शहरं
Join us  
Trending Stories
1
Viral Video: प्लॅटफॉर्मवर एकाच वेळी ३ ट्रेन आल्या अन्...; बर्दवान स्थानकावर चेंगराचेंगरीसदृश स्थिती, ७ जण जखमी
2
भारतीय संघासमोर ऑस्ट्रेलियाचा ऐतिहासिक विजय! हीलीच्या सेंच्युरीनंतर पेरीनं सिक्सर मारत संपवली मॅच
3
'अश्लील फोटो, मेसेज अन्...', भाजप आमदार शिवाजी पाटलांना 'हनी ट्रॅप'मध्ये अडकवण्याचा प्रयत्न; सख्ख्या बहीण-भावाला अटक
4
Bihar Election 2025: एनडीएचं जागावाटप झालं, पण कोणाला करावी लागली तडजोड? २०२० मध्ये कोणी किती जागा लढवल्या होत्या?
5
नागपूर पोलीस ॲक्शन मोडवर! घरफोडीच्या गुन्ह्यांत तब्बल ५७ टक्के घट, २१७ ढाबे-हॉटेलवर कारवाई
6
"जे हुंडा घेतील ते नामर्द, बायको लक्ष्मी म्हणून घरात आणायची आणि..."; मकरंद अनासपुरेंचे परखड भाष्य
7
Thane: सराईत सोनसाखळी चोरट्यास ठाण्यात अटक; अडीच लाखांचे दागिने हस्तगत!
8
बदली रद्द करण्यासाठी पोलिसाचा 'जुगाड'; बनावट कागदपत्रे जोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल
9
Jemimah Rodrigues Flying Catch : जबरदस्त! जेमीनं हवेत झेपावत टिपला वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम झेल
10
"माझ्या आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातही..." ठाकरे बंधूंच्या भेटीवर रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य
11
ऐतिहासिक भागीदारी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्मृती मानधना- प्रतीका रावल यांनी रचला विक्रम
12
NDA चे जागावाटप ठरले! BJP-JDU प्रत्येकी 101 जागांवर लढणार; चिराग अन् माझींंच्या पक्षाला किती जागा?
13
बाबासाहेबांचे आर्थिक, सामाजिक समानतेचे स्वप्न पूर्ण होईल: सरन्यायाधीश भूषण गवई
14
सांगलीकर स्मृतीची बॅट चांगलीच तळपली; एक्स्प्रेस वेगानं ५००० धावा करत 'चारचौघीं'वर पडली भारी!
15
Nagpur: दिवाळीच्या गर्दीत नागपूर रेल्वेस्थानक हाउसफुल, आरपीएफ- जीआरपीची गस्त वाढली, गुन्हेगारांवर नजर!
16
"अमेरिकेची भूमिका दुटप्पी, आम्हीही..."; ट्रम्प यांच्या १०० टक्के टॅरिफच्या धमकीला चीनचे उत्तर
17
IND vs AUS : स्मृती-प्रतीकाची तुफान फटकेबाजी; टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासमोर उभारली विक्रमी धावसंख्या
18
संतापजनक! प्रेमानंद महाराजांची भेट करुन देण्याच्या बहाण्याने हॉटेलमध्ये महिलेवर अत्याचार, मथुरा येथे आरोपीला अटक
19
Viral Video: तिकीट न काढता मेट्रोतून प्रवास करण्याचा जुगाड, व्हिडीओ पाहून डोक्याला माराल हात!
20
Thane Video: पतीला मारहाण करत शिवीगाळ, मनसे पदाधिकारी असलेल्या पत्नीने परप्रांतीय महिलेच्या लगावली कानशिलात; ठाण्यातील घटना

"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2024 22:12 IST

Lok Sabha Election 2024: भाजपा उद्योगपतींना प्रोत्साहन देत असल्याचा आरोप करत महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून देशातील महिलांना करोडपती बनवू, असे आश्वासन राहुल गांधी यांनी उपस्थित जनतेला दिले. 

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधींच्या उपस्थितीत इंडिया आघाडीची आज दिल्लीत सभा झाली. यावेळी राहुल गांधी यांनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. तसेच, संविधानाचे रक्षण करणे हे काँग्रेस पक्षाचे ध्येय आहे. कारण हेच देशातील जनतेचे भविष्य, त्यांचे स्वप्न आणि त्यांच्या हृदयाचा आवाज आहे, असे राहुल गांधी म्हणाले. 

या संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय आहे. भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना हे संविधान नको आहे. त्यामुळे पहिले काम या संविधानाचे रक्षण करणे आहे, कारण हे तुमचे भविष्य आहे. तुझे स्वप्न आणि तुझ्या हृदयाचा आवाज आहे, असे राहुल गांधी यांनी भाजपावर निशाणा साधला. तसेच, भाजपा उद्योगपतींना प्रोत्साहन देत असल्याचा आरोप करत महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून देशातील महिलांना करोडपती बनवू, असे आश्वासन राहुल गांधी यांनी उपस्थित जनतेला दिले. 

राहुल गांधी म्हणाले, "मीडियाच्या मित्रांनो, तुम्ही शेतकरी, छोटे व्यापारी, तरुण, मजुरांचे मित्र नाही. तुम्ही फक्त अदानी-अंबानींसारख्या 2-3 अब्जाधीशांचे मित्र आहात. पण मला खात्री आहे, तुम्ही भारत आघाडीलाच मतदान कराल." तसेच, भाजपा सरकारने कामगारांचे एक रुपयाही कर्ज माफ केले नाही. त्यांनी शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले नाही तर आपल्या उद्योगपती मित्रांचे १६ लाख कोटी रुपये माफ केले, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. 

पुढे राहुल गांधी म्हणाले, "मोदीजींनी काही उद्योगपती बनवले, पण आम्ही महालक्ष्मी योजनेत लोकांना करोडपती बनवू. काही पत्रकारांनी मला आणि नरेंद्र मोदीजींना पत्रे लिहून लोकशाहीत वाद व्हायला हवा, असे सांगितले. त्यांनी नरेंद्र मोदींना सांगितले की, तुम्ही राहुल गांधींसोबत चर्चेत सहभागी व्हायला हवे. मी नरेंद्र मोदींसोबत कधीही चर्चा करायला तयार आहे, पण नरेंद्र मोदी माझ्याशी चर्चा करणार नाहीत."

दरम्यान, तुमचा अदानीशी काय संबंध आहे? तुम्ही इलेक्टोरल बाँड्सच्या नावावर 'डोनेशन बिझनेस' का चालवत आहात? शेतकऱ्यांवर काळे कायदे का आणले? कोरोनाने लोक मरत असताना थाळी वाजवायला का सांगितले? तुम्ही शी जिनपिंगला झुलवले, मग त्यांच्या सैन्याने भारताची भूमी कशी काबीज केली? तुम्ही अग्निवीर योजना का आणली? असे प्रश्न नरेंद्र मोदी चर्चेसाठी आले तर विचारेन असे राहुल गांधी यांनी सांगितले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीdelhi lok sabha election 2024दिल्ली लोकसभा निवडणूक निकाल २०२४INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीcongressकाँग्रेस