शहरं
Join us  
Trending Stories
1
महागठबंधन नव्हे महालठबंधन, NDA मोडणार सर्व विक्रम; PM मोदींनी फुंकले प्रचाराचे रणशिंग
2
आजचे राशीभविष्य २५ ऑक्टोबर २०२५ : आठ राशींसाठी आजचा दिवस चांगला, इतर...
3
“...आता राज्यात ‘नैसर्गिक शेती मिशन’ राबविणार”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
4
देवाकडून मार्गदर्शन मागणे म्हणजे फसवणूक नाही; राम मंदिरचा निर्णय अवैध ठरवायची याचिका फेटाळली
5
भारत व्यापार करार दबावाखाली करत नाही; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी अमेरिकेला ठणकावले
6
लोकपाल सदस्यांना बीएमडब्ल्यू देण्यावरून राजकारण तापले; आता स्वदेशी चळवळीचे काय झाले?
7
कोणत्याही शत्रूला कमी न लेखता लष्करी जवानांनी सदैव सतर्क राहावे: संरक्षण मंत्री राजनाथसिंह
8
“तेजस्वी मुख्यमंत्री म्हणजे बिहारचे लोक मुख्यमंत्री”; पहिल्या दिवसापासूनच प्रचार धडाका
9
“राजदचा लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर बिहारमध्ये खऱ्या अर्थाने दिवाळी”: अमित शाह
10
बिहार निवडणूक २०२५: दुसऱ्या टप्प्यात १२२ जागा, १३०२ जण रिंगणात; १३७२ उमेदवारांचे अर्ज वैध
11
भारतीय कंपन्या रशियन तेलाची खरेदी घटवणार; अमेरिकेकडून वाढवणार, तज्ज्ञांची माहिती
12
भारतातून ३०० कोटींच्या शेणाची निर्यात; आंतरराष्ट्रीय बाजारात गायीच्या शेणाला मागणी
13
अमेरिकन कामगारांवर अन्याय, एच-१बी व्हिसा शुल्क विरुद्धचे खटले लढू; ट्रम्प प्रशासनाचा निर्धार
14
२५० कोटी व्याजासह जमा करा तरच म्हणणे ऐकू! मुंबई मेट्रोची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
15
झुबीनचा मृत्यू कशामुळे? सिंगापूर पोलिस देणार पुरावे, CCTV फुटेज अन् जबाब दहा दिवसांत मिळणार
16
वायुप्रदूषणामुळे भारतात २०२३ मध्ये झाले २० लाख मृत्यू, संशोधन अहवालातील माहिती
17
५ दिवस पुन्हा अवकाळी; उत्तर विदर्भ वगळता राज्यभर बरसणार पावसाच्या सरी, ‘या’ ठिकाणी यलो अलर्ट
18
इस्लामाबाद पोलीस एसपी होते भारताचे गुप्तहेर?; रहस्यमय मृत्यूनंतर सोशल मीडियात चर्चेला उधाण
19
२००२ मध्ये भारत-पाक युद्ध होणार होते?; माजी CIA एजेंटचा मुशर्रफ यांच्याबद्दल धक्कादायक खुलासा
20
राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंगनं बाजी पलटली; २८ आमदार असताना भाजपानं ३२ मते कशी मिळवली?

"बांगलादेशातील हिंदूंना वाचवा..."; आजीचा दाखला देत प्रियांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 16:48 IST

प्रियांका गांधी यांनी इंदिरा गांधींच्या इच्छाशक्तीचा उल्लेख करत, आपणही बांगलादेशातील अल्पसंख्याकांचे त्याच पद्दतीन संरक्षण करावे, असे आवाहन मोदी सरकारला केले आहे.

काँग्रेस खासदार प्रियांका गांधी वाड्रा यांनी संसदेत मोदी सरकारला बांगलादेशातील हिंदू, ख्रिश्चन आणि इतर अल्पसंख्याकांना वाचवण्याचे आवाहन केले आहे. त्या म्हणाल्या, आज विजय दिवस आहे. या दिवशी आपण पाकिस्तानला धडा शिकवला आणि बांगलादेशची निर्मिती झाली. इंदिरा गांधींचे निर्णयक्षम सरकार आणि शूर सैनिकांनी हा पराक्रम केला होता. त्यांनी इंदिरा गांधींच्या इच्छाशक्तीचा उल्लेख करत, आपणही बांगलादेशातील अल्पसंख्याकांचे त्याच पद्दतीने संरक्षण करावे, असे आवाहन मोदी सरकारला केले आहे.

प्रियांका गांधी सोमवारी लोकसभेतील आपल्या दुसऱ्या भाषणात म्हणाल्या, "मला पहिला मुद्दा मांडायचा आहे की, या सरकारने बांगलादेशातील हिंदू आणि ख्रिश्चनांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आवाज उठवला हवा. याच वेळी मला 1971 च्या युद्धात हौतात्म्य आलेल्या शूरवीरांनाही अभिवादन करायचे आहे. आज मी देशातील जनतेलाही अभिवादन करू इच्छिते. कारण भारताने मिळवलेला विजय त्यांच्याशिवाय अशक्य होता. त्यावेळी आम्ही एकटेच होतो आणि आमच्या बंगाली बांधवांचा आवाज कोणीही ऐकत नव्हते. त्या काळात भारतातील जनता एकत्र आली आणि नेतृत्वाच्या पाठीशी उभी राहिली.

खासदार प्रियांका पुढे म्हणाल्या, मला इंदिरा गांधींना अभिवादन करायचे आहे. त्या या देशाची महान शहीद आहेत. कठीण परिस्थितीतही त्यांनी असे नेतृत्व केले, ज्याने या देशाला विजय मिळवून दिला. ती लढाई तत्त्वांची होती. पहिला मुद्दा म्हणजे बांगलादेशात अल्पसंख्याकांवर होत असलेल्या अत्याचारांवर सरकारने आवाज उठवायला हवा.

आज तो फटोही काढण्यात आला - प्रियांका पुढे म्हणाल्या, आज सैन्य मुख्यालयातून पाकिस्तानी सैन्याचे सरेंडर दाखवण्यात आलेला फोटोही काढण्यात आला आहे. पाकिस्तानच्या 93 हजार सैनिकांनी भारतीय सैन्य शक्तीपुढे शस्त्रास्त्रे टाकली होती. त्या आत्मसमर्पणाच्या फटोच्या उल्लेखाने आजही पाकिस्तानचा तिळपापड उडतो. 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीBangladeshबांगलादेश