शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

"PM मोदींचे भाषण गणिताच्या वर्गासारखे, नड्डा हात चोळत होते तर शाहा..."; प्रियांका गांधींचे टीकास्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 11:06 IST

काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान मोदींच्या संसदेतील भाषणावरुन निशाणा साधला.

Priyanka Gandhi on PM Modi Constitution Speech : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी लोकसभेत संविधानावर चर्चा केली. आपल्या भाषणात त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. मात्र लोकसभेत संविधानावरील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कंटाळवाणे भाषण केल्याचा आरोप काँग्रेसने शनिवारी केला. पंतप्रधान मोदींनी मांडलेले ११ ठराव पोकळ असल्याचेही काँग्रेस म्हटले आहे. दुसरीकडे काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनीही पंतप्रधान मोदींच्या भाषणावरुन निशाणा साधला. पंतप्रधान मोदींचे भाषणा गणिताच्या वर्गासारखे वाटत असल्याचे प्रियांका गांधी यांनी म्हटलं.

लोकसभेतील संविधानावरील दोन दिवसीय चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेसने दुरुस्त्या करून संविधानाला वारंवार घायाळ केल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. राज्यघटनेवर हल्ले चढविण्याची एकही संधी नेहरू-गांधी कुटुंबाने सोडलेली नाही, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले. यावरुन काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांनी पंतप्रधानांच्या भाषणाला कंटाळवाणे म्हटलं आहे.

"पंतप्रधान काहीही नवीन किंवा रचनात्मक बोलले नाहीत. त्यांचे भाषण मला कंटाळवाणे वाटले. अनेक दशकांनंतर मला वाटले की मी शाळेत गणिताच्या दुहेरी तासाला बसले होते. नड्डाजी हात चोळत होते, जेव्हा पंतप्रधानांनी त्यांना पाहिले तेव्हा ते ऐकत असल्यासारखे वागू लागले, अमित शाहजी त्यांच्या डोक्याला हात लावत आहेत. मागे बसलेले पियुष गोयल जी झोपणार आहेत असे दिसत होते," असं प्रियांका गांधी म्हणाल्या.

"मला वाटले की पंतप्रधान काहीतरी नवीन बोलतील, पण त्यांनी ११ पोकळ आश्वासने दिली. भ्रष्टाचाराबाबत झीरो टॉलरन्स असेल, तर त्यांनी किमान अदानींवर चर्चा करावी," असंही प्रियांका गांधी म्हणाल्या.

दरम्यान, संविधानाच्या ७५ वर्षांच्या गौरवशाली प्रवासावर सभागृहात झालेल्या चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान मोदींनी नेहरू-गांधी कुटुंबावरही निशाणा साधला आणि या कुटुंबाने प्रत्येक स्तरावर राज्यघटनेला आव्हान दिल्याचा आरोप केला. "देशात नेहरू- गांधी कुटुंबाने ५५ वर्षे राज्य केले. नेहरू-गांधी कुटुंबाच्या आताच्या वंशजांनीही राज्यघटनेशी खेळ चालविला आहे.  काँग्रेस सरकारने देशाचे कारागृहात रूपांतर केले होते, तर न्यायायंत्रणेचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला. राजीव गांधी यांनीही राज्यघटनेमध्ये दुरुस्त्या केल्या. काँग्रेसवर लागलेला कलंक कधीही पुसला जाणार नाही," अशी टीका पंतप्रधान मोदींनी केला. 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीParliamentसंसद