शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2024 22:12 IST

Lok Sabha Election 2024: भाजपा उद्योगपतींना प्रोत्साहन देत असल्याचा आरोप करत महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून देशातील महिलांना करोडपती बनवू, असे आश्वासन राहुल गांधी यांनी उपस्थित जनतेला दिले. 

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधींच्या उपस्थितीत इंडिया आघाडीची आज दिल्लीत सभा झाली. यावेळी राहुल गांधी यांनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. तसेच, संविधानाचे रक्षण करणे हे काँग्रेस पक्षाचे ध्येय आहे. कारण हेच देशातील जनतेचे भविष्य, त्यांचे स्वप्न आणि त्यांच्या हृदयाचा आवाज आहे, असे राहुल गांधी म्हणाले. 

या संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय आहे. भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना हे संविधान नको आहे. त्यामुळे पहिले काम या संविधानाचे रक्षण करणे आहे, कारण हे तुमचे भविष्य आहे. तुझे स्वप्न आणि तुझ्या हृदयाचा आवाज आहे, असे राहुल गांधी यांनी भाजपावर निशाणा साधला. तसेच, भाजपा उद्योगपतींना प्रोत्साहन देत असल्याचा आरोप करत महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून देशातील महिलांना करोडपती बनवू, असे आश्वासन राहुल गांधी यांनी उपस्थित जनतेला दिले. 

राहुल गांधी म्हणाले, "मीडियाच्या मित्रांनो, तुम्ही शेतकरी, छोटे व्यापारी, तरुण, मजुरांचे मित्र नाही. तुम्ही फक्त अदानी-अंबानींसारख्या 2-3 अब्जाधीशांचे मित्र आहात. पण मला खात्री आहे, तुम्ही भारत आघाडीलाच मतदान कराल." तसेच, भाजपा सरकारने कामगारांचे एक रुपयाही कर्ज माफ केले नाही. त्यांनी शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले नाही तर आपल्या उद्योगपती मित्रांचे १६ लाख कोटी रुपये माफ केले, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. 

पुढे राहुल गांधी म्हणाले, "मोदीजींनी काही उद्योगपती बनवले, पण आम्ही महालक्ष्मी योजनेत लोकांना करोडपती बनवू. काही पत्रकारांनी मला आणि नरेंद्र मोदीजींना पत्रे लिहून लोकशाहीत वाद व्हायला हवा, असे सांगितले. त्यांनी नरेंद्र मोदींना सांगितले की, तुम्ही राहुल गांधींसोबत चर्चेत सहभागी व्हायला हवे. मी नरेंद्र मोदींसोबत कधीही चर्चा करायला तयार आहे, पण नरेंद्र मोदी माझ्याशी चर्चा करणार नाहीत."

दरम्यान, तुमचा अदानीशी काय संबंध आहे? तुम्ही इलेक्टोरल बाँड्सच्या नावावर 'डोनेशन बिझनेस' का चालवत आहात? शेतकऱ्यांवर काळे कायदे का आणले? कोरोनाने लोक मरत असताना थाळी वाजवायला का सांगितले? तुम्ही शी जिनपिंगला झुलवले, मग त्यांच्या सैन्याने भारताची भूमी कशी काबीज केली? तुम्ही अग्निवीर योजना का आणली? असे प्रश्न नरेंद्र मोदी चर्चेसाठी आले तर विचारेन असे राहुल गांधी यांनी सांगितले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीdelhi lok sabha election 2024दिल्ली लोकसभा निवडणूक निकाल २०२४INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीcongressकाँग्रेस