शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
3
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
4
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
5
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
6
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
7
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
8
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
9
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
10
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
11
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
12
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
13
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
14
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
15
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
16
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
17
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
18
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
19
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
20
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप

"जमिनीला कोणताही धर्म नसतो, हे सर्व सामाजिक...", वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावर शशी थरूरांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2024 15:38 IST

shashi tharoor on wakf act : सामाजिक वातावरण बिघडू नये अशी आमची इच्छा आहे, असे शशी थरूर यांनी म्हटले आहे. 

नवी दिल्ली : वक्फ बोर्ड कायद्यात सुधारणा, लव्ह जिहाद आणि लँड जिहाद यासंबंधीचे विधेयक संसदेत मांडले जाण्याची शक्यता आहे. याबाबत काँग्रेस खासदार शशी थरूर यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. यासंबंधीचे विधेयक अद्याप कार्यसूचीत नाही, मात्र हे विधेयक आणले तर ते घटनात्मक आहे की नाही, हे पाहावे लागेल. तसेच, सामाजिक वातावरण बिघडू नये अशी आमची इच्छा आहे, असे शशी थरूर यांनी म्हटले आहे. 

याचबरोबर, जमिनीला कोणताही धर्म नसतो. सामाजिक वातावरण बिघडवण्यासाठी हे सर्व केले जात आहे, आम्ही हे प्रकरण न्यायालयात नेणार आहोत. हे न्यायालयात टिकणार नाही, असे म्हणत शशी थरूर यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. दरम्यान, मीडिया रिपोर्ट्सनुसार, केंद्र सरकार येत्या काही दिवसांत वक्फ बोर्डाच्या अधिकारात आणि त्याच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी संसदेत विधेयक आणण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मोदी सरकारला वक्फ बोर्डाच्या कोणत्याही मालमत्तेला 'वक्फ मालमत्ता' करण्याचे अधिकार रोखायचे आहेत, असे सूत्रांचे म्हणणे आहे. शुक्रवारी संध्याकाळी मंत्रिमंडळाने वक्फ कायद्यात जवळपास ४० सुधारणांना मंजुरी दिल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, मोदी सरकार वक्फ कायद्यात सुधारणा करणारे विधेयक ५ ऑगस्ट रोजी संसदेत मांडणार असल्याची माहिती समोर आली आहे. हे विधेयक संसदेत मंजूर झाल्यानंतर वक्फ बोर्डाचे अधिकार कमी होतील.

बांगलादेशातील सद्यस्थितीबाबतही शशी थरूर यांनी भाष्य केले. ते म्हणाले, "मला वाटते की परराष्ट्र मंत्रालयाने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले पाहिजे. मी जे काही मीडियातून ऐकत आहे, ते खूप चिंताजनक आहे. तेथील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत काही गंभीर चिंता आहे. ही अंतर्गत बाब असली, तरी आम्ही प्रार्थना करतो की लवकरच तोडगा निघावा आणि शांतता राहावी. बांगलादेश हा आपला शेजारी देश आहे. त्यामुळे भारतातील प्रत्येकाला तिथे लवकरात लवकर शांतता प्रस्थापित झालेली पहायची आहे."

वक्फ बोर्ड कायद्यात सुधारणा विधेयक काय असेल? मोदी सरकारने प्रस्तावित केलेल्या प्रमुख सुधारणांमध्ये वक्फ बोर्डांची पुनर्रचना करणे, बोर्डांची रचना बदलणे आणि बोर्ड घोषित करण्यापूर्वी वक्फ मालमत्तांची पडताळणी सुनिश्चित करणे यांचा समावेश आहे. केंद्रीय वक्फ परिषद आणि राज्य वक्फ बोर्डांच्या संरचनेत बदल करण्यासाठी वक्फ कायद्याच्या कलम ९ आणि कलम १४ मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव विधेयकात असल्याचे सांगण्यात आले आहे. मोदी सरकारच्या विधेयकात राज्य वक्फ बोर्डांनी दावा केलेल्या वादग्रस्त जमिनीची नव्याने पडताळणी करण्याची मागणीही प्रस्तावित आहे. या विधेयकांतर्गत वक्फ बोर्डाने दावा केलेल्या मालमत्तेची सक्तीने पडताळणी केली जाईल.

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूर