शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

देशभर फडकली काँग्रेसची पताका!

By admin | Updated: December 29, 2015 08:34 IST

काँग्रेसने सोमवारी आपला १३१वा स्थापना दिवस देशभरात मोठय़ा उत्साहात साजरा केला. यानिमित्त पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी नवी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात पक्षाचा ध्वज फडकविला.

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. २९ - काँग्रेसने सोमवारी आपला १३१वा स्थापना दिवस देशभरात मोठय़ा उत्साहात साजरा केला. यानिमित्त पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी नवी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात पक्षाचा ध्वज फडकविला. 
या वेळी उपाध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, सलमान खुश्रीद, आनंद शर्मा, शीला दीक्षित, गुलाम नबी आझाद आणि मनीष तिवारी यांच्यासह पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते उपस्थित होते. अकबर मार्गावरील पक्ष मुख्यालयात ध्वजारोहणानंतर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी पक्ष नेत्यांसोबत संवादही साधला. 
या वेळी त्यांनी मीडियाशी मात्र चर्चा केली नाही. वेगवेगळ्या राज्यांतही पक्षाने आपल्या मुख्यालयात स्थापना दिनाचे भरगच्च कार्यक्रम आयोजित केले होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्यालय टिळक भवन येथे काँग्रेस स्थापना दिवस आज उत्साहात साजरा करण्यात आला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. सेवादलाने ध्वजाला मानवंदना दिली. या वेळी माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व इतर नेत्यांनी सेवादलाच्या कार्यकर्त्यांसह प्रतिज्ञापत्नाचे सामूहिक वाचन केले. 
काँग्रेसने सलग १३0 वर्षे देशसेवेचा वसा कायम ठेवला आहे. त्यासाठी काँग्रेसला बलिदानेही द्यावी लागली. परंतु, पक्ष आपल्या विचारधारेपासून ढळला नाही. पुढील काळातही काँग्रेसचे कार्यकर्ते देशासाठी, समाजातील वंचित घटकांसाठी काम करीत राहतील.
- खा. अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष 
वर्धापनदिनी वादाचे 'दर्शन'!
अखिल भारतीय काँग्रेसच्या १३१व्या स्थापना दिनीच मुंबई काँग्रेसचे मुखपत्र असलेल्या 'काँग्रेस दर्शन' या मासिकात पक्षाध्यक्षा सोनिया गांधी व पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दल वादग्रस्त मजकूर प्रसिद्ध झाल्याने पक्षाची चांगलीच पंचायत झाली. या मुद्दय़ावरून विरोधकांनी टीकेचा सूर आळवताच मासिकाचे कंटेन्ट एडिटर सुधीर जोशी यांची हकालपट्टी करण्यात आली. 
या चुकीबद्दल मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी तीव्र नाराजी व दिलगिरी व्यक्त केली. 'काँग्रेसने आतापर्यंत दडवून ठेवलेले सत्य अखेर बाहेर आलेच,' अशा शब्दांत भाजपाने टीका केली.