शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
2
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
3
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
5
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
6
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
7
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
8
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
9
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
10
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
11
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
12
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
13
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
14
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
15
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
16
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
17
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
18
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
19
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
20
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी

"PM मोदींचे भाषण गणिताच्या वर्गासारखे, नड्डा हात चोळत होते तर शाहा..."; प्रियांका गांधींचे टीकास्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 11:06 IST

काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान मोदींच्या संसदेतील भाषणावरुन निशाणा साधला.

Priyanka Gandhi on PM Modi Constitution Speech : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी लोकसभेत संविधानावर चर्चा केली. आपल्या भाषणात त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. मात्र लोकसभेत संविधानावरील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कंटाळवाणे भाषण केल्याचा आरोप काँग्रेसने शनिवारी केला. पंतप्रधान मोदींनी मांडलेले ११ ठराव पोकळ असल्याचेही काँग्रेस म्हटले आहे. दुसरीकडे काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनीही पंतप्रधान मोदींच्या भाषणावरुन निशाणा साधला. पंतप्रधान मोदींचे भाषणा गणिताच्या वर्गासारखे वाटत असल्याचे प्रियांका गांधी यांनी म्हटलं.

लोकसभेतील संविधानावरील दोन दिवसीय चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेसने दुरुस्त्या करून संविधानाला वारंवार घायाळ केल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. राज्यघटनेवर हल्ले चढविण्याची एकही संधी नेहरू-गांधी कुटुंबाने सोडलेली नाही, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले. यावरुन काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांनी पंतप्रधानांच्या भाषणाला कंटाळवाणे म्हटलं आहे.

"पंतप्रधान काहीही नवीन किंवा रचनात्मक बोलले नाहीत. त्यांचे भाषण मला कंटाळवाणे वाटले. अनेक दशकांनंतर मला वाटले की मी शाळेत गणिताच्या दुहेरी तासाला बसले होते. नड्डाजी हात चोळत होते, जेव्हा पंतप्रधानांनी त्यांना पाहिले तेव्हा ते ऐकत असल्यासारखे वागू लागले, अमित शाहजी त्यांच्या डोक्याला हात लावत आहेत. मागे बसलेले पियुष गोयल जी झोपणार आहेत असे दिसत होते," असं प्रियांका गांधी म्हणाल्या.

"मला वाटले की पंतप्रधान काहीतरी नवीन बोलतील, पण त्यांनी ११ पोकळ आश्वासने दिली. भ्रष्टाचाराबाबत झीरो टॉलरन्स असेल, तर त्यांनी किमान अदानींवर चर्चा करावी," असंही प्रियांका गांधी म्हणाल्या.

दरम्यान, संविधानाच्या ७५ वर्षांच्या गौरवशाली प्रवासावर सभागृहात झालेल्या चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान मोदींनी नेहरू-गांधी कुटुंबावरही निशाणा साधला आणि या कुटुंबाने प्रत्येक स्तरावर राज्यघटनेला आव्हान दिल्याचा आरोप केला. "देशात नेहरू- गांधी कुटुंबाने ५५ वर्षे राज्य केले. नेहरू-गांधी कुटुंबाच्या आताच्या वंशजांनीही राज्यघटनेशी खेळ चालविला आहे.  काँग्रेस सरकारने देशाचे कारागृहात रूपांतर केले होते, तर न्यायायंत्रणेचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला. राजीव गांधी यांनीही राज्यघटनेमध्ये दुरुस्त्या केल्या. काँग्रेसवर लागलेला कलंक कधीही पुसला जाणार नाही," अशी टीका पंतप्रधान मोदींनी केला. 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीParliamentसंसद