शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

"PM मोदींचे भाषण गणिताच्या वर्गासारखे, नड्डा हात चोळत होते तर शाहा..."; प्रियांका गांधींचे टीकास्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 11:06 IST

काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान मोदींच्या संसदेतील भाषणावरुन निशाणा साधला.

Priyanka Gandhi on PM Modi Constitution Speech : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी लोकसभेत संविधानावर चर्चा केली. आपल्या भाषणात त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. मात्र लोकसभेत संविधानावरील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कंटाळवाणे भाषण केल्याचा आरोप काँग्रेसने शनिवारी केला. पंतप्रधान मोदींनी मांडलेले ११ ठराव पोकळ असल्याचेही काँग्रेस म्हटले आहे. दुसरीकडे काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनीही पंतप्रधान मोदींच्या भाषणावरुन निशाणा साधला. पंतप्रधान मोदींचे भाषणा गणिताच्या वर्गासारखे वाटत असल्याचे प्रियांका गांधी यांनी म्हटलं.

लोकसभेतील संविधानावरील दोन दिवसीय चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेसने दुरुस्त्या करून संविधानाला वारंवार घायाळ केल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. राज्यघटनेवर हल्ले चढविण्याची एकही संधी नेहरू-गांधी कुटुंबाने सोडलेली नाही, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले. यावरुन काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांनी पंतप्रधानांच्या भाषणाला कंटाळवाणे म्हटलं आहे.

"पंतप्रधान काहीही नवीन किंवा रचनात्मक बोलले नाहीत. त्यांचे भाषण मला कंटाळवाणे वाटले. अनेक दशकांनंतर मला वाटले की मी शाळेत गणिताच्या दुहेरी तासाला बसले होते. नड्डाजी हात चोळत होते, जेव्हा पंतप्रधानांनी त्यांना पाहिले तेव्हा ते ऐकत असल्यासारखे वागू लागले, अमित शाहजी त्यांच्या डोक्याला हात लावत आहेत. मागे बसलेले पियुष गोयल जी झोपणार आहेत असे दिसत होते," असं प्रियांका गांधी म्हणाल्या.

"मला वाटले की पंतप्रधान काहीतरी नवीन बोलतील, पण त्यांनी ११ पोकळ आश्वासने दिली. भ्रष्टाचाराबाबत झीरो टॉलरन्स असेल, तर त्यांनी किमान अदानींवर चर्चा करावी," असंही प्रियांका गांधी म्हणाल्या.

दरम्यान, संविधानाच्या ७५ वर्षांच्या गौरवशाली प्रवासावर सभागृहात झालेल्या चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान मोदींनी नेहरू-गांधी कुटुंबावरही निशाणा साधला आणि या कुटुंबाने प्रत्येक स्तरावर राज्यघटनेला आव्हान दिल्याचा आरोप केला. "देशात नेहरू- गांधी कुटुंबाने ५५ वर्षे राज्य केले. नेहरू-गांधी कुटुंबाच्या आताच्या वंशजांनीही राज्यघटनेशी खेळ चालविला आहे.  काँग्रेस सरकारने देशाचे कारागृहात रूपांतर केले होते, तर न्यायायंत्रणेचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला. राजीव गांधी यांनीही राज्यघटनेमध्ये दुरुस्त्या केल्या. काँग्रेसवर लागलेला कलंक कधीही पुसला जाणार नाही," अशी टीका पंतप्रधान मोदींनी केला. 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीParliamentसंसद