शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

राहुल गांधींचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांना पत्र; हाथरस दुर्घटनेबाबत केली मोठी मागणी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2024 12:32 IST

Hathras Stampede : हाथरस दुर्घटनेबाबत काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहिले आहे. 

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील हाथरस येथे २ जुलै रोजी झालेल्या चेंगराचेंगरीत १२१ जणांचा मृत्यू झाला. याठिकाणी भोले बाबांच्या सत्संगाला अनेक राज्यांतून महिला आणि पुरुषांनी हजेरी लावली होती. यादरम्यान अचानक चेंगराचेंगरी झाली, त्यात लहान मुलांसह १२१ जणांना जीव गमवावा लागला. या दुर्घटनेबाबत काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहिले आहे. 

राहुल गांधी यांनी एका पत्राद्वारे पीडितेच्या कुटुंबीयांच्या समस्या मुख्यमंत्र्यांना सांगितल्या आहेत. याशिवाय, नुकसान भरपाईची रक्कम वाढवून पीडित कुटुंबीयांना लवकरात लवकर मदत करावी, अशी मागणी राहुल गांधी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. राहुल गांधींनी मुख्यमंत्री योगींना पत्र लिहिलं आहे की, या दुःखाच्या वेळी त्यांना आमच्या सामूहिक संवेदना आणि मदतीची गरज आहे. राहुल गांधी यांनी या पत्राची माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) देखील पोस्ट केली आहे.

या दुर्घटनेत जीव गमावलेल्या आणि जखमींना राज्य सरकारकडून मिळणाऱ्या नुकसान भरपाईवरही राहुल गांधींनी प्रश्न उपस्थित केले आहेत. सरकारने जाहीर केलेली भरपाई खूपच कमी असल्याचे राहुल गांधी यांनी पत्राद्नारे सांगितले आहे. तसेच, अशा परिस्थितीत ही नुकसान भरपाई त्वरित वाढवावी. तसेच जखमींवर योग्य उपचार करण्याची व्यवस्था करावी, असे राहुल गांधी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रातून सांगितले आहे.

दोषींना कठोर शिक्षा होणे गरजेचं - राहुल गांधीयाचबरोबर, राहुल गांधी यांनी पत्रात म्हटले आहे की, जेव्हा मी हाथरस आणि अलीगढमध्ये पीडित कुटुंबाला भेटलो, तेव्हा त्यांनी सांगितले की, या घटनेत स्थानिक प्रशासनाचा निष्काळजीपणा आणि असंवेदनशीलता आहे. अशा परिस्थितीत या प्रकरणाची योग्य आणि पारदर्शक चौकशी व्हायला हवी. न्यायाच्या दृष्टिकोनातून दोषींना कठोर शिक्षा होणेही गरजेचे आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीyogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशcongressकाँग्रेस