुळे आता काँग्रेसने पक्षाच्या संघटनेत फेरबदल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. २०२९ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नवीन टीम बनवण्यासाठी प्रयत्न करत आहे. या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या बिहार आणि पुढील वर्षात होणाऱ्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीची समीकरणे लक्षात घेता काँग्रेसकडून संघटनेत फेरबदल करण्यात येत आहेत. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाचे संघटन सरचिटणीस केसी वेणुगोपाल हे आपल्या पदावर कायम राहतील. तर बिहार, राजस्थान, पंजाब, हरियाणा, तेलंगणा आणि आसाममध्ये प्रभारी बदलले जाऊ शकतात. याचबरोबर, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, तामिळनाडू, बिहार आणि उत्तराखंड या राज्यांचे प्रदेशाध्यक्षही बदलले जाऊ शकतात. 

दुसरीकडे, पक्षाचे प्रभारी मोहन प्रकाश यांना संघटनेतून बाहेर केले जाऊ शकते. तसेच, गुलाम अहमद मीर हे काश्मीरमधील काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते असल्याने त्यांच्याकडील झारखंडमधील जबाबदारी काढून घेतली जाऊ शकते. याशिवाय, भूपेश बघेल यांना सरचिटणीस बनवून संघटनेत आणले जाऊ शकते. तर मीनाक्षी नटराजन, सचिन राव, अजय कुमार लल्लू,वामशी रेड्डी, कृष्णा अलावुरु यांसारख्या नेत्यांना संघटनेत नवीन जबाबदाऱ्या दिल्या जाऊ शकतात. 

दरम्यान, नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा पराभवाचा सामना करावा लागला. याआधीही हरयाणा, महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा काँग्रेसला अपयश मिळाले. तसेच, यापूर्वी लोकसभा निवडणुकीत सुद्धा काँग्रेसचा पराभव झाला. त्यामुळे आता काँग्रेसने पक्षाच्या संघटनेत फेरबदल करण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे.

टॅग्स :congressकाँग्रेस