शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

‘भारतीय संकल्पने’चीच हत्या झाली; राहुल गांधींचा पुन्हा सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2023 05:20 IST

खासदारकी पुन्हा बहाल झाल्यानंतर राहुल गांधी हे प्रथमच आपल्या वायनाड मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत.

वायनाड (केरळ) : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावरून शनिवारी पुन्हा एकदा हल्लाबोल केला. मणिपूर हिंसाचारावर संसदेत झालेल्या चर्चेत पंतप्रधान २ तासांपेक्षा अधिक वेळ बोलले, पण त्यांनी ईशान्येतील या राज्याच्या समस्येवर कोणताही तोडगा काढला नाही, असे राहुल गांधी यांनी म्हटले. 

खासदारकी पुन्हा बहाल झाल्यानंतर राहुल गांधी हे प्रथमच आपल्या वायनाड मतदारसंघाच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यानिमित्त काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त लोकशाही आघाडीने (यूडीएफ) कलपेट्टा येथे त्यांचे भव्य स्वागत केले. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलत होते.राहुल गांधी यांनी म्हटले की, ‘ते (पंतप्रधान) २ तास १३ मिनिटे बोलले. ते हसले... त्यांनी विनोद केले... मस्करी केली, त्यांच्या मंत्र्यांनीही हास्यविनोद केले. त्यांनी खूप गंमती-जमती केल्या. पंतप्रधान २ तासांच्या भाषणात प्रत्येक विषयावर बोलले... काँग्रेसवर, माझ्यावर, विरोधी पक्षांची आघाडी ‘इंडिया’वर ते  विस्ताराने बोलले; पण मणिपूरवर केवळ २ मिनिटेच बोलले.’

राहुल गांधी यांनी म्हटले की, भाजप आणि त्याच्या नेतृत्वाखालील सरकारने मणिपुरात ‘भारतीय संकल्पने’चीच (आयडिया ऑफ इंडिया) हत्या केली आहे. राहुल गांधी यांनी म्हटले की, ‘भारतमातेच्या हत्येवर बोलताना तुम्ही केवळ २ मिनिटे खर्च केलीत. तुमची हिंमत कशी झाली? तुम्ही ‘भारतीय संकल्पना’ फेटाळूच कशी शकता? (वृत्तसंस्था)

४ महिने तुम्ही काय करत होतात?

राहुल गांधी यांनी म्हटले की, मागील ४ महिने तुम्ही काय करत होतात? तुम्ही तेथे (मणिपुरात) का नाही गेलात? तुम्ही हिंसाचार थांबविण्याचा प्रयत्न का नाही केला? कारण तुम्ही राष्ट्रवादी नाहीच आहात. ‘भारतीय संकल्पने’ची हत्या करणारा राष्ट्रवादी होऊच शकत नाही.

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसwayanad-pcवायनाड