शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

"मोदी, भाजपला घाबरत नाही, ते मला हात लावू शकत नाहीत"; राहुल गांधी बरसले

By देवेश फडके | Updated: January 19, 2021 16:11 IST

केंद्र सरकारचे तीनही कृषी कायदे शेती आणि शेतकऱ्यांची वाट लावणारे आहेत. या कायद्यांचा मी विरोध करतो, असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले. केंद्रीय कृषी कायद्यासंदर्भात नवी दिल्ली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

ठळक मुद्देनरेंद्र मोदी आणि भाजपला घाबरत नाही - राहुल गांधीकृषी कायदे शेती आणि शेतकऱ्यांची वाट लावणारे आहेत - राहुल गांधीचीनला वेळीच धडा शिकवला पाहिजे - राहुल गांधी

नवी दिल्ली : मी देशभक्त आहे. नरेंद्र मोदी आणि भाजपला घाबरत नाही. ते मला हात लावू शकत नाहीत, असे काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी ठणकावून सांगितले आहे. केंद्रीय कृषी कायद्यासंदर्भात नवी दिल्ली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

केंद्र सरकारचे तीनही कृषी कायदे शेती आणि शेतकऱ्यांची वाट लावणारे आहेत. या कायद्यांचा मी विरोध करतो. भाजपच्या जेपी नड्डा यांनी विचारलेल्या एकाही प्रश्नाचे उत्तर मी देणार नाही. केवळ शेतकरी आणइ देशाच्या प्रश्नांची उत्तरे मी देईन, असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले. 

मोदी सरकार हळूहळू संपूर्ण देशभरातील शेती आपल्या तीन ते चार मित्रांच्या हवाली करण्यासाठी प्रयत्न करत असून, हा त्यांचा डाव आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. संपूर्ण देश विरोधात गेला तरी, सत्याच्या बाजूने मी नेहमी लढत राहीन.  माझे चारित्र्य स्वच्छ आहे. नरेंद्र मोदी किंवा भाजपला मी घाबरत नाही. ते मला हात लावू शकत नाही. मात्र, गोळ्या घालू शकतात, असा दावा राहुल गांधी यांनी यावेळी बोलताना केला.

मोदी सरकार शेतकऱ्यांना थकवू शकते. मात्र, मूर्ख बनवू शकत नाही. काँग्रेस पक्ष शेतकरी आंदोलनाचा सन्मान करते. परंतु, सरकारविरोधात कोणी बोलले, तर त्यांना थेट देशद्रोही ठरवले जाते. सत्ताधारी मात्र बोलताना कसलाही विचार करत नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचीच तशी शिकवण आहे. असे असले, तरी बोलण्यापूर्वी विचार करणे आवश्यक आहे, असे राहुल गांधी म्हणाले. 

चीनकडे स्ट्रॅटेजिक व्हिजन आहे. मात्र, भारताकडे त्याचाच नेमका अभाव आहे. डोकलाम आणि लडाखमध्ये घुसखोरी केल्यानंतर चीनचा इशारा स्पष्टपणे समजतो. चीनला वेळीच धडा शिकवला पाहिजे, असे राहुल गांधी यांनी यावेळी स्पष्ट केले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीFarmer strikeशेतकरी संपBJPभाजपाchinaचीनNarendra Modiनरेंद्र मोदीJ P Naddaजगत प्रकाश नड्डा