शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

राहुल गांधींचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांना पत्र; हाथरस दुर्घटनेबाबत केली मोठी मागणी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2024 12:32 IST

Hathras Stampede : हाथरस दुर्घटनेबाबत काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहिले आहे. 

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील हाथरस येथे २ जुलै रोजी झालेल्या चेंगराचेंगरीत १२१ जणांचा मृत्यू झाला. याठिकाणी भोले बाबांच्या सत्संगाला अनेक राज्यांतून महिला आणि पुरुषांनी हजेरी लावली होती. यादरम्यान अचानक चेंगराचेंगरी झाली, त्यात लहान मुलांसह १२१ जणांना जीव गमवावा लागला. या दुर्घटनेबाबत काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहिले आहे. 

राहुल गांधी यांनी एका पत्राद्वारे पीडितेच्या कुटुंबीयांच्या समस्या मुख्यमंत्र्यांना सांगितल्या आहेत. याशिवाय, नुकसान भरपाईची रक्कम वाढवून पीडित कुटुंबीयांना लवकरात लवकर मदत करावी, अशी मागणी राहुल गांधी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. राहुल गांधींनी मुख्यमंत्री योगींना पत्र लिहिलं आहे की, या दुःखाच्या वेळी त्यांना आमच्या सामूहिक संवेदना आणि मदतीची गरज आहे. राहुल गांधी यांनी या पत्राची माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) देखील पोस्ट केली आहे.

या दुर्घटनेत जीव गमावलेल्या आणि जखमींना राज्य सरकारकडून मिळणाऱ्या नुकसान भरपाईवरही राहुल गांधींनी प्रश्न उपस्थित केले आहेत. सरकारने जाहीर केलेली भरपाई खूपच कमी असल्याचे राहुल गांधी यांनी पत्राद्नारे सांगितले आहे. तसेच, अशा परिस्थितीत ही नुकसान भरपाई त्वरित वाढवावी. तसेच जखमींवर योग्य उपचार करण्याची व्यवस्था करावी, असे राहुल गांधी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रातून सांगितले आहे.

दोषींना कठोर शिक्षा होणे गरजेचं - राहुल गांधीयाचबरोबर, राहुल गांधी यांनी पत्रात म्हटले आहे की, जेव्हा मी हाथरस आणि अलीगढमध्ये पीडित कुटुंबाला भेटलो, तेव्हा त्यांनी सांगितले की, या घटनेत स्थानिक प्रशासनाचा निष्काळजीपणा आणि असंवेदनशीलता आहे. अशा परिस्थितीत या प्रकरणाची योग्य आणि पारदर्शक चौकशी व्हायला हवी. न्यायाच्या दृष्टिकोनातून दोषींना कठोर शिक्षा होणेही गरजेचे आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीyogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशcongressकाँग्रेस