शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

"PM मोदींचे भाषण गणिताच्या वर्गासारखे, नड्डा हात चोळत होते तर शाहा..."; प्रियांका गांधींचे टीकास्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 11:06 IST

काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान मोदींच्या संसदेतील भाषणावरुन निशाणा साधला.

Priyanka Gandhi on PM Modi Constitution Speech : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी लोकसभेत संविधानावर चर्चा केली. आपल्या भाषणात त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. मात्र लोकसभेत संविधानावरील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कंटाळवाणे भाषण केल्याचा आरोप काँग्रेसने शनिवारी केला. पंतप्रधान मोदींनी मांडलेले ११ ठराव पोकळ असल्याचेही काँग्रेस म्हटले आहे. दुसरीकडे काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनीही पंतप्रधान मोदींच्या भाषणावरुन निशाणा साधला. पंतप्रधान मोदींचे भाषणा गणिताच्या वर्गासारखे वाटत असल्याचे प्रियांका गांधी यांनी म्हटलं.

लोकसभेतील संविधानावरील दोन दिवसीय चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेसने दुरुस्त्या करून संविधानाला वारंवार घायाळ केल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. राज्यघटनेवर हल्ले चढविण्याची एकही संधी नेहरू-गांधी कुटुंबाने सोडलेली नाही, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले. यावरुन काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांनी पंतप्रधानांच्या भाषणाला कंटाळवाणे म्हटलं आहे.

"पंतप्रधान काहीही नवीन किंवा रचनात्मक बोलले नाहीत. त्यांचे भाषण मला कंटाळवाणे वाटले. अनेक दशकांनंतर मला वाटले की मी शाळेत गणिताच्या दुहेरी तासाला बसले होते. नड्डाजी हात चोळत होते, जेव्हा पंतप्रधानांनी त्यांना पाहिले तेव्हा ते ऐकत असल्यासारखे वागू लागले, अमित शाहजी त्यांच्या डोक्याला हात लावत आहेत. मागे बसलेले पियुष गोयल जी झोपणार आहेत असे दिसत होते," असं प्रियांका गांधी म्हणाल्या.

"मला वाटले की पंतप्रधान काहीतरी नवीन बोलतील, पण त्यांनी ११ पोकळ आश्वासने दिली. भ्रष्टाचाराबाबत झीरो टॉलरन्स असेल, तर त्यांनी किमान अदानींवर चर्चा करावी," असंही प्रियांका गांधी म्हणाल्या.

दरम्यान, संविधानाच्या ७५ वर्षांच्या गौरवशाली प्रवासावर सभागृहात झालेल्या चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान मोदींनी नेहरू-गांधी कुटुंबावरही निशाणा साधला आणि या कुटुंबाने प्रत्येक स्तरावर राज्यघटनेला आव्हान दिल्याचा आरोप केला. "देशात नेहरू- गांधी कुटुंबाने ५५ वर्षे राज्य केले. नेहरू-गांधी कुटुंबाच्या आताच्या वंशजांनीही राज्यघटनेशी खेळ चालविला आहे.  काँग्रेस सरकारने देशाचे कारागृहात रूपांतर केले होते, तर न्यायायंत्रणेचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला. राजीव गांधी यांनीही राज्यघटनेमध्ये दुरुस्त्या केल्या. काँग्रेसवर लागलेला कलंक कधीही पुसला जाणार नाही," अशी टीका पंतप्रधान मोदींनी केला. 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीParliamentसंसद