शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

"बांगलादेशातील हिंदूंना वाचवा..."; आजीचा दाखला देत प्रियांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 16:48 IST

प्रियांका गांधी यांनी इंदिरा गांधींच्या इच्छाशक्तीचा उल्लेख करत, आपणही बांगलादेशातील अल्पसंख्याकांचे त्याच पद्दतीन संरक्षण करावे, असे आवाहन मोदी सरकारला केले आहे.

काँग्रेस खासदार प्रियांका गांधी वाड्रा यांनी संसदेत मोदी सरकारला बांगलादेशातील हिंदू, ख्रिश्चन आणि इतर अल्पसंख्याकांना वाचवण्याचे आवाहन केले आहे. त्या म्हणाल्या, आज विजय दिवस आहे. या दिवशी आपण पाकिस्तानला धडा शिकवला आणि बांगलादेशची निर्मिती झाली. इंदिरा गांधींचे निर्णयक्षम सरकार आणि शूर सैनिकांनी हा पराक्रम केला होता. त्यांनी इंदिरा गांधींच्या इच्छाशक्तीचा उल्लेख करत, आपणही बांगलादेशातील अल्पसंख्याकांचे त्याच पद्दतीने संरक्षण करावे, असे आवाहन मोदी सरकारला केले आहे.

प्रियांका गांधी सोमवारी लोकसभेतील आपल्या दुसऱ्या भाषणात म्हणाल्या, "मला पहिला मुद्दा मांडायचा आहे की, या सरकारने बांगलादेशातील हिंदू आणि ख्रिश्चनांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आवाज उठवला हवा. याच वेळी मला 1971 च्या युद्धात हौतात्म्य आलेल्या शूरवीरांनाही अभिवादन करायचे आहे. आज मी देशातील जनतेलाही अभिवादन करू इच्छिते. कारण भारताने मिळवलेला विजय त्यांच्याशिवाय अशक्य होता. त्यावेळी आम्ही एकटेच होतो आणि आमच्या बंगाली बांधवांचा आवाज कोणीही ऐकत नव्हते. त्या काळात भारतातील जनता एकत्र आली आणि नेतृत्वाच्या पाठीशी उभी राहिली.

खासदार प्रियांका पुढे म्हणाल्या, मला इंदिरा गांधींना अभिवादन करायचे आहे. त्या या देशाची महान शहीद आहेत. कठीण परिस्थितीतही त्यांनी असे नेतृत्व केले, ज्याने या देशाला विजय मिळवून दिला. ती लढाई तत्त्वांची होती. पहिला मुद्दा म्हणजे बांगलादेशात अल्पसंख्याकांवर होत असलेल्या अत्याचारांवर सरकारने आवाज उठवायला हवा.

आज तो फटोही काढण्यात आला - प्रियांका पुढे म्हणाल्या, आज सैन्य मुख्यालयातून पाकिस्तानी सैन्याचे सरेंडर दाखवण्यात आलेला फोटोही काढण्यात आला आहे. पाकिस्तानच्या 93 हजार सैनिकांनी भारतीय सैन्य शक्तीपुढे शस्त्रास्त्रे टाकली होती. त्या आत्मसमर्पणाच्या फटोच्या उल्लेखाने आजही पाकिस्तानचा तिळपापड उडतो. 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीBangladeshबांगलादेश