शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
2
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
3
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
4
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
5
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
6
Dental Care: टार्टर आणि प्लाक दातांचे मुख्य शत्रू, करू शकतात गंभीर नुकसान; वेळीच घ्या 'ही' काळजी 
7
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
8
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
9
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
10
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
11
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
12
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
13
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
14
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
15
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
16
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
17
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
18
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
19
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
20
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?

"जमिनीला कोणताही धर्म नसतो, हे सर्व सामाजिक...", वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावर शशी थरूरांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2024 15:38 IST

shashi tharoor on wakf act : सामाजिक वातावरण बिघडू नये अशी आमची इच्छा आहे, असे शशी थरूर यांनी म्हटले आहे. 

नवी दिल्ली : वक्फ बोर्ड कायद्यात सुधारणा, लव्ह जिहाद आणि लँड जिहाद यासंबंधीचे विधेयक संसदेत मांडले जाण्याची शक्यता आहे. याबाबत काँग्रेस खासदार शशी थरूर यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. यासंबंधीचे विधेयक अद्याप कार्यसूचीत नाही, मात्र हे विधेयक आणले तर ते घटनात्मक आहे की नाही, हे पाहावे लागेल. तसेच, सामाजिक वातावरण बिघडू नये अशी आमची इच्छा आहे, असे शशी थरूर यांनी म्हटले आहे. 

याचबरोबर, जमिनीला कोणताही धर्म नसतो. सामाजिक वातावरण बिघडवण्यासाठी हे सर्व केले जात आहे, आम्ही हे प्रकरण न्यायालयात नेणार आहोत. हे न्यायालयात टिकणार नाही, असे म्हणत शशी थरूर यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. दरम्यान, मीडिया रिपोर्ट्सनुसार, केंद्र सरकार येत्या काही दिवसांत वक्फ बोर्डाच्या अधिकारात आणि त्याच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी संसदेत विधेयक आणण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मोदी सरकारला वक्फ बोर्डाच्या कोणत्याही मालमत्तेला 'वक्फ मालमत्ता' करण्याचे अधिकार रोखायचे आहेत, असे सूत्रांचे म्हणणे आहे. शुक्रवारी संध्याकाळी मंत्रिमंडळाने वक्फ कायद्यात जवळपास ४० सुधारणांना मंजुरी दिल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, मोदी सरकार वक्फ कायद्यात सुधारणा करणारे विधेयक ५ ऑगस्ट रोजी संसदेत मांडणार असल्याची माहिती समोर आली आहे. हे विधेयक संसदेत मंजूर झाल्यानंतर वक्फ बोर्डाचे अधिकार कमी होतील.

बांगलादेशातील सद्यस्थितीबाबतही शशी थरूर यांनी भाष्य केले. ते म्हणाले, "मला वाटते की परराष्ट्र मंत्रालयाने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले पाहिजे. मी जे काही मीडियातून ऐकत आहे, ते खूप चिंताजनक आहे. तेथील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत काही गंभीर चिंता आहे. ही अंतर्गत बाब असली, तरी आम्ही प्रार्थना करतो की लवकरच तोडगा निघावा आणि शांतता राहावी. बांगलादेश हा आपला शेजारी देश आहे. त्यामुळे भारतातील प्रत्येकाला तिथे लवकरात लवकर शांतता प्रस्थापित झालेली पहायची आहे."

वक्फ बोर्ड कायद्यात सुधारणा विधेयक काय असेल? मोदी सरकारने प्रस्तावित केलेल्या प्रमुख सुधारणांमध्ये वक्फ बोर्डांची पुनर्रचना करणे, बोर्डांची रचना बदलणे आणि बोर्ड घोषित करण्यापूर्वी वक्फ मालमत्तांची पडताळणी सुनिश्चित करणे यांचा समावेश आहे. केंद्रीय वक्फ परिषद आणि राज्य वक्फ बोर्डांच्या संरचनेत बदल करण्यासाठी वक्फ कायद्याच्या कलम ९ आणि कलम १४ मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव विधेयकात असल्याचे सांगण्यात आले आहे. मोदी सरकारच्या विधेयकात राज्य वक्फ बोर्डांनी दावा केलेल्या वादग्रस्त जमिनीची नव्याने पडताळणी करण्याची मागणीही प्रस्तावित आहे. या विधेयकांतर्गत वक्फ बोर्डाने दावा केलेल्या मालमत्तेची सक्तीने पडताळणी केली जाईल.

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूर