नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू होऊन १० दिवसांपेक्षा अधिक कालावधी उलटून गेला आहे. दरम्यान, बुधवारी पुन्हा एकदा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शेतकरी आंदोलनावर भाष्य केलं. "शेतकऱ्यांना मागे हटवणं अशक्य आहे आणि सरकारला हे कायदे मागे घ्यावेच लागतील," असं ते म्हणाले. "अन्नदात्यांचं पावसाची जुनं नातं आहे. ते ना घाबरतात ना वातावरणाचं काही कारण देतात. या क्रुर सरकारला पुन्हा सांगा, शेतकऱ्यांना मागे हटवणं अशक्य आहे, तिन्ही कायदेच मागे घ्यावे लागतील, असं राहुल गांधी म्हणाले. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला आहे. यापूर्वी प्रियंका गांधी यांनीदखील आपण शेतकऱ्यांच्या सोबत असल्याचं म्हटलं होतं.
शेतकऱ्यांना मागे हटवणं अशक्य, तिन्ही कायदे मागे घ्यावेच लागतील : राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2021 20:01 IST
Farmers Protest : गेल्या १०० दिवसांपेक्षा अधिक कालावधीपासून शेतकऱ्यांचं सुरू आहे आंदोलन
शेतकऱ्यांना मागे हटवणं अशक्य, तिन्ही कायदे मागे घ्यावेच लागतील : राहुल गांधी
ठळक मुद्देगेल्या १०० दिवसांपेक्षा अधिक कालावधीपासून शेतकऱ्यांचं सुरू आहे आंदोलनशेतकऱ्यांना हटवणं अशक्य, राहुल गांधी यांचं ट्वीट