शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

‘भारतीय संकल्पने’चीच हत्या झाली; राहुल गांधींचा पुन्हा सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2023 05:20 IST

खासदारकी पुन्हा बहाल झाल्यानंतर राहुल गांधी हे प्रथमच आपल्या वायनाड मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत.

वायनाड (केरळ) : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावरून शनिवारी पुन्हा एकदा हल्लाबोल केला. मणिपूर हिंसाचारावर संसदेत झालेल्या चर्चेत पंतप्रधान २ तासांपेक्षा अधिक वेळ बोलले, पण त्यांनी ईशान्येतील या राज्याच्या समस्येवर कोणताही तोडगा काढला नाही, असे राहुल गांधी यांनी म्हटले. 

खासदारकी पुन्हा बहाल झाल्यानंतर राहुल गांधी हे प्रथमच आपल्या वायनाड मतदारसंघाच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यानिमित्त काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त लोकशाही आघाडीने (यूडीएफ) कलपेट्टा येथे त्यांचे भव्य स्वागत केले. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलत होते.राहुल गांधी यांनी म्हटले की, ‘ते (पंतप्रधान) २ तास १३ मिनिटे बोलले. ते हसले... त्यांनी विनोद केले... मस्करी केली, त्यांच्या मंत्र्यांनीही हास्यविनोद केले. त्यांनी खूप गंमती-जमती केल्या. पंतप्रधान २ तासांच्या भाषणात प्रत्येक विषयावर बोलले... काँग्रेसवर, माझ्यावर, विरोधी पक्षांची आघाडी ‘इंडिया’वर ते  विस्ताराने बोलले; पण मणिपूरवर केवळ २ मिनिटेच बोलले.’

राहुल गांधी यांनी म्हटले की, भाजप आणि त्याच्या नेतृत्वाखालील सरकारने मणिपुरात ‘भारतीय संकल्पने’चीच (आयडिया ऑफ इंडिया) हत्या केली आहे. राहुल गांधी यांनी म्हटले की, ‘भारतमातेच्या हत्येवर बोलताना तुम्ही केवळ २ मिनिटे खर्च केलीत. तुमची हिंमत कशी झाली? तुम्ही ‘भारतीय संकल्पना’ फेटाळूच कशी शकता? (वृत्तसंस्था)

४ महिने तुम्ही काय करत होतात?

राहुल गांधी यांनी म्हटले की, मागील ४ महिने तुम्ही काय करत होतात? तुम्ही तेथे (मणिपुरात) का नाही गेलात? तुम्ही हिंसाचार थांबविण्याचा प्रयत्न का नाही केला? कारण तुम्ही राष्ट्रवादी नाहीच आहात. ‘भारतीय संकल्पने’ची हत्या करणारा राष्ट्रवादी होऊच शकत नाही.

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसwayanad-pcवायनाड