शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

'देशाला PM आवास नव्हे, श्वास पाहिजे', राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2021 12:22 IST

Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही कोरोनावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

ठळक मुद्देयाआधीही देशातील कोरोना परिस्थितीवरून राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिले आहे.

नवी दिल्ली : देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येने दोन कोटींचा आकडा पार केला आहे. हा कोरोना संसर्ग वाढीचा वेग इतका आहे की,  गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या एक कोटींवरून दोन कोटींवर गेली आहे. या कोरोना परिस्थितीवरून विरोधी पक्षांकडून मोदी सरकारवर टीका होत आहे. यातच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही कोरोनावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. (Congress leader Rahul Gandhi attacks PM Modi on corona virus)

राहुल गांधी यांनी ट्विट करत नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. देशाला पीएम आवास नव्हे, श्वास पाहिजे, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. या ट्विटसोबत त्यांनी दोन फोटो शेअर केले आहेत. एका फोटोत इंडिया गेट आहे. त्या ठिकाणी बांधकामासाठी खोदकाम केलेले दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत लोक तोंडाला मास्क लावून रिकामे ऑक्सिजन सिलिंडर घेऊन ऑक्सिजनसाठी रांगेत उभे असलेले दिसत आहेत.

दरम्यान, याआधीही देशातील कोरोना परिस्थितीवरून राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिले आहे. देश कोरोना त्सुनामीच्या विळख्यात असल्याचे म्हणत मोदींना सल्ला दिला आहे. तसेच सर्व भारतीय नागरिकांना लवकरात लवकर कोरोना लस उपलब्ध करून देण्याची विनंती देखील राहुल गांधींनी पंतप्रधानांना केली आहे. 

याचबरोबर, कोरोना व्हायरसच्या सर्व स्वरुपाची माहिती मिळवण्यासाठी वैज्ञानिक पद्धतींचा वापर करण्यासोबतच संपूर्ण जगाला याबद्दल माहिती देण्याचा आग्रह राहुल गांधी यांनी या पत्राद्वारे केला आहे. केंद्र सरकारच्या अपयशामुळे देश पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तराच्या लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर उभा आहे, असा गंभीर आरोपही राहुल यांनी आपल्या पत्रातून केला आहे. अशावेळी गेल्या वर्षीसारखे गरिबांना कठीण प्रसंगाचा सामना करावा लागू नये यासाठी तातडीने आर्थिक मदत पोहचवण्यात यावी असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे. 

(पश्चिम बंगालमध्ये मोदी-शहा का हरले?, 'रोखठोक'मधून संजय राऊतांनी सांगितलं कारण)

लोकांचे जीव जातायत, पण पंतप्रधानांची टॅक्स वसुली सुरूच - राहुल गांधीगेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेस नेते राहुल गांधीपंतप्रधान मोदी आणि केंद्रावर वारंवार टीका करत आहेत. केंद्र सरकारची धोरणे, कोरोना परिस्थिती, लॉकडाऊन, लसीकरण यांसारख्या अनेक मुद्द्यांवरून राहुल गांधी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधत आहेत. राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा ट्विटरवरून पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. काँग्रेसशासित राज्यांनी कोरोना लसींवर आकारल्या जाणाऱ्या जीएसटीवर आक्षेप नोंदवला होता. याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी टीका केली आहे. 

( AMU मध्ये कोरोनाचा कहर! दोन आठवड्यात 15 प्राध्यापकांचा मृत्यू, विद्यापीठात भीतीचे वातावरण)

देशात आतापर्यंत 2 लाख 42 हजार 362 रुग्णांचा मृत्यूआतापर्यंत देशात 1 कोटी 83 लाख 17 हजार 404 रुग्ण बरे झाले आहेत. भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 कोटी 22 लाख 96 हजार 414 वर गेला आहे. आतापर्यंत 2 लाख 42 हजार 362 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर 37 लाख 36 हजार 648 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 16 कोटी 94 लाख 39 हजार 663 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्याcongressकाँग्रेस