शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2024 22:12 IST

Lok Sabha Election 2024: भाजपा उद्योगपतींना प्रोत्साहन देत असल्याचा आरोप करत महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून देशातील महिलांना करोडपती बनवू, असे आश्वासन राहुल गांधी यांनी उपस्थित जनतेला दिले. 

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधींच्या उपस्थितीत इंडिया आघाडीची आज दिल्लीत सभा झाली. यावेळी राहुल गांधी यांनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. तसेच, संविधानाचे रक्षण करणे हे काँग्रेस पक्षाचे ध्येय आहे. कारण हेच देशातील जनतेचे भविष्य, त्यांचे स्वप्न आणि त्यांच्या हृदयाचा आवाज आहे, असे राहुल गांधी म्हणाले. 

या संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय आहे. भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना हे संविधान नको आहे. त्यामुळे पहिले काम या संविधानाचे रक्षण करणे आहे, कारण हे तुमचे भविष्य आहे. तुझे स्वप्न आणि तुझ्या हृदयाचा आवाज आहे, असे राहुल गांधी यांनी भाजपावर निशाणा साधला. तसेच, भाजपा उद्योगपतींना प्रोत्साहन देत असल्याचा आरोप करत महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून देशातील महिलांना करोडपती बनवू, असे आश्वासन राहुल गांधी यांनी उपस्थित जनतेला दिले. 

राहुल गांधी म्हणाले, "मीडियाच्या मित्रांनो, तुम्ही शेतकरी, छोटे व्यापारी, तरुण, मजुरांचे मित्र नाही. तुम्ही फक्त अदानी-अंबानींसारख्या 2-3 अब्जाधीशांचे मित्र आहात. पण मला खात्री आहे, तुम्ही भारत आघाडीलाच मतदान कराल." तसेच, भाजपा सरकारने कामगारांचे एक रुपयाही कर्ज माफ केले नाही. त्यांनी शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले नाही तर आपल्या उद्योगपती मित्रांचे १६ लाख कोटी रुपये माफ केले, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. 

पुढे राहुल गांधी म्हणाले, "मोदीजींनी काही उद्योगपती बनवले, पण आम्ही महालक्ष्मी योजनेत लोकांना करोडपती बनवू. काही पत्रकारांनी मला आणि नरेंद्र मोदीजींना पत्रे लिहून लोकशाहीत वाद व्हायला हवा, असे सांगितले. त्यांनी नरेंद्र मोदींना सांगितले की, तुम्ही राहुल गांधींसोबत चर्चेत सहभागी व्हायला हवे. मी नरेंद्र मोदींसोबत कधीही चर्चा करायला तयार आहे, पण नरेंद्र मोदी माझ्याशी चर्चा करणार नाहीत."

दरम्यान, तुमचा अदानीशी काय संबंध आहे? तुम्ही इलेक्टोरल बाँड्सच्या नावावर 'डोनेशन बिझनेस' का चालवत आहात? शेतकऱ्यांवर काळे कायदे का आणले? कोरोनाने लोक मरत असताना थाळी वाजवायला का सांगितले? तुम्ही शी जिनपिंगला झुलवले, मग त्यांच्या सैन्याने भारताची भूमी कशी काबीज केली? तुम्ही अग्निवीर योजना का आणली? असे प्रश्न नरेंद्र मोदी चर्चेसाठी आले तर विचारेन असे राहुल गांधी यांनी सांगितले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीdelhi lok sabha election 2024दिल्ली लोकसभा निवडणूक निकाल २०२४INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीcongressकाँग्रेस