शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

“८ वर्षांपूर्वी प्रत्येक वर्षी २ कोटी नोकऱ्यांचं सांगितलं, तसंच आता १० लाख सरकारी नोकऱ्यांची वेळ”

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 20:08 IST

Rahul Gandhi over PM Modi : राहुल गांधींचा केंद्र सरकारवर जोरदार निशाणा

Rahul Gandhi over PM Modi : रोजगार निर्मितीच्या माध्यमातून वाढती बेरोजगारी आणि आर्थिक मंदीचा सामना करणाऱ्या अर्थव्यवस्थेला सरकार मोठा बूस्टर डोस देण्याच्या तयारीत आहे. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी मोठी घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत माहिती दिली की सर्व विभाग आणि मंत्रालयांमधील मानव संसाधन परिस्थितीचा आढावा घेण्यात आला असून सरकारने पुढील दीड वर्षात मिशन मोडमध्ये १० लाख लोकांची भरती करावी असे निर्देश दिले. दरम्यान, या घोषणेनंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

“जसं आठ वर्षांपूर्वी तरूणांना दरवर्षी २ कोटी नोकऱ्यांचं आश्वासन दिलं होतं, तसंच आता १० लाख सरकारी नोकऱ्यांची वेळ आहे. हे जुमल्यांचं नाही, ‘महा जुमल्यांचं’ सरकार आहे. पंतप्रधान नोकऱ्या निर्माण करण्यात नाही, तर बातम्या तयार करण्यात एक्सपर्ट आहेत,” असं म्हणत राहुल गांधींनी पंतप्रधानांवर निशाणा साधला.ट्वीटद्वारे माहिती केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे देशातील लक्षावधी बेरोजगार युवकांना मोठी संधी उपलब्ध होणार आहे. केंद्र सरकारतर्फे पुढील दीड वर्षात १० लाख नोकऱ्या देण्यात येतील. पंतप्रधान कार्यालयाने यासंदर्भात ट्विट करुन माहिती दिली आहे. पंतप्रधान मोदींनी यापूर्वी एप्रिल महिन्यातही संबंधित उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्यावेळी, नोकरी देण्यासंदर्भात चर्चा केली होती. तसेच, सरकारमधील रिक्त जागांवर लवकरात लवकर पदांची भरती करावी, असे निर्देशही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले होते. त्यातून, देशातील युवकांना नोकरीची चांगली संधी मिळेल.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाjobनोकरी