शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

“PM बाकी सर्व विषयांवर बोलतात, पण मणिपूरवर नाही, मोदींच्या कृपेने...”; खरगेंची भाजपावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2024 18:35 IST

Congress Mallikarjun Kharge Parliament Budget Session 2024: राज्यसभेत बोलताना मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपा आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.

Congress Mallikarjun Kharge Parliament Budget Session 2024: देशभरात दर २ तासांनी एससी-एसटी समाजातील ५ लोक विविध गुन्ह्यांचे बळी ठरतात. पंतप्रधान मोदी प्रत्येक विषयावर बोलतात, पण मणिपूरच्या मुद्द्यावर काहीच बोलत नाहीत. सरकार नेहमीच ओबीसी  आणि महिला आरक्षणाबाबत बोलत असते. मात्र, नुकतीच यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे असून, केंद्राने त्याविरोधात प्रतिज्ञापत्र का दिले, अशी विचारणा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन यांनी राज्यसभेत बोलताना केली.

राज्यसभेत बोलताना मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपा आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली. नेहरू स्मारकाचे नाव बदलण्याची काय गरज होती, अटलजी पंतप्रधान असताना त्यांनी नेहरूजींचा फोटो कुठे आहे, असे विचारले होते. त्यांनी नेहरूजींचा फोटो परत लावला. पण ही आजची भाजपा फोडाफोडीचे राजकारण करणारी आहे. केंद्र सरकार संसदेचे संरक्षण करण्यात अपयशी ठरत आहे. संसदेवरील हल्ल्यात पकडलेल्या आरोपींना विजेचे शॉक दिले जात आहेत. एका विशिष्ट पक्षाचे नाव घेण्यास भाग पाडले जात आहे, असे गंभीर आरोप मल्लिकार्जुन खरगे यांनी केले.

तुमच्याकडे बहुमत आहे, आता काय यापुढे ४०० पारही कराल!!!

पुढे बोलताना मल्लिकार्जून खरगे म्हणाले की, तुमच्या बहुमत आहे, आधी ३३०-३३४ जागा होते, आता यापुढे ४०० चा आकडाही पार कराल, असे विधान करताच, सभागृहात हशा पिकला. पंतप्रधान मोदी यांनाही हसू आवरता आले नाही. पुढे खरगे म्हणाले की, त्यांना आधी निवडून येऊ द्या, हे सर्व पंतप्रधान मोदींच्या कृपेने आले आहेत. समोरच्या बाकांवर बसलेले सदस्य PM मोदींच्या आशीर्वादाने आले आहेत. त्यांचे काम आता फक्त बेंच वाजवणे एवढेच राहिले आहे, असा खोचक टोला मल्लिकार्जुन खरगे यांनी लगावला.

दरम्यान, बिल्किस बानो प्रकरणातील दोषींना हार का घालण्यात आले? पंतप्रधानांच्या हस्ते राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. तेव्हा मोहन भागवत त्यांच्यासोबत बसले होते. हे तेच मोहन भागवत आहेत, ज्यांनी एससी, एसटी आणि ओबीसींना दिलेल्या आरक्षणावर चर्चेची मागणी केली होती. पण, पंतप्रधान या प्रकरणी कधीच काही बोलले नाहीत, या शब्दांत खरगे यांनी हल्लाबोल केला. 

टॅग्स :Mallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेRajya Sabhaराज्यसभाParliamentसंसदBudget Sessionअर्थसंकल्पीय अधिवेशन