शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2024 22:12 IST

Lok Sabha Election 2024: भाजपा उद्योगपतींना प्रोत्साहन देत असल्याचा आरोप करत महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून देशातील महिलांना करोडपती बनवू, असे आश्वासन राहुल गांधी यांनी उपस्थित जनतेला दिले. 

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधींच्या उपस्थितीत इंडिया आघाडीची आज दिल्लीत सभा झाली. यावेळी राहुल गांधी यांनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. तसेच, संविधानाचे रक्षण करणे हे काँग्रेस पक्षाचे ध्येय आहे. कारण हेच देशातील जनतेचे भविष्य, त्यांचे स्वप्न आणि त्यांच्या हृदयाचा आवाज आहे, असे राहुल गांधी म्हणाले. 

या संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय आहे. भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना हे संविधान नको आहे. त्यामुळे पहिले काम या संविधानाचे रक्षण करणे आहे, कारण हे तुमचे भविष्य आहे. तुझे स्वप्न आणि तुझ्या हृदयाचा आवाज आहे, असे राहुल गांधी यांनी भाजपावर निशाणा साधला. तसेच, भाजपा उद्योगपतींना प्रोत्साहन देत असल्याचा आरोप करत महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून देशातील महिलांना करोडपती बनवू, असे आश्वासन राहुल गांधी यांनी उपस्थित जनतेला दिले. 

राहुल गांधी म्हणाले, "मीडियाच्या मित्रांनो, तुम्ही शेतकरी, छोटे व्यापारी, तरुण, मजुरांचे मित्र नाही. तुम्ही फक्त अदानी-अंबानींसारख्या 2-3 अब्जाधीशांचे मित्र आहात. पण मला खात्री आहे, तुम्ही भारत आघाडीलाच मतदान कराल." तसेच, भाजपा सरकारने कामगारांचे एक रुपयाही कर्ज माफ केले नाही. त्यांनी शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले नाही तर आपल्या उद्योगपती मित्रांचे १६ लाख कोटी रुपये माफ केले, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. 

पुढे राहुल गांधी म्हणाले, "मोदीजींनी काही उद्योगपती बनवले, पण आम्ही महालक्ष्मी योजनेत लोकांना करोडपती बनवू. काही पत्रकारांनी मला आणि नरेंद्र मोदीजींना पत्रे लिहून लोकशाहीत वाद व्हायला हवा, असे सांगितले. त्यांनी नरेंद्र मोदींना सांगितले की, तुम्ही राहुल गांधींसोबत चर्चेत सहभागी व्हायला हवे. मी नरेंद्र मोदींसोबत कधीही चर्चा करायला तयार आहे, पण नरेंद्र मोदी माझ्याशी चर्चा करणार नाहीत."

दरम्यान, तुमचा अदानीशी काय संबंध आहे? तुम्ही इलेक्टोरल बाँड्सच्या नावावर 'डोनेशन बिझनेस' का चालवत आहात? शेतकऱ्यांवर काळे कायदे का आणले? कोरोनाने लोक मरत असताना थाळी वाजवायला का सांगितले? तुम्ही शी जिनपिंगला झुलवले, मग त्यांच्या सैन्याने भारताची भूमी कशी काबीज केली? तुम्ही अग्निवीर योजना का आणली? असे प्रश्न नरेंद्र मोदी चर्चेसाठी आले तर विचारेन असे राहुल गांधी यांनी सांगितले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीdelhi lok sabha election 2024दिल्ली लोकसभा निवडणूक निकाल २०२४INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीcongressकाँग्रेस