शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंच्या भेटीबाबत अनिल परबांनी सगळे सांगितले; म्हणाले, “युती, जागावाटप अन्...”
2
"एक मुस्लीम महिला म्हणून…!"; हिजाब ओढल्यावरून 'दंगल गर्ल' जायरा नीतीश कुमारांवर भडकली!
3
पश्चिम बंगालमध्ये ५८ लाख मतदारांची नावे वगळली, निवडणूक आयोगाने नवी यादी केली प्रसिद्ध
4
IPL 2026 Auction: अखेरच्या क्षणी BCCI कडून यादीत बदल! टीम इंडियातून डावललेला खेळाडूही लिलावात दिसणार
5
धक्कादायक...! हल्लेखोर पिता-पूत्र भारताच्या पासपोर्टवर मनिलाला आलेले; फिलिपिन्सच्या दाव्याने खळबळ 
6
‘मनरेगा’चं नाव बदलण्याविरोधात प्रियंका गांधी आक्रमक, लोकसभेत सरकारला सुनावले खडेबोल
7
PAN-Aadhaar लिंक करण्याची अखेरची तारीख जवळ; विसरलात तर लागेल इतका दंड, पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसिजर
8
ज्या ठिकाणी गायब होतात विमाने अन् जहाज...'त्या' बर्म्युडा ट्रॅंगलवर वैज्ञानिकांचा नवा खुलासा
9
जनरल याह्या खान, नियाझी 'मदिरा, महिलां'त अडकलेले...; बांगलादेश मुक्तीसंग्रामाचा रिपोर्ट पाकिस्तानने दडपलेला...
10
संजय राऊतांनी घेतली राज ठाकरेंची भेट; म्हणाले, “काँग्रेस आमच्यासोबत नाही, भाजपाला मदत...”
11
Video - मनालीला गेलेल्या पर्यटकासोबत 'स्नो स्कॅम'; युजर म्हणतात, "यापेक्षा जास्त बर्फ फ्रीजमध्ये"
12
फोल्डेबल आयफोनमध्ये काय काय मिळणार? अ‍ॅप्पलनं निश्चित केले फीचर्स, किंमत जाणून थक्क व्हाल!
13
Video - "मी GPS लावला होता..."; हॉटेलमध्ये बायकोला रंगेहाथ पकडल्यावर ढसाढसा रडला नवरा
14
जागावाटपावरून महायुतीत तणाव! मुंबईत शिंदेसेनेला हव्यात १०० हून अधिक जागा, भाजपाचा प्लॅन बी तयार
15
वसंत मोरे मनसे कार्यालयात जाणार; ठाकरे बंधू युतीमुळे पुण्यात पदाधिकाऱ्यांमधील रुसवे फुगवे दूर
16
IPL ऑक्शनच्या दिवशीच परफेक्ट ऑडिशन! व्यंकटेश अय्यरचा SMAT स्पर्धेतील टी-२० सामन्यात मोठा धमाका
17
पश्चिम बंगालमध्ये लाखो मतदारांची नावं वगळली, SIRच्या मसुदा यादीतून धक्कादायक आकडेवारी समोर 
18
National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना मोठा दिलासा
19
ICICI Prudential IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आज अखेरची संधी; GMP ₹३०० च्या पार, धमाकेदार लिस्टिंगचे संकेत
20
पीएम नरेंद्र मोदी जॉर्डनच्या दौऱ्यावर; भारतासाठी का महत्वाचा आहे हा देश? जाणून घ्या...
Daily Top 2Weekly Top 5

"बांगलादेशातील हिंदूंना वाचवा..."; आजीचा दाखला देत प्रियांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 16:48 IST

प्रियांका गांधी यांनी इंदिरा गांधींच्या इच्छाशक्तीचा उल्लेख करत, आपणही बांगलादेशातील अल्पसंख्याकांचे त्याच पद्दतीन संरक्षण करावे, असे आवाहन मोदी सरकारला केले आहे.

काँग्रेस खासदार प्रियांका गांधी वाड्रा यांनी संसदेत मोदी सरकारला बांगलादेशातील हिंदू, ख्रिश्चन आणि इतर अल्पसंख्याकांना वाचवण्याचे आवाहन केले आहे. त्या म्हणाल्या, आज विजय दिवस आहे. या दिवशी आपण पाकिस्तानला धडा शिकवला आणि बांगलादेशची निर्मिती झाली. इंदिरा गांधींचे निर्णयक्षम सरकार आणि शूर सैनिकांनी हा पराक्रम केला होता. त्यांनी इंदिरा गांधींच्या इच्छाशक्तीचा उल्लेख करत, आपणही बांगलादेशातील अल्पसंख्याकांचे त्याच पद्दतीने संरक्षण करावे, असे आवाहन मोदी सरकारला केले आहे.

प्रियांका गांधी सोमवारी लोकसभेतील आपल्या दुसऱ्या भाषणात म्हणाल्या, "मला पहिला मुद्दा मांडायचा आहे की, या सरकारने बांगलादेशातील हिंदू आणि ख्रिश्चनांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आवाज उठवला हवा. याच वेळी मला 1971 च्या युद्धात हौतात्म्य आलेल्या शूरवीरांनाही अभिवादन करायचे आहे. आज मी देशातील जनतेलाही अभिवादन करू इच्छिते. कारण भारताने मिळवलेला विजय त्यांच्याशिवाय अशक्य होता. त्यावेळी आम्ही एकटेच होतो आणि आमच्या बंगाली बांधवांचा आवाज कोणीही ऐकत नव्हते. त्या काळात भारतातील जनता एकत्र आली आणि नेतृत्वाच्या पाठीशी उभी राहिली.

खासदार प्रियांका पुढे म्हणाल्या, मला इंदिरा गांधींना अभिवादन करायचे आहे. त्या या देशाची महान शहीद आहेत. कठीण परिस्थितीतही त्यांनी असे नेतृत्व केले, ज्याने या देशाला विजय मिळवून दिला. ती लढाई तत्त्वांची होती. पहिला मुद्दा म्हणजे बांगलादेशात अल्पसंख्याकांवर होत असलेल्या अत्याचारांवर सरकारने आवाज उठवायला हवा.

आज तो फटोही काढण्यात आला - प्रियांका पुढे म्हणाल्या, आज सैन्य मुख्यालयातून पाकिस्तानी सैन्याचे सरेंडर दाखवण्यात आलेला फोटोही काढण्यात आला आहे. पाकिस्तानच्या 93 हजार सैनिकांनी भारतीय सैन्य शक्तीपुढे शस्त्रास्त्रे टाकली होती. त्या आत्मसमर्पणाच्या फटोच्या उल्लेखाने आजही पाकिस्तानचा तिळपापड उडतो. 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीBangladeshबांगलादेश