शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

"मी माझ्या भावासाठी माझा जीव देऊ शकते आणि तो..."; प्रियंका गांधींचं भाजपाला जोरदार प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2022 15:59 IST

Congress Priyanka Gandhi And Yogi Adityanath : भाऊ-बहिणींमध्ये संघर्ष असल्याच्या भाजपाने केलेल्या गंभीर आरोपाला उत्तर देताना प्रियंका गांधी यांनी हे विधान केलं आहे.

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमध्ये राजकारण तापलं आहे. राजकीय पक्ष आणि नेते मंडळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. याच दरम्यान काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा (Congress Priyanka Gandhi)  यांनी भाजपाने केलेल्या एका आरोपावर जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. "मी माझ्या भावासाठी माझा जीव देऊ शकते आणि तो माझ्यासाठी जीव देऊ शकतो" असं म्हटलं आहे. भाऊ-बहिणींमध्ये संघर्ष असल्याच्या भाजपाने केलेल्या गंभीर आरोपाला उत्तर देताना प्रियंका गांधी यांनी हे विधान केलं आहे. तसेच यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. 

योगी आदित्यनाथ यांनी प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांच्यात मतभेद सुरू असल्याचं म्हटलं होतं, त्यावर उत्तर देत "आमच्यात मतभेद कुठे आहेत?"असा सवाल देखील त्यांनी केला आहे. याच वेळी प्रियंका गांधी योगी आदित्यनाथ यांना सणसणीत टोला लगावला आहे. "संघर्ष योगीजींच्या डोक्यात सुरू आहे. भाजपामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यातील मतभेदांवरून योगी आदित्यनाथ असं बोलत आहे" अशी जोरदार टीका केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेल्या प्रियंका गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधताना हे विधान केलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 काँग्रेसने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी 'उन्नती विधान जन घोषणा पत्र-2022' या नावाने पक्षाचा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. प्रियंका गांधी यांनी काँग्रेसने 1 लाख लोकांशी बोलून जाहीरनामा तयार केला आहे. यामध्ये सर्वसामान्य, मजूर, शेतकरी, तज्ज्ञ अशा सर्वच वर्गातील लोकांचा समावेश आहे असं म्हटलं होतं. तसेच हा खर्‍या अर्थाने जाहीरनामा असल्याचे सांगत या माध्यमातून जनतेच्या आकांक्षा काय आहेत आणि काँग्रेस लोकांसाठी काय करणार आहे? हे मला सांगायचे आहे. आम्ही जो जाहीरनामा जारी केला आहे, त्यात नोंदवलेल्या गोष्टी या सर्वसामान्यांच्या सूचना आहेत. राज्यातील जनतेशी चर्चा करूनच या सर्व सूचनांनुसार जाहीरनामा तयार केला आहे. राज्याचा विकास कसा केला जाईल, याबाबत आम्ही आमच्या जाहीरनाम्यात दिले आहे, असंही प्रियंका गांधी यांनी सांगितलं होतं. 

काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध करताना प्रियंका गांधी म्हणाल्या होत्या की, आमचे सरकार आल्यास 10 दिवसांत शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल. तसेच, छत्तीसगडचे उदाहरण देताना त्यांनी सांगितले की, काँग्रेस सरकारने शपथ घेतल्यानंतर तेथे 24 तासांत शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले. याशिवाय भात आणि गहू 2500 रुपये प्रतिक्विंटल आणि ऊस 400 रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी करण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे. याचबरोबर, काँग्रेसच्या जाहीरनाम्यात वीजबिल निम्मे करण्याचे आणि कोरोनाच्या काळातील थकबाकी माफ करण्याचेही म्हटले आहे. याशिवाय, कोरोनामुळे आर्थिक नुकसान झालेल्या कुटुंबांना 25,000 रुपयांची आर्थिक मदत देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे, जेणेकरून ते पुन्हा त्यांच्या पायावर उभे राहू शकतील. 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसPoliticsराजकारणUttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२yogi adityanathयोगी आदित्यनाथ